शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

गांधीनगरातील कामगार आर्थिक विवंचनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST

बाबासाहेब नेर्ले गांधीनगर : गेल्या अडीच महिन्यांपासून लाॅकडाऊनच्या विळख्यात सापडलेल्या गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने कामगार वर्गावर उपासमारीची कुऱ्हाड ...

बाबासाहेब नेर्ले

गांधीनगर : गेल्या अडीच महिन्यांपासून लाॅकडाऊनच्या विळख्यात सापडलेल्या गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने कामगार वर्गावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली असून, बेरोजगारीमुळे अनेक कुटुंबीयांना हालाखीचे दिवस आले आहेत. त्यामुळे येथील कामगार ‘कोणी काम देता का काम’ अशी आर्त विनवणी करत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या बाजारपेठेत होलसेल व रेटेलची अडीच ते तीन हजार दुकाने आहेत. त्यामध्ये पंधरा ते वीस हजार कामगार काम करत आहेत. कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून ही व्यापारी पेठ बंद आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. येथील व्यावसायिकांना दुकाने बंद असल्यामुळे खर्चाचा ताळमेळ घालताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुकान गाळ्यांचे भरमसाठ भाडे, बँकांचे कर्ज काढून सुरू केलेला व्यवसाय, त्यातच शासनाचे विविध कर यामुळे मेटाकुटीला आलेला व्यावसायिक हतबल झाला आहे. व्यवसायच बंद झाल्याने अनेक कामगारांना कामावरून कमी केले जात आहे. त्यामुळे अनेक कामगारांना आपल्या कामाला मुकण्याची वेळ आलेली आहे. हातावरील पोट असणाऱ्या कामगार वर्गावर या लॉकडाऊनचा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे कुटुंबीयांना जगवायचे कसे? असा प्रश्न येथील कामगार वर्गावर आ-वासून उभा आहे.

गांधीनगरमधील काही व्यापाऱ्यांनी आपला कामगार जगला पाहिजे म्हणून अर्धा पगार देण्याची तजवीज ठेवली असली, तरीही काही व्यापाऱ्यांनी कामगारांना व्यवसायच ठप्प झाल्याने कामावरून कमी केले आहे. कामाला मुकलेला कामगार दुसरीकडे काम शोधण्याच्या प्रयत्नात आहे; पण व्यवसायच बंद असल्याने दुसरीकडेही काम मिळणे मुश्कील झाले आहे.

त्यामुळे प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढून व्यापार पूर्ववत सुरू करून येथील कामगारांवर व कुटुंबीयांवर आलेली उपासमारीची वेळ दूर करावी, अशी मागणी कामगार वर्गातून जोर धरू लागली आहे.

चौकट : येथील काही व्यापाऱ्यांनी कामगारांच्या कुटुंबीयांचा विचार करून त्याला गरजेपुरता पगार देत आहेत. काहींनी आर्थिक अडचणी समोर ठेवून कामगार संख्या कमी केली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काम बंद झाल्याने अनेक कामगार आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कर्जबाजारी झाले आहेत. त्यातच खासगी सावकार वसुलीचा तगादा लावत आहेत. त्यामुळे कामगार वर्गावर अनेक अडचणींची कुऱ्हाड कोसळली आहे.