शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

नगररचनाचे गायकवाड यांनी मागितली लाख रुपयांची लाच; निंबाळकर गृहनिर्माणचा आरोप : हातकणंगलेतील अंतिम रेखांकनाची फाईल नऊ महिने पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:24 IST

कोल्हापूर : हातकणंगले नगरपालिका हद्दीतील रघुजानकी मंगल कार्यालयासमोरील विठ्ठलराव नाईक निंबाळकर सहकारी गृहनिर्माण संस्थेची अंतिम रेखांकन मंजुरीची फाईल गेली ...

कोल्हापूर : हातकणंगले नगरपालिका हद्दीतील रघुजानकी मंगल कार्यालयासमोरील विठ्ठलराव नाईक निंबाळकर सहकारी गृहनिर्माण संस्थेची अंतिम रेखांकन मंजुरीची फाईल गेली नऊ महिने येथील नगररचना सहायक संचालक प्रसाद गायकवाड यांच्या कार्यालयात पडून आहे. संस्थेचे सचिव व जिल्हा बँकेचे अधिकारी शिवाजीराव शिंदे यांनी हातकणंगले तहसीलदारांसमोर गायकवाड यांनी आपल्याकडे लाख रुपयांची लाच मागितल्याचे प्रतिज्ञापत्र केले आहे, त्यामुळे या विषयाला वेगळे वळण लागले आहे. या संस्थेने गायकवाड यांच्याविरोधात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांच्याकडे तक्रार केली आहे. संस्थेचा वाद जिल्हा व उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यानेच रेखांकनास मंजुरी दिली नसल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे.

मुख्यत: हातकणंगले तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्मचारी व पंचगंगा साखर कारखान्याचे कर्मचारी एकत्रित येऊन १६५ लोकांसाठी ही संस्था त्यांनी स्थापन केली आहे. जमिनीचा गट नंबर ६४२ अ असून, एकूण क्षेत्र ५ हेक्टर ६ गुंठे इतके आहे. ही जमीन शेती विभागातून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यानंतर संस्थेने प्रांताधिकारी इचलकरंजी यांच्यामार्फत अंतिम रेखांकनाच्या तांत्रिक शिफारससाठीचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे २५ जून २०१५ ला पाठविला. त्यानंतर शोभादेवी दीनदयाल झंवर यांनी नगररचना कार्यालयाकडे तक्रारी केल्या व दिवाणी न्यायालयात (रे.क.नं२१६-२०१६) दावा दाखल केला. त्यानंतर गायकवाड यांनी गतवर्षी मार्चमध्ये इचलकरंजीच्या सहायक सरकारी वकिलांकडे रेखांकनास अंतिम शिफारस दिल्याने न्यायालयाचा अवमान होईल का, अशी विचारणा केली. त्यावर आपण अंतिम मंजुरी दिल्याने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल असे कोणतेही कारण दिसून येत नाही. मुळातच रेखांकनाच्या अनुषंगाने कार्यालयीन कामकाज थांबविण्याविषयी आदेश नाही. त्यामुळे नियमांना अधीन राहून अंतिम मंजुरी कामी शिफारस करता येईल असा स्पष्ट अभिप्राय दिला. त्यानुसार गायकवाड यांनीच १० जून २०२० ला या सोसायटीकडून ३ लाख ६४ हजार ३२० रुपये जमीन विकास आकार चलनाने ११ जून २०२० ला भरून घेतला. त्यानंतर न्यायालयाने कोणताही आदेश दिलेला नसताना शोभादेवी झंवर यांनी नोटीस दिली म्हणून गायकवाड यांनी सरकारी वकिलांकडून पुन्हा अभिप्राय मागवून हे प्रकरण लोंबकळत ठेवले आहे. आपण त्यांच्याकडे प्रांत कार्यालयाकडे फाईल पाठवावी अशी विनंती करायला गेल्यावर १२ जून २०२० ला त्यांनी माझ्याकडे लाख रुपयांची मागणी केल्याचे संस्थेचे सचिव शिवाजीराव शिंदे यांनी म्हटले आहे.

प्रतित्रापत्रास महत्त्व किती...

या प्रतिज्ञापत्रास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दृष्टीने कायदेशीर कितपत महत्त्व आहे हे लोकमतने जाणून घेतले. या विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रतिज्ञापत्र म्हणजे फक्त आरोप आहे. असा आरोप कोणीही कुणावर करू शकतो. त्याहून जास्त त्याची किंमत नाही. संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडे अधिकाऱ्याने लाच मागितली असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तशी रीतसर तक्रार देऊन त्याची सरकारी पंचांसमक्ष पडताळणी होऊन तथ्य आढळले तरच त्यास महत्त्व आहे. असे प्रतिज्ञापत्र करून तक्रारदार त्याकडे समाजाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो एवढेच त्याला महत्त्व आहे.

शनिवारवाडा लिहून दिला तर...

नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रसाद गायकवाड यांना या आरोपाबद्दल विचारले असता ते म्हणाले, या संस्थेच्या अंतिम रेखांकनास मंजुरी देण्याबाबत सरकारी वकिलांकडून अभिप्राय मागितला होता. त्यांनी अगोदर मंजुरी द्यावी असा अभिप्राय दिला; परंतु नंतर विरोधी तक्रारदाराने आम्हाला नोटीस दिल्यावर परत त्यांचे म्हणणे मागितले. तेव्हा त्यांनी न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतरच मंजुरी द्यावी असे सुचविले. त्यामुळेच ही फाईल प्रलंबित आहे. हा वाद जिल्हा व आता उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कोणी काही प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले याचा अर्थ ते खरेच असते असे नाही. मी तुम्हाला शनिवारवाडा प्रतिज्ञापत्रावर लिहून दिला म्हणून तो तुम्हाला मिळणार आहे का?