शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

सरकारच्यावतीने मोर्चाकडून निवेदन स्वीकारणार

By admin | Updated: October 8, 2016 01:26 IST

चंद्रकांतदादा पाटील यांची भूमिका : मराठा समाजाचा आक्षेप; विरोध करणार

कोल्हापूर : येथे सकल मराठा समाजाच्यावतीने येत्या १५ आॅक्टोबरला काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे सरकारच्यावतीने मी जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून निवेदन स्वीकारणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे; परंतु मंत्री पाटील यांच्या या भूमिकेस सकल मराठा समाजाचा आक्षेप असून, मोर्चाच्यावतीने त्यांना निवेदन देण्यास विरोध होत आहे.आतापर्यंत राज्यात मराठा सकल समाजातर्फे सुमारे पंचवीसहून अधिक मोर्चे काढण्यात आले. तिथे कुठेच मंत्री किंवा तत्सम यंत्रणेला निवेदन देण्यात आलेले नाही. किंबहुना कोणत्याही पक्षातील प्रस्थापित राजकीय नेत्यांबद्दल समाजाच्या मनात चीड आहे. त्यामुळे प्रातिनिधीक स्वरुपात पाच मुली जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतात, असे आतापर्यंत होत आले आहे. मोर्चाच्या मागण्या काय आहेत हे सरकारलाही माहीत आहेत. मोर्चे सुरू होऊनही महिना होत आला तरी सरकारकडून अजून त्याबद्दल फारशी दखल घेतली गेलेली नाही असे असताना आताच निवेदन स्वीकारण्याचा आग्रह कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.यासंबंधी पालकमंत्री पाटील म्हणाले,‘आतापर्यंत कुठेच मोर्चाचे निवेदन मंत्र्यांनी स्वीकारलेले नाही याचा अर्थ कोल्हापुरात ते स्वीकारू नये असा होत नाही. तुम्ही मोर्चाच्यावतीने सरकारचा प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहात. मी तर थेट सरकारच तिथे निवेदन स्वीकारायला तयार आहे. त्यामुळे त्यास विरोध करण्यात मला कोणतेच लॉजिक दिसत नाही. मोर्चाच्यादिवशी मी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात बसून राहणार आहे. मराठा आरक्षणासह समाजाचे अन्य प्रश्न सुटावेत असाच सरकार म्हणून आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.’