शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खालेल्लं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
3
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
4
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
5
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
6
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
7
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
8
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
9
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
10
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
11
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
12
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
13
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
14
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
15
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
16
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
18
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
19
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

शहरातील रस्त्यांवरुन जाताय? सावधान ! खड्ड्यांमुळे वाढू शकते पाठदुखी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट असल्याने विकासकामांसाठी मिळणारा तुटपुंजा निधी लक्षात घेता नवीन पक्के रस्ते करणे सोडाच ...

कोल्हापूर : महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट असल्याने विकासकामांसाठी मिळणारा तुटपुंजा निधी लक्षात घेता नवीन पक्के रस्ते करणे सोडाच धड डागडुजी करणेसुध्दा प्रशासनाला अशक्य आहे. दोन पावसाळ्यांत शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब, खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांना मात्र पाठदुखी, मानदुखीचा त्रास वाढला आहे.

कोल्हापूर शहरातील खराब रस्ते सातत्याने चर्चेत असलेला विषय आहे. नागरिक याविषयी तक्रारी करतात, आंदोलने करतात. पण निधीच नसल्यामुळे या रस्त्यांची डागडुजीसुध्दा करता येत नाही, हे वास्तव आहे. रस्ते करण्याची इच्छा असूनही प्रशासन हतबल आहे. रस्त्यांसाठी अपुरा निधी मिळाला की मग गरजेपुरते तुकडे पाडून रस्ते केले जातात. तुकड्यांची ही पद्धत बंद व्हायला हवी. वर्षातून काही मोजकेच रस्ते घेऊन ते पूर्णपणे नव्याने आणि दीर्घकाळ टिकतील, असे मजबूत केले पाहिजेत. परंतु, याचे भान लोकप्रतिनिधींना राहिलेले नाही.

कोल्हापूर शहराचा इतिहास पाहता, एकदा रस्ता केला की तो पुढील एक-दीड वर्षातच खराब होतो. मग त्यावर केवळ पॅचवर्क केले जाते. पण तेही कमी खर्चाचे असल्याने तकलादूच होते. केवळ महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शहरातील शेकडो किलोमीटर रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

वाहनांचा खर्च वाढला, पाठदुखीही वाढली -

१. ‘शहरात एकही रस्ता बिनखड्ड्यांचा नाही. त्यामुळे दुचाकीवरुन पाच-सात किलोमीटरचा प्रवास केला की रात्री अंंगदुखीचा, पाठदुखीचा त्रास होतो’.

- रणजित पाटील, सुर्वे नगर .

२. ‘पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाहीत. दुचाकी खड्ड्यात आदळली की पाठीला दणका बसतो, मान दुखावते. गाड्यांचा दुरुस्ती खर्चही वाढतो.

- रवी शेळके, पोवार कॉलनी.

३. ‘रस्ते इतके खराब झालेत की जो पडेल त्याचे हाड मोडणार. शहरात सतत प्रवास करावा लागत असल्याने भविष्यात नागरिकांना मणकेदुखीचा त्रास होणार हे नक्की’.

- डॉ. संजय वाळके, शिवाजी पेठ.

४. ‘रस्ते केल्यानंतर लगेच ड्रेनेज लाईन, जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदाई केली जाते, ती बंद व्हायला हवी. तुकडे तुकडे रस्ते करण्याची पध्दत बंद व्हायला पाहिजे. रहदारीचे रस्ते अत्यंत मजबूत करायला हवेत. त्यासाठी तेवढा निधीही मिळायला हवा.

- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता.

या रस्त्यांवर गती कमी ठेवलेलीच बरी -

अ. दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी ते इंदिरा सागर रस्ता.

- निर्मिती साल - २०१०

- झालेला खर्च - २ कोटी

- डागडुजी साल - २०२०

- झालेला खर्च - ४ लाख ५० हजार

ब. बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक रस्ता.

- निर्मिती साल - २०१७

- झालेला खर्च - २० लाख

- डागडुजी साल - २०१९

- झालेला खर्च - ५ लाख

(फोटो देत आहे.)