शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

‘गोकुळ’, ‘वारणा’च्या दूध वितरणला फटका

By admin | Updated: May 1, 2015 00:30 IST

मुंबईतील वितरकांची मक्तेदारी : कमिशन वाढीचा प्रश्न; ८० हजार लिटर दूध शिल्लक

कोल्हापूर : मुंबईतील दूध वितरकांनी लिटरला दोन रुपये कमिशन वाढ मागितल्याने राज्यातील प्रमुख दूध संघ हवालदिल झाले आहेत. वितरकांनी २२ एप्रिलपासून दूध वितरण करणे बंद केल्याने ‘गोकुळ’ व ‘वारणा’ दूध संघांच्या विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे दररोज ८० हजार लिटर दूध शिल्लक राहू लागले आहे. मुंबई येथील वितरकांना प्रतिलिटर चार रुपये कमिशन दिले जाते; पण त्यांच्यामध्ये मुख्य वितरक, उपवितरक अशा तीन-चार शाखा झाल्याने कमिशनमध्ये वाटेकरी वाढले आहेत, त्यामुळे त्यांनी प्रतिलिटर दोन रुपये वाढ मागितली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधाचे दर कोसळल्याने खासगी कंपन्यांनी सर्व दूध मार्केटमध्ये आणले आहे. हे दूध खपविण्यासाठी खासगी कंपन्या वितरकांना मागेल तेवढे कमिशन देत असल्याने, तसेच सहकारी दूध संघांनी कमिशन द्यावे, अशी मागणी वितरकांची आहे. त्यामुळे तेही संघांना शक्य नाही. ‘गोकुळ’ दूध संघाचे सहा लाख लिटर दूध मुंबईमध्ये विक्री होते. पैकी ७० हजार लिटर दूध वितरणावर परिणाम झाला. ‘वारणा’चे एक लाख ६० हजार लिटर विक्री होते. मात्र, विक्रीवर आतातरी फारसा फरक दिसत नाही. परंतु, आज, शुक्रवारपासून वितरणावर परिणाम होईल, असा अंंदाज आहे. दुधाच्या दरवाढीबाबत सरकारचा दबावदूध संघांना ही वाढ देण्यात कोणती अडचण येणार नाही; पण त्याचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे. त्यामुळे दरवाढ करू नये, असा सरकारचा दूध संघांवर दबाव आहे.‘गोकुळ’ची निवडणूक नुकतीच झालेली आहे. अजून चेअरमन निवड व्हायची आहे. वितरकांच्या मागणीबाबत संघ सकारात्मक आहे, त्यांच्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजेत, याबाबत दुमत नाही.- डी. व्ही. घाणेकर, कार्यकारी संचालक, गोकुळ