शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

साखर कामगारांच्या वेतन कराराला शासनाचा ठेंगा

By admin | Updated: August 1, 2014 23:24 IST

वेतन मंडळासाठी त्रिपक्षीय समिती स्थापण्याचा आदेश

प्रकाश पाटील - कोपार्डेसहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला गोडवा निर्माण करणाऱ्या या उद्योगातील साखर कामगारांचा तुटपुंज्या वेतनश्रेणीने कडवटपणा निर्माण झाला आहे. मागील वेतन कराराची मुदत संपून चार महिने झाले, तरी साखर कारखानदार व शासनाच्या उदासीन धोरणामुळे नवीन वेतन कराराला ठेंगा दाखविल्यामुळे साखर कामगार आक्रमक पवित्र्यात असून, येत्या ८ आॅगस्टला महाराष्ट्र राज्य कामगार प्रतिनिधी मंडळाच्यावतीने साखर आयुक्तालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात सध्या दीड लाख साखर कामगार आहेत.साखर कामगारांच्या मागील वेतनमंडळाची मुदत एप्रिल २०१४ मध्ये संपली आहे. एप्रिल २००९ ते एप्रिल २०१४ या पाच वर्षांसाठी हा वेतन करार होता. यावेळी साखर कामगारांना १८ टक्के वेतनवाढ देताना ती दोनवेळा देण्यात आली. मागील कराराला तब्बल दीड वर्षाचा काळ लोटल्यानंतर हंगामाच्या सुरुवातीला साखर कामगारांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर २०१० मध्ये ६ टक्के अंतरिम वाढ व २०११ मध्ये १८ टक्के एकूण वाढ जाहीर करण्यात आली. ही वाढ देतानाही साखर कामगारांना ती एकरकमी न देता या वाढीच्या फरकापोटी देण्यात येणाऱ्या रकमा देण्यासाठी कारखान्यांना तीन टप्प्यांत तेही २०१४ पर्यंत देण्याची मुभा देण्यात आली. एकवेळ हा करार झाला. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करत कारखानदारांनी ही वेतनवाढ दिली की नाही याबाबत ना शासनाने, ना साखर आयुक्तालयाने लक्ष दिले. वेतन मंडळासाठी त्रिपक्षीय समिती स्थापण्याचा आदेशसाखर कामगार प्रतिनिधी मंडळ, साखर संघ अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, साखर आयुक्त व साखर उद्योग सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीअगोदर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बैठक झाली. यावेळी साखर कामगार वेतन व त्यांच्या प्रश्नांसंबंधी त्रिपक्षीय समिती नेमण्याचे आदेश साखर आयुक्त व विजयसिंह मोहिते पाटील यांना दिले होते; मात्र चार महिने झाले तरी ही समिती स्थापण्यास मुहूर्त मिळालेला नाही.--येत्या ८ आॅगस्टला ५० हजार साखर कामगारांचा साखर आयुक्तालयावर मोर्चाचे आयोजन--त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याची केवळ घोषणाच ४४० टक्के वेतनवाढीची मागणीसाखर कामगारांच्या प्रमुख मागण्याएप्रिल २०१४ रोजी होणाऱ्या एकूण वेतनावर (सर्व भत्त्यांसह) ४० टक्के वाढनोकरीच्या कालावधीवर आधारित जादा वेतनवाढ यात चार वर्षे पूर्ण केल्यास १ वेतनवाढ, ६ वर्षांसाठी दोन, ८ वर्षांसाठी तीन व १२ वर्षे नोकरी पूर्ण करणाऱ्यांना चार वेतनवाढी जादा देण्यात याव्यात.रात्रपाळी भत्ता, वैद्यकीय भत्ता धुलाईभत्ता यात वाढ मिळाली