शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

पट्टणकोडोली ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पोटठेकेदाराने पाणी योजनेचे काम न केल्याने कारभाराचा पंचनामा करून घेण्याची वेळ गुरुवारी जिल्हा परिषदेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पोटठेकेदाराने पाणी योजनेचे काम न केल्याने कारभाराचा पंचनामा करून घेण्याची वेळ गुरुवारी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागावर आली. पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील पाणी योजना सहा वर्षे रखडल्याने ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घागर मोर्चा काढून प्रवेशद्वारावरच ठिय्या मारला. पाच तासांनंतरही आंदोलन मागे न घेतल्याने अखेर फेब्रूवारी २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

या गावासाठी २०१४ साली ५ कोटी ५३ लाखांची पेयजल योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, मूळ ठेकेदाराने पोटठेकेदार नेमला आणि त्यानंतर काम रखडले. सहा वर्षे झाली तरी काम अपूर्ण आहे. त्यामुळे संतापलेल्या पदाधिकारी, ग्रामस्थांनी दुपारी १२ वाजता घागर मोर्चा काढला. मोर्चा प्रवेशद्वारावर अडविल्यानंतर सर्वांनीच रस्त्यावर ठिय्या मारला. उपसरपंच कृष्णाजी मसूरकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे यावेळी पुरते वाभाडेच काढले.

चर्चेसाठी कोणाकडेही येणार नाही असे मसूरकर यांनी स्पष्ट केल्यानंतर अखेर प्र. कार्यकारी अभियंता मनीष पवार हे मोर्चासमोर आले. यावेळी मसूरकर यांनी त्यांना विविध प्रश्न विचारून धारेवर धरले. मूळ काम तुम्ही दिला, त्यांनी पोटठेकेदार दिला. त्याने काम पूर्ण केले नाही. उलट योजनेच्या दुरुस्तीसाठी आम्हाला साडेतीन लाख रुपये खर्च आला आहे. तुमचा एक अधिकारी त्याची एमबी मंजूर करत नाही म्हणून दुसऱ्या अधिकाऱ्याकडून ती मंजूर केली जाते. यात आम्हा ग्रामस्थांची काय चूक, असा सवाल त्यांनी विचारला. यावेळी अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, लेखी पत्राशिवाय हलणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यामुळे मित्तल यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तोपर्यंत आमदार राजू आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे आले. अध्यक्ष बजरंग पाटील, सभापती प्रवीण यादव, राजेश पाटील, विजय भाेजे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली आणि अखेर काम करण्याबाबत लेखी पत्र देण्यात आले.

सरपंच विजया जाधव, सदस्य धुळा डावरे, सूर्यकांत भोजे, विमल चव्हाण, अश्विनी पिराई, खानदेव पिराई, बिरू कुशाप्पा, नंदकुमार माळी यांच्यासह सदस्य यावेळी उपस्थित होते.

चौकट

लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकाला ठेका

एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाइकाला हा ठेका दिल्याने यामध्ये दबाव आणला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. माने आडनावाच्या या ठेकेदाराला गावात पाठविले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. कोट्यवधीची योजना केवळ पोटठेकेदारामुळे अपुरी असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

१०१२२०२० कोल झेडपी ०१

पट्टणकोडोली ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पाणी योजनेच्या विलंबाबाबत जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला.

छाया - नसीर अत्तार