शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

घाटगे-मंडलिक-घाटगे एकाच व्यासपीठावर

By admin | Updated: December 28, 2016 00:08 IST

संजय मंडलिक : तिघांनी एकत्र यावे या जनमताच्या कौलाचा आदर करणार; करड्याळला कार्यक्रम

सेनापती कापशी : नगरपालिकांच्या निवडणुकीत भ्रष्टाचारमुक्त कारभार व शाश्वत विकासाकडे नेणारे प्रशासन हा आमचा नारा होता. कागल व मुरगूड येथील जनतेने आम्हाला भरभरून मते दिली व घवघवीत यश मिळवून दिले. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी संजय घाटगे, समरजितसिंह घाटगे व आम्ही एकत्र यावे हा जनमताचा कौल आहे. त्याचा आदर करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी केले.ते करड्याळ (ता. कागल) येथील ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय घाटगे, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे होते.समरजितसिंह घाटगे म्हणाले, मी व्यवस्थापनातून मोठा झालो आहे. व्यक्ती मोठी नसते तर व्यवस्थापन मोठं झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कागल नगरपालिकेत नकारात्मक राजकारण फार झाले. याला उत्तर देण्यासाठी सकारात्मक राजकारण पुढे आणणे गरजेचे आहे. कागल तालुक्याच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. कागल मोठं झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला अर्जुनवाडा - करड्याळ दरम्यानचा चिकोत्रा नदीवरील पुलाच्या बांधकामास साडेआठ कोटी रुपये मंजूर झाले असून, लवकरच कामास सुरुवात होत आहे. नागणवाडी प्रकल्प मी आता हातात घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करणार, असेही ते म्हणाले.माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत काही चुका झाल्या त्या पाठीमागे सोडून एकमेकांचा आदर ठेऊन विश्वासास कोणताही तडा जाऊ न देता तालुक्याच्या विकासाकरिता एकत्र येण्याची पूर्तता करा. मी मोठा की तू मोठा याचा विचार बाजूला ठेऊन जनमताचा आदर करुया.स्वागत प्रकाश पाटील, प्रास्ताविक आय. डी. कुंभार यांनी केले. आभार उपसरपंच संजय गेंगे यांनी मानले.यावेळी उपसभापती भूषण पाटील, ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, विश्वास कुराडे, शहाजी यादव, राजाभाऊ माळी, दाजी कुंभार, दत्तात्रय वालावलकर, रामचंद्र सांगले, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, सरपंच लक्ष्मी कुंभार, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)नागणवाडी प्रकल्पासाठी खांद्याला खांदा पाणी हे जीवन आहे. पाण्याअभावी चिकोत्रा खोऱ्यातील जनतेची व शेतकऱ्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. या परिसराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवून कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संजय मंडलिक, संजय घाटगे व समरजितसिंह घाटगे यांनी खांद्याला खांदा लावून पाठपुरावा करणार असल्याची जाहीर भूमिका स्पष्ट केली.