शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

‘कुंभीं’मध्ये ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे पडसाद

By admin | Updated: December 1, 2015 00:13 IST

‘गोकुळ’ इच्छुकांचा नरकेंशी संपर्क : विरोधी गटाकडून लढण्यास ज्येष्ठ नेत्यांची अनिच्छा

प्रकाश पाटील -- कोपार्डे--विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान गोकुळ दूध संघासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता असणाऱ्या सर्वच दुसऱ्या फळीतील काँग्रेस नेत्यांनी पी. एन. पाटील यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले होते; मात्र यात पी. एन. पाटील यांचा पराभव झाला. तरीही आपल्या कामाची पोचपावती नक्की मिळेल या आशेवर असणाऱ्या जुन्या करवीर मतदारसंघाला पुन्हा डावलत जुन्या सांगरूळ मतदारसंघालाच प्राधान्य देण्यात आल्याने इच्छुक मातब्बर नेत्यांत मोठा असंतोष निर्माण झाला असून, त्याचे पडसाद आता ‘कुंभी’च्या राजकारणातही दिसून येण्याची शक्यता आहे. आमदार चंद्रदीप नरके यांनी २००९ मध्ये विधानसभा लढवीत पी. एन. पाटील यांचा पराभव केला. यावेळी ‘कुंभी’ची पंचवार्षिक निवडणूक समोर होती. कुंभी-कासारी साखर कारखाना निवडणुकीत नरके पॅनेल म्हणजे विजय असे गणित निर्माण झाल्याने, अनेक कार्यकर्त्यांनी २००९ मध्ये आ. नरकेंच्या विजयासाठी जिवाचे रान केले. यानंतर ‘कुंभी’ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपण केलेल्या कामाचा हिशेब मांडत आपल्याला कुंभीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, असा दबाव आणण्यास सुरुवात केली; मात्र संचालक २५ आणि इच्छुक २०० अशी परिस्थिती झाली. आ. नरके यांचीही कार्यकर्त्यांची समजूत काढताना दमछाक झाली. यातून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी आमदार नरकेंच्या विरोधात आॅक्टोबर २०१४ च्या विधानसभेत उटे काढण्यासाठी पी. एन. पाटील यांच्या गोटात प्रवेश करीत अगदी खालच्या पातळीवर जात प्रचाराची राळ उठविली. मात्र, जनतेने आ. नरकेंच्या संपर्काला मान देत त्यांना पुन्हा विजयी केले. नेमकी विधानसभेला जुन्या करवीरमध्ये आ. नरके यांना मदत न करता ‘गोकुळ’ची निवडणूक समोर ठेवून पी. एन. पाटील यांना मदत करणारी बहुतांश मातब्बर यांनी ‘गोकुळ’चे राजकारण समोर ठेवले होते. मात्र, पी. एन. पाटील यांचा पराभव झाला. जरी करवीरमधील ‘कुंभी’च्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या मोठ्या मतदानाची आघाडी दिली नसली तरी चांगले मताधिक्य पी. एन. पाटील यांना मिळाले. हे समोर ठेवून गोकुळसाठी इच्छुक असणाऱ्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात केली. मात्र, नेहमीचा फॉर्म्युला करवीरमधून गोकुळसाठी उमेदवार निवडीला कायम ठेवला. जुन्या सांगरूळ मतदारसंघातील जुन्याच चार संचालकांबरोबर बाळासाहेब खाडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गोकुळसाठी इच्छुक असणारे प्रकाश पाटील (कोगे), तुकाराम पाटील (खुपिरे), एस. के. पाटील (कोपार्डे), प्रकाश देसाई (बोरगाव) या नेत्यांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली.विरोधक नरके यांच्या संपर्कातसध्या पुंडलिक पाटील यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिल्याने, तर बाळासाहेब खाडे यांना ‘गोकुळ’ व प्रकाश देसाई हे ‘यशवंत बँकेचे अध्यक्षपद व पॅनेल प्रमुखाची भूमिका बजावणारे असल्याने शाहू आघाडीतून सक्रिय झाले आहेत, तर २०१० च्या कुंभी निवडणुकीत सर्वांत जास्त ११ हजार मतदान घेणारे प्रकाश पाटील, तुकाराम पाटील हे आ. नरकेंच्या संपर्कात आहेत, तर बहुतांश ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारीच दाखल केलेली नाही. त्यामुळे विरोधी गटावर ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे पडसाद पडण्याची शक्यता आहे.