शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

साखर कामगारांच्या वेतन कराराला शासनाचा ठेंगा

By admin | Updated: August 1, 2014 23:24 IST

वेतन मंडळासाठी त्रिपक्षीय समिती स्थापण्याचा आदेश

प्रकाश पाटील - कोपार्डेसहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला गोडवा निर्माण करणाऱ्या या उद्योगातील साखर कामगारांचा तुटपुंज्या वेतनश्रेणीने कडवटपणा निर्माण झाला आहे. मागील वेतन कराराची मुदत संपून चार महिने झाले, तरी साखर कारखानदार व शासनाच्या उदासीन धोरणामुळे नवीन वेतन कराराला ठेंगा दाखविल्यामुळे साखर कामगार आक्रमक पवित्र्यात असून, येत्या ८ आॅगस्टला महाराष्ट्र राज्य कामगार प्रतिनिधी मंडळाच्यावतीने साखर आयुक्तालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात सध्या दीड लाख साखर कामगार आहेत.साखर कामगारांच्या मागील वेतनमंडळाची मुदत एप्रिल २०१४ मध्ये संपली आहे. एप्रिल २००९ ते एप्रिल २०१४ या पाच वर्षांसाठी हा वेतन करार होता. यावेळी साखर कामगारांना १८ टक्के वेतनवाढ देताना ती दोनवेळा देण्यात आली. मागील कराराला तब्बल दीड वर्षाचा काळ लोटल्यानंतर हंगामाच्या सुरुवातीला साखर कामगारांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर २०१० मध्ये ६ टक्के अंतरिम वाढ व २०११ मध्ये १८ टक्के एकूण वाढ जाहीर करण्यात आली. ही वाढ देतानाही साखर कामगारांना ती एकरकमी न देता या वाढीच्या फरकापोटी देण्यात येणाऱ्या रकमा देण्यासाठी कारखान्यांना तीन टप्प्यांत तेही २०१४ पर्यंत देण्याची मुभा देण्यात आली. एकवेळ हा करार झाला. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करत कारखानदारांनी ही वेतनवाढ दिली की नाही याबाबत ना शासनाने, ना साखर आयुक्तालयाने लक्ष दिले. वेतन मंडळासाठी त्रिपक्षीय समिती स्थापण्याचा आदेशसाखर कामगार प्रतिनिधी मंडळ, साखर संघ अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, साखर आयुक्त व साखर उद्योग सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीअगोदर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बैठक झाली. यावेळी साखर कामगार वेतन व त्यांच्या प्रश्नांसंबंधी त्रिपक्षीय समिती नेमण्याचे आदेश साखर आयुक्त व विजयसिंह मोहिते पाटील यांना दिले होते; मात्र चार महिने झाले तरी ही समिती स्थापण्यास मुहूर्त मिळालेला नाही.--येत्या ८ आॅगस्टला ५० हजार साखर कामगारांचा साखर आयुक्तालयावर मोर्चाचे आयोजन--त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याची केवळ घोषणाच ४४० टक्के वेतनवाढीची मागणीसाखर कामगारांच्या प्रमुख मागण्याएप्रिल २०१४ रोजी होणाऱ्या एकूण वेतनावर (सर्व भत्त्यांसह) ४० टक्के वाढनोकरीच्या कालावधीवर आधारित जादा वेतनवाढ यात चार वर्षे पूर्ण केल्यास १ वेतनवाढ, ६ वर्षांसाठी दोन, ८ वर्षांसाठी तीन व १२ वर्षे नोकरी पूर्ण करणाऱ्यांना चार वेतनवाढी जादा देण्यात याव्यात.रात्रपाळी भत्ता, वैद्यकीय भत्ता धुलाईभत्ता यात वाढ मिळाली