शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

पूरस्थिती ‘जैसे थे’

By admin | Updated: July 14, 2016 01:01 IST

पावसाची विश्रांती : ८४ बंधारे पाण्याखाली; शंभरांवर गावांचा संपर्क तुटलेलाच; धरण क्षेत्रात धुवाधार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूर परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. कोल्हापूरशी तळकोकणाशी असलेला संपर्क अजूनही तुटला असून सहा गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. अद्याप ८४ बंधारे पाण्याखाली असल्याने शंभराहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर ओसरणार असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. गेले पाच दिवस सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. सन २००५ ची पुनरावृत्ती होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती; पण बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला. दिवसभरात अधून-मधून जोरदार सरी कोसळत राहिल्या, पण गेले तीन-चार दिवस असणारा जोर काहीसा कमी झाल्याने कोल्हापूरकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाऊस कमी असला तरी पुराचे पाणी अद्याप ‘जैसे थे’च आहे. इचलकरंजीत पावसामुळे पॉवरलूमची भिंत अंगावर पडून गुरुनाथ गुंटक (इचलकरंजी) यांचा मृत्यू झाला असून इतर ठिकाणी दोन जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. धरण क्षेत्रात अजूनही धुवादार पाऊस सुरू असून, पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरण ७१ टक्के, वारणा ५८, दूधगंगा ३७ टक्के भरले आहे. शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण कोणत्याही क्षणी ‘ओव्हर फ्लो’ होण्याची शक्यता आहे. घटप्रभा धरणातून प्रतिसेकंद ३२५१ तर जांबरे धरणातून १२५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोदे लघु पाटबंधारे पूर्ण क्षमतेने भरला असून त्यातून ६७० घनफूट विसर्ग सुरू असल्याने कुंभी नदीची पातळी ‘जैसे थे’ राहिली आहे. पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, वळिवडे, आंबेवाडी, हातकणंगले तालुक्यातील घुणकी, नीलेवाडी तर शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावांचा संपर्क पूर्णत: तुटला आहे. चौदा नदीवरील ८४ बंधारे अद्याप पाण्याखाली असल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरू असली तरी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. ‘गोकुळ’ला ४० हजार लिटरला फटका गगनबावडा, करवीर तालुक्याचा पश्चिम भाग, राधानगरी, पन्हाळा तालुक्यातील बहुतांशी गावांचा संपर्क तुटल्याने वाहतूक ठप्प आहे. परिणामी दुधाची वाहतूक करता येत नसल्याने ‘गोकुळ’ दूध संघाचे संकलन सुमारे ४० हजार लिटरने कमी झाले आहे पण त्याचा वितरणावर परिणाम दिसत नाही. उन्हामुळे उत्साह माणूस चार दिवस तापाने फणफणला आणि जरा बरे वाटू लागल्यावर बाहेर जाण्याची इच्छा व्हावी, असेच काहीसे वातावरण बुधवारी सकाळी लोकांनी अनुभवले. कारण पहाटेपर्यंत कोसळणारा पाऊस सकाळ झाल्यावर मात्र गायब झाला. लख्ख सूर्यदर्शन झाले. रस्ते कोरडे झाले. वातावरण प्रसन्न झाले. लोकही रेनकोट न घालता कार्यालयाला गेले. बाजारपेठेतही गर्दी झाली. दुपारी बाराच्या सुमारास जोरदार सर आल्याने पाऊस पुन्हा पाठ सोडत नाही, अशी भीती व्यक्त झाली. दुपारनंतर मात्र पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली. दुपारीही चांगले ऊन पडले होते.