शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

गांधी मैदानाचा झाला तलाव... पाणी निचरा होणारी यंत्रणा जुनाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पाणी निचरा होण्यासाठीची यंत्रणा जुनाट झाल्यामुळे पाणी पुढे सरकत नसल्याने गांधी मैदानाचा सध्या पाण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पाणी निचरा होण्यासाठीची यंत्रणा जुनाट झाल्यामुळे पाणी पुढे सरकत नसल्याने गांधी मैदानाचा सध्या पाण्याचा तलाव झाला आहे. पाणी निचरा होणारी यंत्रणा नव्याने केली जाणार नाही, तोपर्यंत पावसाळ्यात मैदानाची दुर्दशाच होणार आहे. प्रत्येक वर्षी उद्भवणाऱ्या या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या मैदानाचा विकास करून प्रचंड राजकीय ईर्षा दाखविण्यात येत असली, तरी तो विकास फक्त डिजिटल फलकापुरताच मर्यादित राहिल्याचे उघड होत आहे.

महानगरपालिकेच्या मालकीचे गांधी मैदान परिसरातील नागरिकांसाठी, खेळाडूंसाठी उपयुक्त असे मैदान आहे. परंतु, ते खालच्या बाजूला असल्याने नंगीवली चौक, टिंबर मार्केटपासून पावसाळ्यात येणारे सांडपाणी थेट मैदानात घुसते. हे सांडपाणी मैदानाच्या बाजूने वळविण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. या मैदानाच्या पश्चिमेच्या बाजूने एक ओढा आहे, तो सांडपाणी वाहून नेतो. परंतु, मैदानात साचणारे पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्याची त्याची क्षमता नाही.

मैदानाजवळून वाहणारा नाला पुढे बलभीम बँकेच्या इमारतीपासून गजानन काशिद यांच्या घरापासून ब्रम्हेश्वर पार्कला जोडला आहे. पन्नास वर्षांपूर्वी या नाल्याचे काम झाल्यामुळे तो वीस फुटांपेक्षा जास्त खोल आहे. परंतु, याच नाल्यात गाळ, दगड, कचरा अडकल्यामुळे तो तुंबला आहे. पाणी पुढे सरकण्यास वाव नाही. नाल्याचे नळे साफ करण्यातही मोठ्या अडचणी आहेत. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने गांधी मैदान पाण्याने पूर्ण भरले आहे. या पाण्याला नाल्यातून पुढे सरकता येत नसल्याने ते तसेच साचून राहिले आहे. दोन दिवसांपूर्वी नाला जेट मशीन लावून साफ करण्याचा प्रयत्न केल्याने पाणी हळूहळू पुढे सरकत आहे.

दुर्गंधीमुळे त्रास...

मैदानावर पाणी अनेक दिवसांपासून साचून राहिल्याने ते काळे पडले आहे. मैदानावरील माती, गवत, कचऱ्यामुळे दलदल निर्माण झाली आहे. पाण्याची दुर्गंधीही सुटली आहे. डासांचे प्रमाणही वाढले आहे. मैदानात साचून राहिलेले पाणी आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी बनले आहे.

राजकीय ईर्षा तरीही दुर्दशा -

मध्यंतरी गांधी मैदान विकासाची मोठी स्पर्धा झाली, पण ही स्पर्धा काही मैदानाला वाचवू शकत नाही, हेच साचलेल्या पाण्यावरुन दिसून येते. एक कोटी दहा लाख रुपयांचा विकास करण्यात आला, आणखी एक कोटींची निधी देण्यात आल्याची जाहिरातबाजी झाली. त्याचे डिजिटल फलकही झळकले, परंतु हा विकास फलकापुरताच राहिला असून, प्रत्यक्षात प्रत्येक पावसाळ्यात मैदान तलाव होण्याचे थांबत नाही.

(सूचना - फोटो कोल डेस्कवर पाठवित आहे.)