शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

धामणी प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी

By admin | Updated: July 16, 2014 01:02 IST

अजित पवार : काम कधी होईल सांगता येत नाही

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पास निधी कधी मिळणार व त्याचे काम कधी पूर्ण होणार, याचे ठोस उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आज, मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना देता आले नाही. प्रकल्प पूर्ण व्हावा, अशीच आमची राज्य सरकार म्हणून भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु तो कधी होणार, हे मात्र गुलदस्त्यातच राहिले.या प्रकल्पाचा पंचनामा करणारी ‘धामणीचे धरण..पैशांचे कुरण..’ अशी वृत्तमालिका ‘लोकमत’मध्ये गेली चार दिवस सुरू आहे. त्या अनुषंगाने पवार यांच्याकडे विचारणा केली. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी सकाळी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला व त्यामध्ये जी कामे सुरू आहेत ती चांगल्या गुणवत्तेची आहेत का, याची तपासणी करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी अथवा सांगलीच्या वालचंद कॉलेजसारख्या संस्थेला नियुक्त केले जावे, अशी सूचना केली. त्याचा संदर्भ घेऊन पवार यांना धामणी प्रकल्पाच्या रखडलेल्या कामाची विचारणा केली. त्यावर ते म्हणाले, ‘या प्रकल्पाचे काम रखडले आहे, हे मान्यच आहे. परंतु त्यामध्ये काही न्यायालयीन बाबी, पुनर्वसनाचे प्रश्न कारणीभूत आहेत. प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता जादा किमतीअभावी थांबली आहे. कारण रखडलेल्या प्रकल्पांना निधी देण्याबाबत राज्यपालांनी सूत्र निश्चित करून दिले आहे. राज्यातील अशा प्रकल्पांसाठी ३ हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यातील विदर्भ व मराठवाड्यातील प्रकल्पांसाठी प्रत्येकी एक हजार कोटी व उर्वरीत एक हजार कोटी तापी, कोकण व उर्वरित महाराष्ट्रासाठी देण्याचे नियोजन आहे. हा निधी देतानाही राज्यपाल यांनी जलसंपदा, वित्त व नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांची समिती नियुक्त केली आहे. त्यांनी निश्चित करून दिलेल्या सूत्रानुसार निधी दिला जातो. त्यामुळे धामणीसाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी आल्या आहेत.अशा प्रकल्पांना तातडीने काही निधी मिळावा यासाठी आम्ही काही महिन्यांपूर्वी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांचीही भेट घेऊन ६० हजार कोटींची मागणी केली. त्यातून हे प्रकल्प मार्गी लागतील असे प्रयत्न होते. परंतु केंद्र सरकारने हे पैसे उपलब्ध करून देण्यास नकार दिला. महाराष्ट्र सरकारची बाजारातील पत चांगली असल्याने हवे तर तुम्ही खुल्या बाजारातून कर्ज घ्यावे, असे सुचविल्याने केंद्र सरकारचा निधी मिळवण्यास आम्हाला अपयश आले. त्यामुळे या प्रकल्पास निधी देता आलेला नाही, असे पवार यांनी सांगितले.मग हा प्रकल्प पूर्ण होणार तरी आहे की नाही, अशी थेट विचारणा केल्यावर त्यांनी प्रकल्प व्हायलाच पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचे सांगून वेळ मारून नेली. प्रकल्प रखडला की त्याची किंमत दुप्पट, चौप्पट होते, असे सांगून त्यांनी प्रकल्पाच्या वाढलेल्या खर्चाचेही समर्थनच केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, आदी उपस्थित होते.