शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

उजळाईवाडीचा नागरिकांनीच केला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:31 IST

मोहन सातपुते उचगाव : एकीकडे स्वच्छतेसाठी केंद्र आणि राज्य सरकार जनजागृतीद्वारे आटापिटा करत असले तरी, ही जागृती अजूनही उजळाईवाडीकरांच्या ...

मोहन सातपुते

उचगाव : एकीकडे स्वच्छतेसाठी केंद्र आणि राज्य सरकार जनजागृतीद्वारे आटापिटा करत असले तरी, ही जागृती अजूनही उजळाईवाडीकरांच्या मनात उतरलेली नसल्याचा प्रत्यय येथील कचऱ्याच्या समस्येवरून येत आहे. उजळाईवाडीत काही नागरिकांकडून मोकळ्या जागेत, दिसेल तिथे कचरा टाकला जात आहे. परिणामी येथे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ग्रामपंचायतीकडेही कचरा उचलण्यासाठी अपुरी यंत्रणा असल्याने वेळेवर कचरा उचलला जात नाही. परिणामी उजळाईवाडीतील अनेक भागात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील तुंबलेल्या कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी माजी तंटामुक्त अध्यक्ष नायकू बागणे यांनी केली आहे.

चौकट:

निष्काळजीपणा कारणीभूत....

उजळाईवाडी ग्रामपंचायतीकडून कचरा गोळा करण्यासाठी दोन घंटागाड्या आहेत. या गाड्या घरा-घरातून येणारा कचरा गोळा करण्यासाठी सर्वत्र फिरत असतात. त्यासाठी वारंवार जनजागृतीही केली जाते. मात्र, अनेकजण घंटागाडीपर्यंत जाण्याचीही तसदी घेत नाहीत. त्यांच्याकडून सरळ रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे मोकळ्या जागेवर कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचल्याचे चित्र आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कचऱ्याचे व्यवस्थापन करणे आव्हान

सध्या उजळाईवाडी ग्रामपंचायत हद्दीत अनेक मोठमोठ्या कॉलन्या उदयास येत आहेत. त्यात ग्रामपंचायतीकडे कचरा उचलण्यासाठी दोनच घंटागाड्‌या आहेत. पाच ते सहाच स्वच्छता कर्मचारी आहेत. त्यामुळे संपूर्ण गावातील कचरा वेळेत उचलण्याचे मोठे आव्हान ग्रामपंचायतीसमोर आहे. छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, पसरीचा नगर, पाटबंधारे, कोर्ट, लघुवेतन, सायबर, म्हाडा, माजी सैनिक, रेणुकानगर, श्रीराम कॉलनी, छत्रपती नगर, उजळाई कॉलनी, महालक्ष्मी नगर, वैभव हौसिंग सोसायटी, हनुमाननगर, पैलवान दादू चौगुले नगर, शिव-पार्वती नगर, या परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.

कोट :

गावात दोन घंटागाड्या असून पाच महिला सफाई कर्मचारी आहेत. नागरिकांनी अस्ताव्यस्त कचरा न टाकता घंटागाडीत टाकावा. लोकसंख्या विस्तारत असून कचरा व्यवस्थापनासाठी जागेची व निधीची गरज आहे.

- सुवर्णा माने, सरपंच, उजळाईवाडी.

कोट :

मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा, जैव वैद्यकीय कचरा, दुर्गंधीयुक्त घाण यामुळे रहिवाशांवर दुर्गंधीचा त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे कचरा समस्या गंभीर रूप धारण करत आहे. त्यामुळे वेळीच कचरा उचलण्याची गरज आहे. अस्वच्छ परिसरामुळे डेंग्यू, मलेरिया होण्याची भीती वाटत आहे. तसेच कचरा रोडकडेला न टाकता ट्रॉलीमध्ये टाकण्यासाठी नागरिकांना सूचना दिल्या पाहिजेत.

- नायकू बागणे, माजी उपसरपंच, उजळाईवाडी

फोटो : २६ उजळाईवाडी

ओळ:

उजळाईवाडी, ता. करवीर येथे कचरा समस्या गंभीर बनत असून नागरिक उघड्यावरच कचरा टाकत असल्याने त्याचे ढीग साचले आहेत.