शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

गांधीनगरातील कामगार आर्थिक विवंचनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST

बाबासाहेब नेर्ले गांधीनगर : गेल्या अडीच महिन्यांपासून लाॅकडाऊनच्या विळख्यात सापडलेल्या गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने कामगार वर्गावर उपासमारीची कुऱ्हाड ...

बाबासाहेब नेर्ले

गांधीनगर : गेल्या अडीच महिन्यांपासून लाॅकडाऊनच्या विळख्यात सापडलेल्या गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने कामगार वर्गावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली असून, बेरोजगारीमुळे अनेक कुटुंबीयांना हालाखीचे दिवस आले आहेत. त्यामुळे येथील कामगार ‘कोणी काम देता का काम’ अशी आर्त विनवणी करत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या बाजारपेठेत होलसेल व रेटेलची अडीच ते तीन हजार दुकाने आहेत. त्यामध्ये पंधरा ते वीस हजार कामगार काम करत आहेत. कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून ही व्यापारी पेठ बंद आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. येथील व्यावसायिकांना दुकाने बंद असल्यामुळे खर्चाचा ताळमेळ घालताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुकान गाळ्यांचे भरमसाठ भाडे, बँकांचे कर्ज काढून सुरू केलेला व्यवसाय, त्यातच शासनाचे विविध कर यामुळे मेटाकुटीला आलेला व्यावसायिक हतबल झाला आहे. व्यवसायच बंद झाल्याने अनेक कामगारांना कामावरून कमी केले जात आहे. त्यामुळे अनेक कामगारांना आपल्या कामाला मुकण्याची वेळ आलेली आहे. हातावरील पोट असणाऱ्या कामगार वर्गावर या लॉकडाऊनचा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे कुटुंबीयांना जगवायचे कसे? असा प्रश्न येथील कामगार वर्गावर आ-वासून उभा आहे.

गांधीनगरमधील काही व्यापाऱ्यांनी आपला कामगार जगला पाहिजे म्हणून अर्धा पगार देण्याची तजवीज ठेवली असली, तरीही काही व्यापाऱ्यांनी कामगारांना व्यवसायच ठप्प झाल्याने कामावरून कमी केले आहे. कामाला मुकलेला कामगार दुसरीकडे काम शोधण्याच्या प्रयत्नात आहे; पण व्यवसायच बंद असल्याने दुसरीकडेही काम मिळणे मुश्कील झाले आहे.

त्यामुळे प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढून व्यापार पूर्ववत सुरू करून येथील कामगारांवर व कुटुंबीयांवर आलेली उपासमारीची वेळ दूर करावी, अशी मागणी कामगार वर्गातून जोर धरू लागली आहे.

चौकट : येथील काही व्यापाऱ्यांनी कामगारांच्या कुटुंबीयांचा विचार करून त्याला गरजेपुरता पगार देत आहेत. काहींनी आर्थिक अडचणी समोर ठेवून कामगार संख्या कमी केली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काम बंद झाल्याने अनेक कामगार आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कर्जबाजारी झाले आहेत. त्यातच खासगी सावकार वसुलीचा तगादा लावत आहेत. त्यामुळे कामगार वर्गावर अनेक अडचणींची कुऱ्हाड कोसळली आहे.