शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

चिंचवाडला शुद्ध पाणी द्या, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:20 IST

उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथे शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी आठ वर्षांपूर्वी पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...

उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथे शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी आठ वर्षांपूर्वी पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाणी फिल्टर करणारे यंत्रच बंद अवस्थेत होते. दुरुस्ती करूनही शेवाळयुक्त पाणीपुरवठा होत असून, योग्य प्रमाणात तुरटी व टीसीएलचे प्रमाण ठेवण्यात येऊन गावाला शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते आप्पासो कदम यांनी दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, चिंचवाड गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आठ वर्षांपूर्वी पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या माध्यमातून गावाला शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून फिल्टर सेवा बंद होती. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले होते. काही दिवसांपूर्वी फिल्टरचे काम केले आहे. तरीही गावाला शेवाळयुक्त पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारी तुरटी व टीसीएल पावडरचे प्रमाण योग्य प्रमाणात न ठेवल्यामुळे पाणी शुद्धिकरण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने शुद्ध पाणीपुरवठा करावा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा कदम यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.