शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

नगररचनाचे गायकवाड यांनी मागितली लाख रुपयांची लाच; निंबाळकर गृहनिर्माणचा आरोप : हातकणंगलेतील अंतिम रेखांकनाची फाईल नऊ महिने पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:24 IST

कोल्हापूर : हातकणंगले नगरपालिका हद्दीतील रघुजानकी मंगल कार्यालयासमोरील विठ्ठलराव नाईक निंबाळकर सहकारी गृहनिर्माण संस्थेची अंतिम रेखांकन मंजुरीची फाईल गेली ...

कोल्हापूर : हातकणंगले नगरपालिका हद्दीतील रघुजानकी मंगल कार्यालयासमोरील विठ्ठलराव नाईक निंबाळकर सहकारी गृहनिर्माण संस्थेची अंतिम रेखांकन मंजुरीची फाईल गेली नऊ महिने येथील नगररचना सहायक संचालक प्रसाद गायकवाड यांच्या कार्यालयात पडून आहे. संस्थेचे सचिव व जिल्हा बँकेचे अधिकारी शिवाजीराव शिंदे यांनी हातकणंगले तहसीलदारांसमोर गायकवाड यांनी आपल्याकडे लाख रुपयांची लाच मागितल्याचे प्रतिज्ञापत्र केले आहे, त्यामुळे या विषयाला वेगळे वळण लागले आहे. या संस्थेने गायकवाड यांच्याविरोधात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांच्याकडे तक्रार केली आहे. संस्थेचा वाद जिल्हा व उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यानेच रेखांकनास मंजुरी दिली नसल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे.

मुख्यत: हातकणंगले तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्मचारी व पंचगंगा साखर कारखान्याचे कर्मचारी एकत्रित येऊन १६५ लोकांसाठी ही संस्था त्यांनी स्थापन केली आहे. जमिनीचा गट नंबर ६४२ अ असून, एकूण क्षेत्र ५ हेक्टर ६ गुंठे इतके आहे. ही जमीन शेती विभागातून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यानंतर संस्थेने प्रांताधिकारी इचलकरंजी यांच्यामार्फत अंतिम रेखांकनाच्या तांत्रिक शिफारससाठीचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे २५ जून २०१५ ला पाठविला. त्यानंतर शोभादेवी दीनदयाल झंवर यांनी नगररचना कार्यालयाकडे तक्रारी केल्या व दिवाणी न्यायालयात (रे.क.नं२१६-२०१६) दावा दाखल केला. त्यानंतर गायकवाड यांनी गतवर्षी मार्चमध्ये इचलकरंजीच्या सहायक सरकारी वकिलांकडे रेखांकनास अंतिम शिफारस दिल्याने न्यायालयाचा अवमान होईल का, अशी विचारणा केली. त्यावर आपण अंतिम मंजुरी दिल्याने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल असे कोणतेही कारण दिसून येत नाही. मुळातच रेखांकनाच्या अनुषंगाने कार्यालयीन कामकाज थांबविण्याविषयी आदेश नाही. त्यामुळे नियमांना अधीन राहून अंतिम मंजुरी कामी शिफारस करता येईल असा स्पष्ट अभिप्राय दिला. त्यानुसार गायकवाड यांनीच १० जून २०२० ला या सोसायटीकडून ३ लाख ६४ हजार ३२० रुपये जमीन विकास आकार चलनाने ११ जून २०२० ला भरून घेतला. त्यानंतर न्यायालयाने कोणताही आदेश दिलेला नसताना शोभादेवी झंवर यांनी नोटीस दिली म्हणून गायकवाड यांनी सरकारी वकिलांकडून पुन्हा अभिप्राय मागवून हे प्रकरण लोंबकळत ठेवले आहे. आपण त्यांच्याकडे प्रांत कार्यालयाकडे फाईल पाठवावी अशी विनंती करायला गेल्यावर १२ जून २०२० ला त्यांनी माझ्याकडे लाख रुपयांची मागणी केल्याचे संस्थेचे सचिव शिवाजीराव शिंदे यांनी म्हटले आहे.

प्रतित्रापत्रास महत्त्व किती...

या प्रतिज्ञापत्रास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दृष्टीने कायदेशीर कितपत महत्त्व आहे हे लोकमतने जाणून घेतले. या विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रतिज्ञापत्र म्हणजे फक्त आरोप आहे. असा आरोप कोणीही कुणावर करू शकतो. त्याहून जास्त त्याची किंमत नाही. संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडे अधिकाऱ्याने लाच मागितली असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तशी रीतसर तक्रार देऊन त्याची सरकारी पंचांसमक्ष पडताळणी होऊन तथ्य आढळले तरच त्यास महत्त्व आहे. असे प्रतिज्ञापत्र करून तक्रारदार त्याकडे समाजाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो एवढेच त्याला महत्त्व आहे.

शनिवारवाडा लिहून दिला तर...

नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रसाद गायकवाड यांना या आरोपाबद्दल विचारले असता ते म्हणाले, या संस्थेच्या अंतिम रेखांकनास मंजुरी देण्याबाबत सरकारी वकिलांकडून अभिप्राय मागितला होता. त्यांनी अगोदर मंजुरी द्यावी असा अभिप्राय दिला; परंतु नंतर विरोधी तक्रारदाराने आम्हाला नोटीस दिल्यावर परत त्यांचे म्हणणे मागितले. तेव्हा त्यांनी न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतरच मंजुरी द्यावी असे सुचविले. त्यामुळेच ही फाईल प्रलंबित आहे. हा वाद जिल्हा व आता उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कोणी काही प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले याचा अर्थ ते खरेच असते असे नाही. मी तुम्हाला शनिवारवाडा प्रतिज्ञापत्रावर लिहून दिला म्हणून तो तुम्हाला मिळणार आहे का?