शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

बाजार समिती सभेत ‘गोकुळ’चे पडसाद

By admin | Updated: September 23, 2016 00:35 IST

शाहू उद्यान दुरवस्थाबाबत चर्चा : संचालकांना कोंडीत पकडण्याचा सुनील कदम यांचा प्रयत्न

कोल्हापूर : शाहू उद्यानाची दुरवस्था, बंद केलेली प्रवेशद्वारे व ‘पणन’ची मान्यता न घेता पेट्रोल पंपाच्या जागेची विक्री केलीच कशी, आदी मुद्द्यांवर माजी महापौर सुनील कदम यांनी संचालक मंडळाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. कदम यांनी अर्धा तास हे विषय ताणून धरले, पण उपसभापती विलास साठे व उपसचिव मोहन सालपे यांनी त्याच ताकदीने प्रत्युत्तर केले. कदम पहिल्यांदाच सभेला उपस्थित राहिले. त्याचबरोबर त्यांचे टार्गेट पाहता ‘गोकुळ’ सभेचे पडसाद बाजार समिती सभेत उमटल्याची चर्चा सभास्थळी होती. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी समितीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये झाली. अध्यक्षस्थानी सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर होते. समितीचे ‘दक्षिण’ व ‘उत्तर’कडे बंद केलेल्या प्रवेशद्वाराच्या विषयाला हात घालत, मुख्य रस्त्याकडील प्रवेश बंद केल्याने बँकांसह विविध कामांसाठी समितीत येणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होत आहे, कोणाच्या परवानगीने बदल केला. शाहू उद्यानाच्या दुरवस्थेबाबत सुनील कदम यांनी विचारणा केली. त्यावर मुख्य रस्त्याकडील प्रवेशद्वारांमुळे अपघात होत असल्याने हा निर्णय घेतला असून सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत हे गेट सुरू करणार आहे. शाहू उद्यानासाठी सोळा लाखांची तरतूद केली असून पावसाळ्यानंतर तातडीने काम सुरू केले जाणार असल्याचे उपसभापती विलास साठे यांनी सांगितले. समिती आवारातील हिरो होंडाचे शोरूम आत आलेच कसे? असा प्रश्न करत उत्पन्नवाढीसाठी प्लॉट द्या पण तिथे बेकायदेशीर काही होऊ नये, अशी मागणी कदम यांनी केली. ‘पणन’ची मान्यता न घेताच पेट्रोल पंपाची जागा विक्री केलीच कशी? त्यावेळी सभापती कोण होते, अशी विचारणा कदम यांनी केली. त्यावर तत्कालीन कालावधीतील कामकाजाची चौकशी होऊन जिल्हा उपनिबंधक योग्य ती कारवाई करत असल्याचे साठे यांनी सांगितले. नवीन पंप सुरू करण्याचा प्रस्ताव समितीचा असल्याचेही त्यांनी सांगितले. गूळ बॉक्स परत द्यावेत, ‘जी. आय.’ मानांकनाचा अवलंब करावा, अशी मागणी उत्तम पाटील यांनी केली. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने व्यापारी बाहेर निघाले असून नियमनमुक्तीबाबत फेरविचार करावा, अन्यथा समितीची अवस्था वाईट होईल, असा इशारा प्रसाद वळंजू यांनी दिला. महादेव शिंदे, सीताराम गोरे यांनी प्रश्न उपस्थित केले. सभापती सर्जेराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. सभेला संचालक, सचिव विजय नायकल, उपसचिव दिलीप राऊत, मोहन सालपे, अधिकारी, शेतकरी, व्यापारी उपस्थित होते. कदमांच्या चिमट्याने काटे अस्वस्थभगवान काटे इकडे बसले असते तर बोलले असते, आता बोलणार नसल्याचा चिमटा सुनील कदम यांनी सुरुवातीलाच काढला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या काटे यांनी खुलासा करत, संचालक मंडळावर अंकुश ठेवल्यानेच चांगला कारभार सुरू असल्याचे सांगितले, तर नुसता चांगला नव्हे सगळेच बंद असल्याचे प्रशस्तिपत्रक नंदकुमार वळंजू यांनी दिले. आमचा सदस्य कुठे आहे?महापालिका व समिती एकमेकांशी संलग्न असल्याचे सांगत येथे आमचाही सदस्य असतो, पण तो गेला कुठे? सालपेसाहेबांनी आमचा सदस्य घालविल्याचा आरोप करत कदम यांनी सभेला उपस्थित राहण्यामागील दिशा स्पष्ट केली. संचालकांच्या अभिनंदनाचा ठराव रस्त्यासह विविध सुविधा व कांद्याला प्रतिक्विंटल शंभर रुपये अनुदान दिल्याबद्दल संचालक मंडळाचा तर नियमनमुक्तीबद्दल राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.रस्ते ताब्यात देण्यास नकाररस्त्यांचा विकास करण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात अंतर्गत रस्ते देण्याची मागणी कदम यांनी केली. त्याला उपसभापती साठे यांनी नकार दिला.