शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाकडूनच भूसंपादन मोबदल्याचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST

रमेश पाटील कसबा बावडा : येत्या पंधरा दिवसांत देऊ, महिन्याभरात मिळणार, असे म्हणत तब्बल तीन वर्षे उलटून गेली, तरी ...

रमेश पाटील

कसबा बावडा : येत्या पंधरा दिवसांत देऊ, महिन्याभरात मिळणार, असे म्हणत तब्बल तीन वर्षे उलटून गेली, तरी कसबा बावड्यातील नवीन पुलासाठी जमीन भूसंपादन झालेल्या ५५ शेतकऱ्यांना अद्यापही भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. भूसंपादन मोबदल्यासाठी अधिकाऱ्यांच्या कित्येक बैठकांनी शेतकऱ्यांनी केवळ आशेवर ठेवल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोबदल्यासाठी प्रशासनाने बैठका, आश्वासनांचा खेळ मांडल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. भूसंपादन मोबदल्याची रक्कम सुमारे पावणेदोन कोटी रुपयांच्या घरात आहे. पैसे हातात पडल्याशिवाय पुलाच्या पुढील रस्त्याच्या कामाला सुरुवात करू नका, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

'कोल्हापूर बंधारा' अशी राज्यभर ओळख करून देणारा राजाराम बंधारा कसबा बावड्यात पंचगंगा नदीवर १९२८ मध्ये बांधला गेला. पाणी अडवणे व गरजेनुसार खालील पात्रात पाणी सोडण्यासाठी या बंधाऱ्याची बांधणी करण्यात आली. मात्र बंधाऱ्याची उंची खूपच कमी असल्याने या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा निर्णय झाला. २०१७ ला पुलाच्या कामाची वर्कऑर्डर निघाली; मात्र जमिनी भूसंपादनाचा प्रश्न उपस्थित झाल्याने हे काम रेंगाळले गेले. या पुलासाठी एकूण १३ गट नंबरमधील ५५ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत.

या पुलाचे कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्याजवळ २०१७ पासून बांधकाम सुरू आहे. जेव्हा पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याचे जमीन भूसंपादनसाठी मोजमाप सुरू होते; तेव्हा संबंधित शेतकऱ्यांनी आधी भूसंपादनाचा मोबदला द्या आणि मगच जमिनी ताब्यात घ्या, अशी भूमिका घेतली होती. मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक बांधकामने या पुलाच्या कामाला सुरुवात केली. या कामाला शेतकऱ्यांनी विरोध केला असला तरी, हे काम सुरूच आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक...पुढे काय

बावडा-वडणगे-निगवे गावातील भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांना दीड महिन्यापूर्वी त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या हालचाली सार्वजनिक बांधकामकडून सुरू झाल्या होत्या. तसेच भूसंपादनाचा मोबदला मिळावा म्हणून दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. बैठकीत संबंधित शेतकऱ्यांना त्वरित भूसंपादनाची रक्कम अदा करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या होत्या. रेडिरेकनरप्रमाणे त्यांना मोबदला देण्यात येणार होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने याला हिरवा कंदील दाखवल्याने पैसे लवकर मिळतील, असा आशावाद शेतकऱ्यांना होता; पण तब्बल दोन महिने झाले, तरी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेले नाहीत.

दप्तर दिरंगाईचा फटका

वास्तविक हे पैसे तीन वर्षांपूर्वी म्हणजेच पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी मिळायला हवे होते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पुलासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला द्यावा, असे लेखी आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रांत कार्यालयाला व प्रांत कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकामला मिळाल्याशिवाय सर्वजनिक बांधकाम संबंधित शेतकऱ्यांना पैसे देऊ शकत नाही. मोबदल्याची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्राप्त झाली आहे. जमिनीचे खरेदी व्यवहार करून पैसे देण्याचे लेखी आदेश प्राप्त न झाल्याने सार्वजनिक बांधकाम गप्प आहे. शासकीय कामाच्या दप्तर दिरंगाईचा फटका मात्र इकडे शेतकऱ्यांना बसत आहे.

फोटो: ०३ बावडा मोबदला

कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ नवीन बांधण्यात येत असलेला पूल.