शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गांधीनगरातील कामगार आर्थिक विवंचनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST

बाबासाहेब नेर्ले गांधीनगर : गेल्या अडीच महिन्यांपासून लाॅकडाऊनच्या विळख्यात सापडलेल्या गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने कामगार वर्गावर उपासमारीची कुऱ्हाड ...

बाबासाहेब नेर्ले

गांधीनगर : गेल्या अडीच महिन्यांपासून लाॅकडाऊनच्या विळख्यात सापडलेल्या गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने कामगार वर्गावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली असून, बेरोजगारीमुळे अनेक कुटुंबीयांना हालाखीचे दिवस आले आहेत. त्यामुळे येथील कामगार ‘कोणी काम देता का काम’ अशी आर्त विनवणी करत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या बाजारपेठेत होलसेल व रेटेलची अडीच ते तीन हजार दुकाने आहेत. त्यामध्ये पंधरा ते वीस हजार कामगार काम करत आहेत. कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून ही व्यापारी पेठ बंद आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. येथील व्यावसायिकांना दुकाने बंद असल्यामुळे खर्चाचा ताळमेळ घालताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुकान गाळ्यांचे भरमसाठ भाडे, बँकांचे कर्ज काढून सुरू केलेला व्यवसाय, त्यातच शासनाचे विविध कर यामुळे मेटाकुटीला आलेला व्यावसायिक हतबल झाला आहे. व्यवसायच बंद झाल्याने अनेक कामगारांना कामावरून कमी केले जात आहे. त्यामुळे अनेक कामगारांना आपल्या कामाला मुकण्याची वेळ आलेली आहे. हातावरील पोट असणाऱ्या कामगार वर्गावर या लॉकडाऊनचा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे कुटुंबीयांना जगवायचे कसे? असा प्रश्न येथील कामगार वर्गावर आ-वासून उभा आहे.

गांधीनगरमधील काही व्यापाऱ्यांनी आपला कामगार जगला पाहिजे म्हणून अर्धा पगार देण्याची तजवीज ठेवली असली, तरीही काही व्यापाऱ्यांनी कामगारांना व्यवसायच ठप्प झाल्याने कामावरून कमी केले आहे. कामाला मुकलेला कामगार दुसरीकडे काम शोधण्याच्या प्रयत्नात आहे; पण व्यवसायच बंद असल्याने दुसरीकडेही काम मिळणे मुश्कील झाले आहे.

त्यामुळे प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढून व्यापार पूर्ववत सुरू करून येथील कामगारांवर व कुटुंबीयांवर आलेली उपासमारीची वेळ दूर करावी, अशी मागणी कामगार वर्गातून जोर धरू लागली आहे.

चौकट : येथील काही व्यापाऱ्यांनी कामगारांच्या कुटुंबीयांचा विचार करून त्याला गरजेपुरता पगार देत आहेत. काहींनी आर्थिक अडचणी समोर ठेवून कामगार संख्या कमी केली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काम बंद झाल्याने अनेक कामगार आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कर्जबाजारी झाले आहेत. त्यातच खासगी सावकार वसुलीचा तगादा लावत आहेत. त्यामुळे कामगार वर्गावर अनेक अडचणींची कुऱ्हाड कोसळली आहे.