शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
7
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
8
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
9
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
10
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
11
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
12
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
13
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
14
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
15
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
16
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
17
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
18
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
19
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
20
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन

विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत गंगा प्रदूषित

By admin | Updated: August 14, 2016 01:03 IST

पन्यास राजरक्षित : श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टतर्फे अन्नछत्र

कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर देशात दुधा-तुपाच्या नद्या वाहतील, असे नेते सांगत होते; पण सध्याच्या स्थितीत कित्येक वर्षांनंतरही नद्या कोरड्याच दिसतात. उलट येथे रक्ताच्या नद्या वाहू लागल्या आहेत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत पवित्र गंगा नदीही प्रदूषित झाली आहे, असे प्रतिपादन प्रवचनकर पन्यास श्री राजरक्षित विजयजी यांनी केले.युगपुरुष आचार्यसम पन्यास प्रवर चंद्रशेखर विजयजी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त गुजरीतील श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टतर्फे शनिवारी झालेल्या प्रवचनात राजरक्षित विजयजी बोलत होते. गुरुपौर्णिमेला येथील संभवनाथ जैन मंदिर येथे प्रवचनकार पन्यास राजरक्षित विजयजी, मुनिश्री प्रियदर्शन विजयजी, मुनिश्री नयरक्षित विजयजी आणि बालमुनी तीर्थरक्षित विजयजी यांचे अगमन झाले आहे. चातुर्मासानिमित्त प्रवचनांच्या माध्यमातून तीन दिवस हा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालेल. प्रवचनात राजरक्षित विजयजी म्हणाले, भारत देशास ‘सोन्याचा देश’ म्हटले जात असे. पण, देशात करोडो लोकांना आज मूठभर अन्न मिळत नाही हे दुर्दैव आहे. सध्याची विकासाची स्पर्धा ही मृतदेहाला सजविण्यासारखी आहे. विकासाचा आलेख देशाच्या स्वतंत्र प्रजेला नष्ट, भ्रष्ट करीत आहे. स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानात दुधा-तुपाच्या नद्या वाहतील, असे नेते सांगत होते. उलट आज कित्येक वर्षांनंतरही याच नद्या कोरड्या दिसतात. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत पवित्र गंगाही प्रदूषित झाली आहे. मूठभर श्रीमंत लोक संपत्तीची उधळपट्टी करून गरिबांची क्रूर थट्टा करीत आहेत, भगवान श्री महावीर स्वामींनी विश्वातील सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करण्यास सांगितले आहे. प्रभू महावीर एका जातीचे नसून सर्व विश्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, उपाध्यक्ष राजेश ओसवाल यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)ट्रस्टच्या वतीने चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रम, ‘अवनि’ अनाथाश्रम, बालसुधारगृहात फळे वाटप करण्यात आले. यासाठी श्री शांतीसुरी भक्तमंडळ आणि ओम शांती युवा संघटनांचे सहकार्य लाभले.