शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

शेतीसाठी १६ तास वीज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 02:29 IST

सतेज पाटील : फेर वाढवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : पाण्याचा फेर लांबणीवर पडल्याने पंचगंगा, दुधगंगा आणि भोगावती खोऱ्यातील उभी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. यासाठी पाण्याचा फेर वाढवून किमान १६ तास वीज द्यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे केली. यावर लवकरच राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.शेतीसाठी उपसा कालावधीमध्ये भारनियमन नसावे व किमान १६ तास वीज उपलब्ध करून द्यावी, या मागणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी ही मागणी केली. जिल्हाधिकारी सैनी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.सध्या दहा दिवसांचा पाणी उपसा कालावधी असून, यामध्येही वारंवार भारनियमन होत आहे. त्यामुळे शेतीला कमी दाबाने पाणी मिळत आहे. १ ते १० मे या दहा दिवसांच्या पाणी उपसा कालावधीतही वारंवार भारनियमन होत असल्याने उपसा चालू असूनही शेतीला पाणी मिळत नाही. शिवाय पाण्याचा फेर लांबणीवर पडल्याने पिके करपू लागली आहेत. त्यातच पाणी उपसाबंदीचा कालावधी आणखी वाढविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी चिंताग्रस्त असून, शेतीला पाणी नसल्याने शेती पिकवायची कशी? अशी परिस्थिती त्यांच्यासमोर उभी राहिली आहे. हे चित्र जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणून पंचगंगा, दुधगंगा, भोगावती खोऱ्यांमध्ये उपसाबंदी लागू आहे. मात्र, दहा दिवसांच्या उपसा कालावधीतही शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यामुळे उपसाबंदीबाबत योग्य नियोजन करा, उपसा कालावधीत १६ तास अखंडपणे वीज द्या, उपसा कालावधीचा फेर किमान दोन दिवसांनी वाढवावा, अशी मागणी आबददार सतेज पाटील यांनी यावेळी केली.पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाणी शेतीसाठी देण्याबाबत नियोजन करू, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, करवीर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता युवराज जरग, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)