शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

उजळाईवाडीचा नागरिकांनीच केला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:31 IST

मोहन सातपुते उचगाव : एकीकडे स्वच्छतेसाठी केंद्र आणि राज्य सरकार जनजागृतीद्वारे आटापिटा करत असले तरी, ही जागृती अजूनही उजळाईवाडीकरांच्या ...

मोहन सातपुते

उचगाव : एकीकडे स्वच्छतेसाठी केंद्र आणि राज्य सरकार जनजागृतीद्वारे आटापिटा करत असले तरी, ही जागृती अजूनही उजळाईवाडीकरांच्या मनात उतरलेली नसल्याचा प्रत्यय येथील कचऱ्याच्या समस्येवरून येत आहे. उजळाईवाडीत काही नागरिकांकडून मोकळ्या जागेत, दिसेल तिथे कचरा टाकला जात आहे. परिणामी येथे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ग्रामपंचायतीकडेही कचरा उचलण्यासाठी अपुरी यंत्रणा असल्याने वेळेवर कचरा उचलला जात नाही. परिणामी उजळाईवाडीतील अनेक भागात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील तुंबलेल्या कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी माजी तंटामुक्त अध्यक्ष नायकू बागणे यांनी केली आहे.

चौकट:

निष्काळजीपणा कारणीभूत....

उजळाईवाडी ग्रामपंचायतीकडून कचरा गोळा करण्यासाठी दोन घंटागाड्या आहेत. या गाड्या घरा-घरातून येणारा कचरा गोळा करण्यासाठी सर्वत्र फिरत असतात. त्यासाठी वारंवार जनजागृतीही केली जाते. मात्र, अनेकजण घंटागाडीपर्यंत जाण्याचीही तसदी घेत नाहीत. त्यांच्याकडून सरळ रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे मोकळ्या जागेवर कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचल्याचे चित्र आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कचऱ्याचे व्यवस्थापन करणे आव्हान

सध्या उजळाईवाडी ग्रामपंचायत हद्दीत अनेक मोठमोठ्या कॉलन्या उदयास येत आहेत. त्यात ग्रामपंचायतीकडे कचरा उचलण्यासाठी दोनच घंटागाड्‌या आहेत. पाच ते सहाच स्वच्छता कर्मचारी आहेत. त्यामुळे संपूर्ण गावातील कचरा वेळेत उचलण्याचे मोठे आव्हान ग्रामपंचायतीसमोर आहे. छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, पसरीचा नगर, पाटबंधारे, कोर्ट, लघुवेतन, सायबर, म्हाडा, माजी सैनिक, रेणुकानगर, श्रीराम कॉलनी, छत्रपती नगर, उजळाई कॉलनी, महालक्ष्मी नगर, वैभव हौसिंग सोसायटी, हनुमाननगर, पैलवान दादू चौगुले नगर, शिव-पार्वती नगर, या परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.

कोट :

गावात दोन घंटागाड्या असून पाच महिला सफाई कर्मचारी आहेत. नागरिकांनी अस्ताव्यस्त कचरा न टाकता घंटागाडीत टाकावा. लोकसंख्या विस्तारत असून कचरा व्यवस्थापनासाठी जागेची व निधीची गरज आहे.

- सुवर्णा माने, सरपंच, उजळाईवाडी.

कोट :

मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा, जैव वैद्यकीय कचरा, दुर्गंधीयुक्त घाण यामुळे रहिवाशांवर दुर्गंधीचा त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे कचरा समस्या गंभीर रूप धारण करत आहे. त्यामुळे वेळीच कचरा उचलण्याची गरज आहे. अस्वच्छ परिसरामुळे डेंग्यू, मलेरिया होण्याची भीती वाटत आहे. तसेच कचरा रोडकडेला न टाकता ट्रॉलीमध्ये टाकण्यासाठी नागरिकांना सूचना दिल्या पाहिजेत.

- नायकू बागणे, माजी उपसरपंच, उजळाईवाडी

फोटो : २६ उजळाईवाडी

ओळ:

उजळाईवाडी, ता. करवीर येथे कचरा समस्या गंभीर बनत असून नागरिक उघड्यावरच कचरा टाकत असल्याने त्याचे ढीग साचले आहेत.