शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Lok Sabha Election 2019 महिलांचा कौल ठरवणार उमेदवारांचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:40 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशाच्या लोकसंख्येत आणि विकासात बरोबरीचा सहभाग असलेल्या महिला शक्तीचा कौल लोकसभा ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशाच्या लोकसंख्येत आणि विकासात बरोबरीचा सहभाग असलेल्या महिला शक्तीचा कौल लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहे. कोल्हापूर मतदार संघात महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे तर हातकणंगले मतदारसंघात बरोबरीच्या तुलनेने महिला मतदार कमी असले तरी स्त्रीशक्तीचा कौल उमेदवारांवर गुलाल उधळणार की नाही हे ठरवणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते पायाता भिंगरी लावून प्रचार करत आहेत. मिळालेल्या वेळेत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रचारात महिलांचे प्रश्न, महिला आघाड्या आणि कार्यकर्त्यांना अस्तित्वापुरते स्थान असले तरी मतदार म्हणून त्यांची भूमिका उमेदवाराचे भवितव्य विजयात किंवा पराजयात बदलण्याचे सामर्थ्य असणारी आहे. सन २०१४ मध्ये धनंजय महाडिक यांना खासदार करण्यात महिलांचा मोठा वाटा होता या अनुभवानंतर यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच महिला मतदारांना प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्याही कार्यकर्त्यांकडून महिलांमध्ये जोमाने प्रचार सुरू आहे.बदल होतोय...लोकसंख्येच्या ५० टक्के वाटा असलेल्या महिला कुटुंबातले पुरुष सांगतील त्या उमेदवाराच्या चिन्हापुढे बोट लावून यायच्या. आता मात्र त्यांच्यात सारासार विचार करून मतदान करण्याचे व जागरूकतेचे प्रमाण वाढले आहे. प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता हा स्थायीभाव असल्याने महिलांनी एकदा ठरविले की त्या निर्णयापासून ढळत नाहीत. त्यामुळे त्यांची मने जिंकली की यशाचा मार्ग सुकर होतो. दुसरीकडे ग्रामीण भागात विशेषत: अशिक्षित किंवा वाड्या-वस्त्यावरील महिलांचे मत मात्र अजूनही पुरुषांच्याच हाती असल्याचे वास्तव असले तरी बदल होतोय हे नक्की.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक