शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पट्टणकोडोली ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पोटठेकेदाराने पाणी योजनेचे काम न केल्याने कारभाराचा पंचनामा करून घेण्याची वेळ गुरुवारी जिल्हा परिषदेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पोटठेकेदाराने पाणी योजनेचे काम न केल्याने कारभाराचा पंचनामा करून घेण्याची वेळ गुरुवारी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागावर आली. पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील पाणी योजना सहा वर्षे रखडल्याने ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घागर मोर्चा काढून प्रवेशद्वारावरच ठिय्या मारला. पाच तासांनंतरही आंदोलन मागे न घेतल्याने अखेर फेब्रूवारी २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

या गावासाठी २०१४ साली ५ कोटी ५३ लाखांची पेयजल योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, मूळ ठेकेदाराने पोटठेकेदार नेमला आणि त्यानंतर काम रखडले. सहा वर्षे झाली तरी काम अपूर्ण आहे. त्यामुळे संतापलेल्या पदाधिकारी, ग्रामस्थांनी दुपारी १२ वाजता घागर मोर्चा काढला. मोर्चा प्रवेशद्वारावर अडविल्यानंतर सर्वांनीच रस्त्यावर ठिय्या मारला. उपसरपंच कृष्णाजी मसूरकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे यावेळी पुरते वाभाडेच काढले.

चर्चेसाठी कोणाकडेही येणार नाही असे मसूरकर यांनी स्पष्ट केल्यानंतर अखेर प्र. कार्यकारी अभियंता मनीष पवार हे मोर्चासमोर आले. यावेळी मसूरकर यांनी त्यांना विविध प्रश्न विचारून धारेवर धरले. मूळ काम तुम्ही दिला, त्यांनी पोटठेकेदार दिला. त्याने काम पूर्ण केले नाही. उलट योजनेच्या दुरुस्तीसाठी आम्हाला साडेतीन लाख रुपये खर्च आला आहे. तुमचा एक अधिकारी त्याची एमबी मंजूर करत नाही म्हणून दुसऱ्या अधिकाऱ्याकडून ती मंजूर केली जाते. यात आम्हा ग्रामस्थांची काय चूक, असा सवाल त्यांनी विचारला. यावेळी अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, लेखी पत्राशिवाय हलणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यामुळे मित्तल यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तोपर्यंत आमदार राजू आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे आले. अध्यक्ष बजरंग पाटील, सभापती प्रवीण यादव, राजेश पाटील, विजय भाेजे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली आणि अखेर काम करण्याबाबत लेखी पत्र देण्यात आले.

सरपंच विजया जाधव, सदस्य धुळा डावरे, सूर्यकांत भोजे, विमल चव्हाण, अश्विनी पिराई, खानदेव पिराई, बिरू कुशाप्पा, नंदकुमार माळी यांच्यासह सदस्य यावेळी उपस्थित होते.

चौकट

लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकाला ठेका

एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाइकाला हा ठेका दिल्याने यामध्ये दबाव आणला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. माने आडनावाच्या या ठेकेदाराला गावात पाठविले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. कोट्यवधीची योजना केवळ पोटठेकेदारामुळे अपुरी असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

१०१२२०२० कोल झेडपी ०१

पट्टणकोडोली ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पाणी योजनेच्या विलंबाबाबत जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला.

छाया - नसीर अत्तार