शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बचतीसाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

By admin | Updated: July 3, 2015 00:49 IST

‘एसटीपी’ प्लँट : जून ते आॅक्टोबरपर्यंत सांडपाणी थेट पंचगंगेत; मनपाचे आंधळेपणाचे धोरण

संतोष पाटील-कोल्हापूर -कसबा बावड्यातील घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) कुचकामी ठरल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. यावर्षी उन्हाळ्यात किमान तीसहून अधिक दिवस दररोज मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगेत मिसळले. यंदाच्या पावसाळ्याची चाहूल लागताच बंधाऱ्याला धोका नको, या कारणास्तव बरगे काढून काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त पाणी नदीत सोडले. महापालिकेचे धोरण, आंधळेपणामुळे उघडिपीनंतरही मैलामिश्रित पाणी नदीत जातच आहे. दरम्यान, एसटीपी प्रकल्प बंद असल्यामुळे प्रतिदिन १,०७,२३६ रुपये प्रक्रिया खर्चाचे पैसे वाचत असल्याने नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले, तरी मनपाच्या तिजोरीत मात्र लाख रुपयांचा पाऊस पडतो.महापालिकेच्या हद्दीतील किमान ९५ एमएलडी दूषित सांडपाणी तयार होते. एक एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १४११ रुपये खर्च येतो. प्रक्रिया केंद्राची सध्याची क्षमता ७६ एमएलडी आहे. त्यानुसार प्रतिदिन १,०७,२३६ रुपये प्रक्रिया खर्च अपेक्षित आहे. पावसात नदीत जाणाऱ्या सांडपाण्याची तीव्रता कमी असते तसेच पावसाळ्यातही जयंती नाल्यातील पाणी उपसा करून प्रक्रिया केली जाते, असा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. परिणामी पावसाळ्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यास इतर दिवसांतील पाण्यापेक्षा आपोआपच कमी खर्च येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या हे वाचणारे पैसे मनपाला मिळत असले तरी एसटीपी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास ठेकेदार मालामाल होणार आहे. ७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिश्श्याची ३० टक्के रक्कम ठेकेदाराने घातली आहे. ते पैसे भागविण्यासाठी नागरिकांवर गेली दीड वर्षे एसटीपी बंद काळातही सांडपाणी अधिभारातून पैसे उकळले जात आहेत. पुढील १३ वर्षांसाठी नागरिकांच्या खिशाला ही चाट बसणार आहे.इच्छाशक्तीचा अभावबंधाऱ्याला बरगे घालण्यासाठी किमान आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर तत्काळ बरगे घालणे किंवा पाऊस सुरू झाल्यानंतर लगेच बसविणे शक्य नसल्याचे जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले. मात्र, एक-दोन कर्मचाऱ्यांकडून बरगे घालणे व काढण्यापेक्षा ५० पेक्षा अधिक कर्मचारी लावून एका दिवसात पाणी अडविणे शक्य आहे किंवा बंधाऱ्याची उंची वाढवून त्याची क्षमता वाढविण्याची प्रयत्न होताना दिसत नाहीत. याकामी आंधळे धोरण आडवे येत असल्याचे चित्र आहे.प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा बी.ओ.डी. (बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड) म्हणजे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा कमी करणारे घटक १० एम.जी. प्रती लिटरपेक्षा कमी असतात, तर सध्या नदीत मिसळणाऱ्या काळ्या सांडपाण्याचा बीओडी २०० एम.जी. प्रती लिटरपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. त्यावरून सांडपाणी शुद्धिकरणाचे महत्त्व लक्षात येते. पावसाळ्यात नदी प्रवाहित असते. दृश्य स्वरूपात प्रदूषणाची तीव्रता जाणवत नसल्याने तक्रारींचे प्रमाण कमी असते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत सुस्त व निवांतच असल्याचे चित्र आहे.