शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

शेतीसाठी १६ तास वीज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 02:29 IST

सतेज पाटील : फेर वाढवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : पाण्याचा फेर लांबणीवर पडल्याने पंचगंगा, दुधगंगा आणि भोगावती खोऱ्यातील उभी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. यासाठी पाण्याचा फेर वाढवून किमान १६ तास वीज द्यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे केली. यावर लवकरच राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.शेतीसाठी उपसा कालावधीमध्ये भारनियमन नसावे व किमान १६ तास वीज उपलब्ध करून द्यावी, या मागणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी ही मागणी केली. जिल्हाधिकारी सैनी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.सध्या दहा दिवसांचा पाणी उपसा कालावधी असून, यामध्येही वारंवार भारनियमन होत आहे. त्यामुळे शेतीला कमी दाबाने पाणी मिळत आहे. १ ते १० मे या दहा दिवसांच्या पाणी उपसा कालावधीतही वारंवार भारनियमन होत असल्याने उपसा चालू असूनही शेतीला पाणी मिळत नाही. शिवाय पाण्याचा फेर लांबणीवर पडल्याने पिके करपू लागली आहेत. त्यातच पाणी उपसाबंदीचा कालावधी आणखी वाढविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी चिंताग्रस्त असून, शेतीला पाणी नसल्याने शेती पिकवायची कशी? अशी परिस्थिती त्यांच्यासमोर उभी राहिली आहे. हे चित्र जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणून पंचगंगा, दुधगंगा, भोगावती खोऱ्यांमध्ये उपसाबंदी लागू आहे. मात्र, दहा दिवसांच्या उपसा कालावधीतही शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यामुळे उपसाबंदीबाबत योग्य नियोजन करा, उपसा कालावधीत १६ तास अखंडपणे वीज द्या, उपसा कालावधीचा फेर किमान दोन दिवसांनी वाढवावा, अशी मागणी आबददार सतेज पाटील यांनी यावेळी केली.पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाणी शेतीसाठी देण्याबाबत नियोजन करू, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, करवीर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता युवराज जरग, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)