शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गांधी मैदानाचा झाला तलाव... पाणी निचरा होणारी यंत्रणा जुनाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पाणी निचरा होण्यासाठीची यंत्रणा जुनाट झाल्यामुळे पाणी पुढे सरकत नसल्याने गांधी मैदानाचा सध्या पाण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पाणी निचरा होण्यासाठीची यंत्रणा जुनाट झाल्यामुळे पाणी पुढे सरकत नसल्याने गांधी मैदानाचा सध्या पाण्याचा तलाव झाला आहे. पाणी निचरा होणारी यंत्रणा नव्याने केली जाणार नाही, तोपर्यंत पावसाळ्यात मैदानाची दुर्दशाच होणार आहे. प्रत्येक वर्षी उद्भवणाऱ्या या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या मैदानाचा विकास करून प्रचंड राजकीय ईर्षा दाखविण्यात येत असली, तरी तो विकास फक्त डिजिटल फलकापुरताच मर्यादित राहिल्याचे उघड होत आहे.

महानगरपालिकेच्या मालकीचे गांधी मैदान परिसरातील नागरिकांसाठी, खेळाडूंसाठी उपयुक्त असे मैदान आहे. परंतु, ते खालच्या बाजूला असल्याने नंगीवली चौक, टिंबर मार्केटपासून पावसाळ्यात येणारे सांडपाणी थेट मैदानात घुसते. हे सांडपाणी मैदानाच्या बाजूने वळविण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. या मैदानाच्या पश्चिमेच्या बाजूने एक ओढा आहे, तो सांडपाणी वाहून नेतो. परंतु, मैदानात साचणारे पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्याची त्याची क्षमता नाही.

मैदानाजवळून वाहणारा नाला पुढे बलभीम बँकेच्या इमारतीपासून गजानन काशिद यांच्या घरापासून ब्रम्हेश्वर पार्कला जोडला आहे. पन्नास वर्षांपूर्वी या नाल्याचे काम झाल्यामुळे तो वीस फुटांपेक्षा जास्त खोल आहे. परंतु, याच नाल्यात गाळ, दगड, कचरा अडकल्यामुळे तो तुंबला आहे. पाणी पुढे सरकण्यास वाव नाही. नाल्याचे नळे साफ करण्यातही मोठ्या अडचणी आहेत. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने गांधी मैदान पाण्याने पूर्ण भरले आहे. या पाण्याला नाल्यातून पुढे सरकता येत नसल्याने ते तसेच साचून राहिले आहे. दोन दिवसांपूर्वी नाला जेट मशीन लावून साफ करण्याचा प्रयत्न केल्याने पाणी हळूहळू पुढे सरकत आहे.

दुर्गंधीमुळे त्रास...

मैदानावर पाणी अनेक दिवसांपासून साचून राहिल्याने ते काळे पडले आहे. मैदानावरील माती, गवत, कचऱ्यामुळे दलदल निर्माण झाली आहे. पाण्याची दुर्गंधीही सुटली आहे. डासांचे प्रमाणही वाढले आहे. मैदानात साचून राहिलेले पाणी आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी बनले आहे.

राजकीय ईर्षा तरीही दुर्दशा -

मध्यंतरी गांधी मैदान विकासाची मोठी स्पर्धा झाली, पण ही स्पर्धा काही मैदानाला वाचवू शकत नाही, हेच साचलेल्या पाण्यावरुन दिसून येते. एक कोटी दहा लाख रुपयांचा विकास करण्यात आला, आणखी एक कोटींची निधी देण्यात आल्याची जाहिरातबाजी झाली. त्याचे डिजिटल फलकही झळकले, परंतु हा विकास फलकापुरताच राहिला असून, प्रत्यक्षात प्रत्येक पावसाळ्यात मैदान तलाव होण्याचे थांबत नाही.

(सूचना - फोटो कोल डेस्कवर पाठवित आहे.)