शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

एफआरपीसाठी १६ रोजी मोर्चा

By admin | Updated: September 29, 2015 00:54 IST

राजू शेट्टी : दराचे तुकडे केले तर हातात दांडके

सांगली / शिरोळ : कायद्यातील तरतुदीप्रमाणे एफआरपी एकरकमी द्यायला हवी. जर एफआरपीचे तुकडे केले, तर साखर कारखानदार आणि सरकारविरोधात हाती दांडके घेऊन पुन्हा ताकद दाखवावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला. साखर सहसंचालकांच्या कोल्हापुरातील कार्यालयावर १६ आॅक्टोबरला मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, साखर कारखानदारांनी सर्वसाधारण सभेत ठराव करून एफआरपी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक सर्वसाधारण सभांना पहिल्या रांगांमध्ये पोसलेले गुंड व टगेच बसविले जातात. त्यामुळे खऱ्या शेतकरी सभासदाला कधीच मत मांडता येत नाही. त्यामुळे अशा ठरावांविरोधात आम्ही शेतकऱ्यांच्या अर्जांची मोहीम सुरू करणार आहोत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात असे अर्ज पोहोच केले जातील. एकरकमी एफआरपी न देणाऱ्या संचालकांवर कारवाई करण्याची मागणी या अर्जाद्वारे केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना हा अर्ज भरायचा नाही, त्यांनी खुशाल चार किंवा पाच हप्त्यात एफआरपी घ्यावी. कारखान्यांच्या ठरावानुसार सरकार निर्णय घेणार, की शेतकऱ्यांच्या अर्जानुसार, हे आम्हाला पाहायचे आहे. नियमानुसार एफआरपीचे तुकडे पाडता येत नाहीत. तरीही जर तुकडे पाडलेच, तर आम्ही सरकारला व कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी हाती दांडके घेऊ. केंद्र शासनाने एकदा शेतकऱ्यांचा हिसका पाहिला आहे, त्यामुळे ते पुन्हा आमच्या नादी लागतील, असे वाटत नाही. कोल्हापुरात होणारे आंदोलन नंतर राज्यभरात छेडले जाईल. विभागीय सहसंचालकांकडे मोर्चे काढून राज्यभर या प्रश्नावर आम्ही लढा पुकारणार आहोत. बांधावर शेतकऱ्यांना माल विकण्याची मुभा मिळाल्यानंतर कोणी बोटे मोडायचे कारण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल, तर अशा निर्णयांना आमचा पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)निर्यातीचे धोरण हवेहंगाम संपल्यानंतर निर्यातीचे धोरण ठरवून उपयोग नाही. हंगामापूर्वीच सरकारने याबाबतचे धोरण ठरवावे, अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.