शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

गुढीसाठी लाकडी साच्यातून तयार होत होत्या साखरगाठी

By admin | Updated: March 28, 2017 15:34 IST

पारंपारिक व्यवसायाला घरघर : आता उरले केवळ साचे

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : मराठीतील नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. या दिवशी पारंपारिक गिुढीसोबत साखरेच्या दागिन्यांचा प्रसाद म्हणून सजविण्याची पद्धत आहे. या सणाला साखरेच्या गाठींचे अनन्य साधारण असं महत्त्व आहे. साखरेंच्या गाठीशिवाय गुढी उभारलीच जात नाही. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काही मिठाई व्यावसायिकांची परंपरेने साखरेच्या गाठी बनविणारी अनेक कुटुंबे होती.

गेल्या काही वर्षांत या गाठी तयार करणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. या त्यांच्या वडिलोपार्जित व्यवसायाला आता घरघर लागली आहे. बाजारात या साखरेच्या गाठी उपलब्ध असून, नवीन वर्षाचे नवे संकल्प करण्यासाठी साखरेची गाठी बांधून गुढी उभारण्यासाठी गाठी खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झाली आहे.

चैतन्याचा, नव संकल्प करण्याचा आणि संकल्प पूर्तीचा गुढीपाडवा हा सण. या सणानिमित्त साखरेच्या गाठींचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. त्यामुळे बदलत्या काळातही परंपरेने गाठी तयार करणारी कुटुंबे या सणाची चाहुल लागताच आपल्या उद्योगाला लागतात. विशेष करून ग्रामीण भागात साखरेचे दागिणे आणि गाठी तयार करणारी कुटुंबे आहेत. होळी आणि गुढीपाडवा या सणासाठी ही कुटुंबे या गाठी बनविण्याच्या कामात व्यस्त असतात. कित्येक पिढ्यांपासून साखरेचा गोडवा गुडीपाडवा आणि होळीला टिकून राहावा यासाठी ही कुटुंब या सणादिवशी व्यस्त असतात. गुढीपाडव्याला साखरेच्या गाठींची संपूर्ण राज्यभर मागणी असते. मात्र यावर्षी साखरेचे भाव वाढल्याने तसेच पारंपारिक गाठी बनविण्याचे उद्योग करण्याऐवजी अत्याधुनिक यंत्राद्वारे करण्याच्या पध्दतीमुळे या पारंपारिक व्यवसायाला काही अंशी घरघर लागलीय. पारंपरिक पद्धतीने लाकडी साच्यामध्ये बनवलेल्या गाठी आकर्षक असतात, परंतु कारखान्यामधून मशीनवर बनवलेल्या गाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. सध्या साखरेच्या दरात वाढ झाल्याने गाठीचे दरही किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढलेले आहेत.गाठी बनविण्यासाठी प्रथम साखरेचा पाक तयार केला जातो. हा पाक घोटवून ज्या साईजमध्ये गाठी बनवायची आहे, त्या लाकडी साच्यामध्ये हा पाक ओतला जातो. वेगवेगळ्या साईजमध्ये व वेगवेगळ्या डिझाईन आणि वेगवेगळ्या वजनाच्या गाठी बनविण्यासाठी अनेक लाकडी साच्यांचा उपयोग केला जातो. १०० किलो साखरेमध्ये अंदाजे ९५ किलो गाठी तयार होतात. आमच्याकडे अजूनही हे लाकडी साचे आहेत, परंतु कालपरत्वे नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे.

- निखिल माळकर, कोल्हापूर.