शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पूरस्थिती ‘जैसे थे’

By admin | Updated: July 14, 2016 01:01 IST

पावसाची विश्रांती : ८४ बंधारे पाण्याखाली; शंभरांवर गावांचा संपर्क तुटलेलाच; धरण क्षेत्रात धुवाधार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूर परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. कोल्हापूरशी तळकोकणाशी असलेला संपर्क अजूनही तुटला असून सहा गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. अद्याप ८४ बंधारे पाण्याखाली असल्याने शंभराहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर ओसरणार असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. गेले पाच दिवस सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. सन २००५ ची पुनरावृत्ती होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती; पण बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला. दिवसभरात अधून-मधून जोरदार सरी कोसळत राहिल्या, पण गेले तीन-चार दिवस असणारा जोर काहीसा कमी झाल्याने कोल्हापूरकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाऊस कमी असला तरी पुराचे पाणी अद्याप ‘जैसे थे’च आहे. इचलकरंजीत पावसामुळे पॉवरलूमची भिंत अंगावर पडून गुरुनाथ गुंटक (इचलकरंजी) यांचा मृत्यू झाला असून इतर ठिकाणी दोन जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. धरण क्षेत्रात अजूनही धुवादार पाऊस सुरू असून, पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरण ७१ टक्के, वारणा ५८, दूधगंगा ३७ टक्के भरले आहे. शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण कोणत्याही क्षणी ‘ओव्हर फ्लो’ होण्याची शक्यता आहे. घटप्रभा धरणातून प्रतिसेकंद ३२५१ तर जांबरे धरणातून १२५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोदे लघु पाटबंधारे पूर्ण क्षमतेने भरला असून त्यातून ६७० घनफूट विसर्ग सुरू असल्याने कुंभी नदीची पातळी ‘जैसे थे’ राहिली आहे. पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, वळिवडे, आंबेवाडी, हातकणंगले तालुक्यातील घुणकी, नीलेवाडी तर शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावांचा संपर्क पूर्णत: तुटला आहे. चौदा नदीवरील ८४ बंधारे अद्याप पाण्याखाली असल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरू असली तरी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. ‘गोकुळ’ला ४० हजार लिटरला फटका गगनबावडा, करवीर तालुक्याचा पश्चिम भाग, राधानगरी, पन्हाळा तालुक्यातील बहुतांशी गावांचा संपर्क तुटल्याने वाहतूक ठप्प आहे. परिणामी दुधाची वाहतूक करता येत नसल्याने ‘गोकुळ’ दूध संघाचे संकलन सुमारे ४० हजार लिटरने कमी झाले आहे पण त्याचा वितरणावर परिणाम दिसत नाही. उन्हामुळे उत्साह माणूस चार दिवस तापाने फणफणला आणि जरा बरे वाटू लागल्यावर बाहेर जाण्याची इच्छा व्हावी, असेच काहीसे वातावरण बुधवारी सकाळी लोकांनी अनुभवले. कारण पहाटेपर्यंत कोसळणारा पाऊस सकाळ झाल्यावर मात्र गायब झाला. लख्ख सूर्यदर्शन झाले. रस्ते कोरडे झाले. वातावरण प्रसन्न झाले. लोकही रेनकोट न घालता कार्यालयाला गेले. बाजारपेठेतही गर्दी झाली. दुपारी बाराच्या सुमारास जोरदार सर आल्याने पाऊस पुन्हा पाठ सोडत नाही, अशी भीती व्यक्त झाली. दुपारनंतर मात्र पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली. दुपारीही चांगले ऊन पडले होते.