शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

‘कुंभीं’मध्ये ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे पडसाद

By admin | Updated: December 1, 2015 00:13 IST

‘गोकुळ’ इच्छुकांचा नरकेंशी संपर्क : विरोधी गटाकडून लढण्यास ज्येष्ठ नेत्यांची अनिच्छा

प्रकाश पाटील -- कोपार्डे--विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान गोकुळ दूध संघासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता असणाऱ्या सर्वच दुसऱ्या फळीतील काँग्रेस नेत्यांनी पी. एन. पाटील यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले होते; मात्र यात पी. एन. पाटील यांचा पराभव झाला. तरीही आपल्या कामाची पोचपावती नक्की मिळेल या आशेवर असणाऱ्या जुन्या करवीर मतदारसंघाला पुन्हा डावलत जुन्या सांगरूळ मतदारसंघालाच प्राधान्य देण्यात आल्याने इच्छुक मातब्बर नेत्यांत मोठा असंतोष निर्माण झाला असून, त्याचे पडसाद आता ‘कुंभी’च्या राजकारणातही दिसून येण्याची शक्यता आहे. आमदार चंद्रदीप नरके यांनी २००९ मध्ये विधानसभा लढवीत पी. एन. पाटील यांचा पराभव केला. यावेळी ‘कुंभी’ची पंचवार्षिक निवडणूक समोर होती. कुंभी-कासारी साखर कारखाना निवडणुकीत नरके पॅनेल म्हणजे विजय असे गणित निर्माण झाल्याने, अनेक कार्यकर्त्यांनी २००९ मध्ये आ. नरकेंच्या विजयासाठी जिवाचे रान केले. यानंतर ‘कुंभी’ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपण केलेल्या कामाचा हिशेब मांडत आपल्याला कुंभीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, असा दबाव आणण्यास सुरुवात केली; मात्र संचालक २५ आणि इच्छुक २०० अशी परिस्थिती झाली. आ. नरके यांचीही कार्यकर्त्यांची समजूत काढताना दमछाक झाली. यातून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी आमदार नरकेंच्या विरोधात आॅक्टोबर २०१४ च्या विधानसभेत उटे काढण्यासाठी पी. एन. पाटील यांच्या गोटात प्रवेश करीत अगदी खालच्या पातळीवर जात प्रचाराची राळ उठविली. मात्र, जनतेने आ. नरकेंच्या संपर्काला मान देत त्यांना पुन्हा विजयी केले. नेमकी विधानसभेला जुन्या करवीरमध्ये आ. नरके यांना मदत न करता ‘गोकुळ’ची निवडणूक समोर ठेवून पी. एन. पाटील यांना मदत करणारी बहुतांश मातब्बर यांनी ‘गोकुळ’चे राजकारण समोर ठेवले होते. मात्र, पी. एन. पाटील यांचा पराभव झाला. जरी करवीरमधील ‘कुंभी’च्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या मोठ्या मतदानाची आघाडी दिली नसली तरी चांगले मताधिक्य पी. एन. पाटील यांना मिळाले. हे समोर ठेवून गोकुळसाठी इच्छुक असणाऱ्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात केली. मात्र, नेहमीचा फॉर्म्युला करवीरमधून गोकुळसाठी उमेदवार निवडीला कायम ठेवला. जुन्या सांगरूळ मतदारसंघातील जुन्याच चार संचालकांबरोबर बाळासाहेब खाडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गोकुळसाठी इच्छुक असणारे प्रकाश पाटील (कोगे), तुकाराम पाटील (खुपिरे), एस. के. पाटील (कोपार्डे), प्रकाश देसाई (बोरगाव) या नेत्यांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली.विरोधक नरके यांच्या संपर्कातसध्या पुंडलिक पाटील यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिल्याने, तर बाळासाहेब खाडे यांना ‘गोकुळ’ व प्रकाश देसाई हे ‘यशवंत बँकेचे अध्यक्षपद व पॅनेल प्रमुखाची भूमिका बजावणारे असल्याने शाहू आघाडीतून सक्रिय झाले आहेत, तर २०१० च्या कुंभी निवडणुकीत सर्वांत जास्त ११ हजार मतदान घेणारे प्रकाश पाटील, तुकाराम पाटील हे आ. नरकेंच्या संपर्कात आहेत, तर बहुतांश ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारीच दाखल केलेली नाही. त्यामुळे विरोधी गटावर ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे पडसाद पडण्याची शक्यता आहे.