शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

राजकीय इच्छाशक्तीवरच भवितव्य

By admin | Updated: June 8, 2017 01:06 IST

पंचगंगा प्रदूषण प्रश्न : जिल्हा परिषदेच्या प्रस्तावाला कुणीच वाली नाही

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेली सहा-सात वर्षे पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी जिल्हा परिषद अहवाल तयार करीत आहे आणि मुंबई, दिल्लीला पाठवित आहे. आता पुन्हा १०८ कोटींवरून ९४ कोटी ५० लाखांचा नवा आराखडा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाला पाठविण्यात आला आहे. मात्र, केवळ आणि केवळ राजकीय इच्छाशक्तीमुळेच हा प्रस्ताव मंजूर होऊ शकेल. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनीच याबाबतीत पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एवढे जरी काम केले तरी ते भरीव असे योगदान ठरणार आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही आणि न्यायालयाने तसे आदेश दिल्यानंतरही गेल्या साडेचार वर्षांत या प्रकल्पासाठी निधी लागला नाही हे वास्तव आहे. जिल्हा परिषदेने याबाबत जे काही करणे शक्य होते ते सर्व केले आहे. गेल्या चार वर्षांत जिल्हा परिषदेने गणेशमूर्ती आणि निर्माल्य नदीत विसर्जित होऊ नये यासाठी अथक प्रयत्न केले. सुमारे पावणेदोन लाख गणेशमूर्ती व १०० ट्रॉली निर्माल्य नदीबाहेर संकलित केले गेले. अनेक स्वच्छता मोहिमा हाती घेतल्या. स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले. तसेच ग्रामस्थांना आवाहन केले. पंचगंगा नदीकाठावरील गावांमधील सरासरी ९० टक्के घरांमध्ये आता शौचालय असल्याने थेट मैलायुक्त पाणी नदीत जाण्याचा विषय संपला आहे. मात्र, गावातील सांडपाणी अजूनही नदीत मिसळत आहे. यासाठी ‘निरी’संस्थेनेही अभ्यास करून ग्रामपंचायतीला झेपेल एवढ्या खर्चाच्या योजना करण्याबाबत सूचना केली होती; परंतु या सर्व नियोजनांमध्ये एकसूत्रता येण्याची गरज आहे.आता प्रदूषण करणाऱ्या गावांमध्ये सांडपाणी वळवून एकत्र आणून ते जमिनीत मुरविणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि पुन्हा ते पाणी गावातील झाडांना किंवा वापरण्यासाठी सोडणे, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या कर्दळींचे किंवा तत्सम वनस्पतींचे प्लॉटस् करून त्यामध्ये हे सांडपाणी सोडायचे. या वनस्पती प्रामुख्याने पाण्यातील टाकाऊ पदार्थ शोषून घेतात. त्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर पुन्हा प्रक्रिया करणे अशा पद्धतीच्या उपाययोजना प्रस्तावामध्ये सुचविण्यात आल्या आहेत. नवा आराखडाकामाचे स्वरूपयेणारा खर्चसांडपाणी व्यवस्थापन७७ कोटी ३८ लाखघनकचरा व्यवस्थापन१३ कोटी ३८ लाखसमाज सहभाग, क्षमता बांधणी१० कोटीएकूण९० कोटी ८७ लाखप्रकल्प सल्ला, विमा व्यवस्थापनइतर खर्च ३ कोटी ६३ लाखएकूण९४ कोटी ५० लाखजागेचा प्रश्न निकाली काढण्याची गरजनिधी मंजूर होण्याआधी प्रत्येक गावात अशा वनस्पतींचे प्लॉटस् तयार करण्यासाठी १० गुंठ्यांपासून ते ५० गुंठ्यांपर्यंत जागेची आवश्यकता आहे. गाव ते नदी या दरम्यान असणाऱ्या जमिनींना मोठे महत्त्व आल्याने यासाठी जागा उपलब्ध होणे अवघड झाले आहे. त्यामुळे गावांमधील जागा मिळविणे हे देखील एक मोठे आव्हान ठरणार आहे. केवळ त्रुटी दूर करण्याचेच कामएखाद्या विभागाने प्रस्तावात त्रुटी दाखवायच्या आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी त्या पूर्ण करण्यासाठी धावपळ करायची, एवढेच काम गेले काही वर्षे सुरू आहे; परंतु त्यासाठी आता नियोजनबद्ध प्रयत्न होण्याची गरज असून, भाजपच्या अध्यक्षा असलेल्या शौमिका महाडिक यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे या प्रश्नाची योग्य मांडणी केली, तर या प्रस्तावाला निधी मिळण्याची शक्यता आहे.