शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्त्यांवरुन जाताय? सावधान ! खड्ड्यांमुळे वाढू शकते पाठदुखी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट असल्याने विकासकामांसाठी मिळणारा तुटपुंजा निधी लक्षात घेता नवीन पक्के रस्ते करणे सोडाच ...

कोल्हापूर : महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट असल्याने विकासकामांसाठी मिळणारा तुटपुंजा निधी लक्षात घेता नवीन पक्के रस्ते करणे सोडाच धड डागडुजी करणेसुध्दा प्रशासनाला अशक्य आहे. दोन पावसाळ्यांत शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब, खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांना मात्र पाठदुखी, मानदुखीचा त्रास वाढला आहे.

कोल्हापूर शहरातील खराब रस्ते सातत्याने चर्चेत असलेला विषय आहे. नागरिक याविषयी तक्रारी करतात, आंदोलने करतात. पण निधीच नसल्यामुळे या रस्त्यांची डागडुजीसुध्दा करता येत नाही, हे वास्तव आहे. रस्ते करण्याची इच्छा असूनही प्रशासन हतबल आहे. रस्त्यांसाठी अपुरा निधी मिळाला की मग गरजेपुरते तुकडे पाडून रस्ते केले जातात. तुकड्यांची ही पद्धत बंद व्हायला हवी. वर्षातून काही मोजकेच रस्ते घेऊन ते पूर्णपणे नव्याने आणि दीर्घकाळ टिकतील, असे मजबूत केले पाहिजेत. परंतु, याचे भान लोकप्रतिनिधींना राहिलेले नाही.

कोल्हापूर शहराचा इतिहास पाहता, एकदा रस्ता केला की तो पुढील एक-दीड वर्षातच खराब होतो. मग त्यावर केवळ पॅचवर्क केले जाते. पण तेही कमी खर्चाचे असल्याने तकलादूच होते. केवळ महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शहरातील शेकडो किलोमीटर रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

वाहनांचा खर्च वाढला, पाठदुखीही वाढली -

१. ‘शहरात एकही रस्ता बिनखड्ड्यांचा नाही. त्यामुळे दुचाकीवरुन पाच-सात किलोमीटरचा प्रवास केला की रात्री अंंगदुखीचा, पाठदुखीचा त्रास होतो’.

- रणजित पाटील, सुर्वे नगर .

२. ‘पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाहीत. दुचाकी खड्ड्यात आदळली की पाठीला दणका बसतो, मान दुखावते. गाड्यांचा दुरुस्ती खर्चही वाढतो.

- रवी शेळके, पोवार कॉलनी.

३. ‘रस्ते इतके खराब झालेत की जो पडेल त्याचे हाड मोडणार. शहरात सतत प्रवास करावा लागत असल्याने भविष्यात नागरिकांना मणकेदुखीचा त्रास होणार हे नक्की’.

- डॉ. संजय वाळके, शिवाजी पेठ.

४. ‘रस्ते केल्यानंतर लगेच ड्रेनेज लाईन, जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदाई केली जाते, ती बंद व्हायला हवी. तुकडे तुकडे रस्ते करण्याची पध्दत बंद व्हायला पाहिजे. रहदारीचे रस्ते अत्यंत मजबूत करायला हवेत. त्यासाठी तेवढा निधीही मिळायला हवा.

- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता.

या रस्त्यांवर गती कमी ठेवलेलीच बरी -

अ. दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी ते इंदिरा सागर रस्ता.

- निर्मिती साल - २०१०

- झालेला खर्च - २ कोटी

- डागडुजी साल - २०२०

- झालेला खर्च - ४ लाख ५० हजार

ब. बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक रस्ता.

- निर्मिती साल - २०१७

- झालेला खर्च - २० लाख

- डागडुजी साल - २०१९

- झालेला खर्च - ५ लाख

(फोटो देत आहे.)