शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत गंगा प्रदूषित

By admin | Updated: August 14, 2016 01:03 IST

पन्यास राजरक्षित : श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टतर्फे अन्नछत्र

कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर देशात दुधा-तुपाच्या नद्या वाहतील, असे नेते सांगत होते; पण सध्याच्या स्थितीत कित्येक वर्षांनंतरही नद्या कोरड्याच दिसतात. उलट येथे रक्ताच्या नद्या वाहू लागल्या आहेत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत पवित्र गंगा नदीही प्रदूषित झाली आहे, असे प्रतिपादन प्रवचनकर पन्यास श्री राजरक्षित विजयजी यांनी केले.युगपुरुष आचार्यसम पन्यास प्रवर चंद्रशेखर विजयजी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त गुजरीतील श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टतर्फे शनिवारी झालेल्या प्रवचनात राजरक्षित विजयजी बोलत होते. गुरुपौर्णिमेला येथील संभवनाथ जैन मंदिर येथे प्रवचनकार पन्यास राजरक्षित विजयजी, मुनिश्री प्रियदर्शन विजयजी, मुनिश्री नयरक्षित विजयजी आणि बालमुनी तीर्थरक्षित विजयजी यांचे अगमन झाले आहे. चातुर्मासानिमित्त प्रवचनांच्या माध्यमातून तीन दिवस हा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालेल. प्रवचनात राजरक्षित विजयजी म्हणाले, भारत देशास ‘सोन्याचा देश’ म्हटले जात असे. पण, देशात करोडो लोकांना आज मूठभर अन्न मिळत नाही हे दुर्दैव आहे. सध्याची विकासाची स्पर्धा ही मृतदेहाला सजविण्यासारखी आहे. विकासाचा आलेख देशाच्या स्वतंत्र प्रजेला नष्ट, भ्रष्ट करीत आहे. स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानात दुधा-तुपाच्या नद्या वाहतील, असे नेते सांगत होते. उलट आज कित्येक वर्षांनंतरही याच नद्या कोरड्या दिसतात. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत पवित्र गंगाही प्रदूषित झाली आहे. मूठभर श्रीमंत लोक संपत्तीची उधळपट्टी करून गरिबांची क्रूर थट्टा करीत आहेत, भगवान श्री महावीर स्वामींनी विश्वातील सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करण्यास सांगितले आहे. प्रभू महावीर एका जातीचे नसून सर्व विश्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, उपाध्यक्ष राजेश ओसवाल यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)ट्रस्टच्या वतीने चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रम, ‘अवनि’ अनाथाश्रम, बालसुधारगृहात फळे वाटप करण्यात आले. यासाठी श्री शांतीसुरी भक्तमंडळ आणि ओम शांती युवा संघटनांचे सहकार्य लाभले.