शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

सरकारच्यावतीने मोर्चाकडून निवेदन स्वीकारणार

By admin | Updated: October 8, 2016 01:26 IST

चंद्रकांतदादा पाटील यांची भूमिका : मराठा समाजाचा आक्षेप; विरोध करणार

कोल्हापूर : येथे सकल मराठा समाजाच्यावतीने येत्या १५ आॅक्टोबरला काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे सरकारच्यावतीने मी जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून निवेदन स्वीकारणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे; परंतु मंत्री पाटील यांच्या या भूमिकेस सकल मराठा समाजाचा आक्षेप असून, मोर्चाच्यावतीने त्यांना निवेदन देण्यास विरोध होत आहे.आतापर्यंत राज्यात मराठा सकल समाजातर्फे सुमारे पंचवीसहून अधिक मोर्चे काढण्यात आले. तिथे कुठेच मंत्री किंवा तत्सम यंत्रणेला निवेदन देण्यात आलेले नाही. किंबहुना कोणत्याही पक्षातील प्रस्थापित राजकीय नेत्यांबद्दल समाजाच्या मनात चीड आहे. त्यामुळे प्रातिनिधीक स्वरुपात पाच मुली जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतात, असे आतापर्यंत होत आले आहे. मोर्चाच्या मागण्या काय आहेत हे सरकारलाही माहीत आहेत. मोर्चे सुरू होऊनही महिना होत आला तरी सरकारकडून अजून त्याबद्दल फारशी दखल घेतली गेलेली नाही असे असताना आताच निवेदन स्वीकारण्याचा आग्रह कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.यासंबंधी पालकमंत्री पाटील म्हणाले,‘आतापर्यंत कुठेच मोर्चाचे निवेदन मंत्र्यांनी स्वीकारलेले नाही याचा अर्थ कोल्हापुरात ते स्वीकारू नये असा होत नाही. तुम्ही मोर्चाच्यावतीने सरकारचा प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहात. मी तर थेट सरकारच तिथे निवेदन स्वीकारायला तयार आहे. त्यामुळे त्यास विरोध करण्यात मला कोणतेच लॉजिक दिसत नाही. मोर्चाच्यादिवशी मी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात बसून राहणार आहे. मराठा आरक्षणासह समाजाचे अन्य प्रश्न सुटावेत असाच सरकार म्हणून आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.’