शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

गांधी मैदानाचा झाला तलाव... पाणी निचरा होणारी यंत्रणा जुनाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पाणी निचरा होण्यासाठीची यंत्रणा जुनाट झाल्यामुळे पाणी पुढे सरकत नसल्याने गांधी मैदानाचा सध्या पाण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पाणी निचरा होण्यासाठीची यंत्रणा जुनाट झाल्यामुळे पाणी पुढे सरकत नसल्याने गांधी मैदानाचा सध्या पाण्याचा तलाव झाला आहे. पाणी निचरा होणारी यंत्रणा नव्याने केली जाणार नाही, तोपर्यंत पावसाळ्यात मैदानाची दुर्दशाच होणार आहे. प्रत्येक वर्षी उद्भवणाऱ्या या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या मैदानाचा विकास करून प्रचंड राजकीय ईर्षा दाखविण्यात येत असली, तरी तो विकास फक्त डिजिटल फलकापुरताच मर्यादित राहिल्याचे उघड होत आहे.

महानगरपालिकेच्या मालकीचे गांधी मैदान परिसरातील नागरिकांसाठी, खेळाडूंसाठी उपयुक्त असे मैदान आहे. परंतु, ते खालच्या बाजूला असल्याने नंगीवली चौक, टिंबर मार्केटपासून पावसाळ्यात येणारे सांडपाणी थेट मैदानात घुसते. हे सांडपाणी मैदानाच्या बाजूने वळविण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. या मैदानाच्या पश्चिमेच्या बाजूने एक ओढा आहे, तो सांडपाणी वाहून नेतो. परंतु, मैदानात साचणारे पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्याची त्याची क्षमता नाही.

मैदानाजवळून वाहणारा नाला पुढे बलभीम बँकेच्या इमारतीपासून गजानन काशिद यांच्या घरापासून ब्रम्हेश्वर पार्कला जोडला आहे. पन्नास वर्षांपूर्वी या नाल्याचे काम झाल्यामुळे तो वीस फुटांपेक्षा जास्त खोल आहे. परंतु, याच नाल्यात गाळ, दगड, कचरा अडकल्यामुळे तो तुंबला आहे. पाणी पुढे सरकण्यास वाव नाही. नाल्याचे नळे साफ करण्यातही मोठ्या अडचणी आहेत. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने गांधी मैदान पाण्याने पूर्ण भरले आहे. या पाण्याला नाल्यातून पुढे सरकता येत नसल्याने ते तसेच साचून राहिले आहे. दोन दिवसांपूर्वी नाला जेट मशीन लावून साफ करण्याचा प्रयत्न केल्याने पाणी हळूहळू पुढे सरकत आहे.

दुर्गंधीमुळे त्रास...

मैदानावर पाणी अनेक दिवसांपासून साचून राहिल्याने ते काळे पडले आहे. मैदानावरील माती, गवत, कचऱ्यामुळे दलदल निर्माण झाली आहे. पाण्याची दुर्गंधीही सुटली आहे. डासांचे प्रमाणही वाढले आहे. मैदानात साचून राहिलेले पाणी आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी बनले आहे.

राजकीय ईर्षा तरीही दुर्दशा -

मध्यंतरी गांधी मैदान विकासाची मोठी स्पर्धा झाली, पण ही स्पर्धा काही मैदानाला वाचवू शकत नाही, हेच साचलेल्या पाण्यावरुन दिसून येते. एक कोटी दहा लाख रुपयांचा विकास करण्यात आला, आणखी एक कोटींची निधी देण्यात आल्याची जाहिरातबाजी झाली. त्याचे डिजिटल फलकही झळकले, परंतु हा विकास फलकापुरताच राहिला असून, प्रत्यक्षात प्रत्येक पावसाळ्यात मैदान तलाव होण्याचे थांबत नाही.

(सूचना - फोटो कोल डेस्कवर पाठवित आहे.)