शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

एकनिष्ठतेचे दिलीप पाटील यांना फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST

रमेश पाटील कसबा बावडा : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीप भगवान पाटील यांची दुसऱ्यांदा ...

रमेश पाटील

कसबा बावडा :

येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीप भगवान पाटील यांची दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. दिलीप पाटील हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे अत्यंत निकटवर्तीय, एकनिष्ठ व विश्वासू मानले जातात. त्यामुळे पाटील यांना एकनिष्ठतेचे फळ मिळाले असल्याची चर्चा आहे.

दिलीप पाटील हे हातकणंगले तालुक्यातील आहेत. हातकणंगले तालुक्यात कारखान्याचे सर्वाधिक सभासद आहेत. यापूर्वी चेअरमनपदाचा राजीनामा दिलेले सर्जेराव माने हे हातकणंगले तालुक्यातीलच होते. त्यामुळे नवीन निवड करताना हातकणंगले तालुका डोळ्यासमोर ठेऊन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीवेळी पॅनलची उभारणी करताना माजी आमदार महादेवराव महाडिक हे प्रत्येक वेळी किमान सात ते आठ नवीन चेहऱ्यांना पॅनलमध्ये संधी देत असत. त्यामुळे एकदा संचालकपदाचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यावर पुढल्या निवडणुकीवेळी आपण पॅनलमध्ये असू किंवा नाही हे ठामपणे कुणालाच सांगता येत नसे. गेली वीस वर्षे सलग दिलीप पाटील व अन्य एक-दोन संचालक अपवाद वगळता अशी संधी कुणालाच मिळाली नाही.

येत्या काही महिन्यांतच राजाराम कारखान्याची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीला सामोरे जाताना विद्यमान चेअरमन अनुभवी, सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा असणे आवश्यक असल्यानेच महाडिक यांच्याकडून दिलीप पाटील यांना संधी दिली गेली. शिवाय हातकणंगले तालुक्यातील सभासदांचाही निवडणुकीत फायदा मिळवण्याच्या दृष्टिकोणातून पाटील यांची वर्णी महत्त्वाची मानली जात आहे.

चौकट : मानेंच्या बदली पाटील

कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरच चेअरमनपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना वयोमान आणि प्रकृतीमुळे आपणास जमत नसल्याचे कारण त्यांनी दिले होते. परंतु त्याचवेळी पुढील दिशा ज्या त्या वेळी ठरवली जाईल, असा सूचक इशाराही दिला होता. माने यांचा अनुभव पाहता निवडणुकीच्या तोंडावर तोडीस तोड माणूसच चेअरमनपदाच्या खुर्चीवर असणे गरजेचे वाटल्याने महादेवराव महाडिक यांनी दिलीप पाटील यांच्या गळ्यात चेअरमनपदाची माळ घातली.