शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

गतवेळी साडेचार टक्के मतदान, आता सत्तेच्या रेसमध्ये

By admin | Updated: October 6, 2015 01:11 IST

भाजपची वाटचाल : या निवडणुकीत हवा; पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला; केंद्रात-राज्यातील सत्तेचा फायदा ले खा जो खा भाजप

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज, मंगळवारपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्याच गतनिवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाची ताकद किती होती आणि आता त्यात नेमका काय बदल झाला आहे, याचा लेखाजोखा मांडणारी विश्लेषणात्मक राजकीय वृत्तमालिका आजपासून...(उद्याच्या अंकात शिवसेना)विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरमहापालिकेच्या गतनिवडणुकीत आता राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला तेव्हा कशीबशी १३ हजार १०४ (साडेचार टक्केच) मते मिळाली होती. त्यांचे तिघे उमेदवार निवडून आले होते. भाजप म्हणजे विशिष्ट जातीचे प्राबल्य असलेला पक्ष, संघटनात्मक बांधणीकडे झालेले दुर्लक्ष आणि जिल्ह्यातील कोणतीच राजकीय सत्ता हाती नसल्याने या पक्षाच्या महापालिकेतील वाढीलाही मर्यादा पडल्याचे वास्तव होते. आता ही साडेचार टक्क्यांची नामुष्की मागे टाकून महापालिकेचीच सत्ता काबीज करण्यासाठी हा पक्ष सरसावला आहे. महापालिकेच्या २०१०च्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती झाली होती. हे दोन्ही पक्ष त्यावेळी राज्यात व केंद्रातही विरोधात होते. दोन्ही पक्षांची युतीही भक्कम होती. या दोन पक्षांत जागांसाठी बरीच रस्सीखेच झाल्यानंतर भाजपच्या वाट्याला २३ जागा आल्या होत्या; तर चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्यावेळी तत्कालीन आमदार चंद्रकांतदादा पाटील व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते.या निवडणुकीला सामोरा जाताना भाजपची ताकद सर्वच बाबतींत वाढली आहे. या पक्षाचे जिल्ह्यात आता तीन आमदार आहेत. त्याशिवाय महत्त्वाची पाच खाती असलेले कॅबिनेट मंत्रिपद चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आहे. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे केंद्रात व राज्यात भाजपची एकहाती सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. ज्या भाजपची गेल्या निवडणुकीत १३ हजारांचा पल्ला गाठतानाही दमछाक झाली, त्याच पक्षाचे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश जाधव यांना तब्बल ४० हजार मते मिळाली. कोल्हापूर दक्षिणमधून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करून भाजपमुळेच नवखे अमल महाडिक आमदार म्हणून निवडून आले. राज्यात सत्ता आल्यामुळे कार्यकर्त्यांचाही ओघ पक्षाकडे वाढला आहे. त्यामुळेच या निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीकडे कोल्हापूरसह राज्याचे लक्ष आहे.भाजप राज्यात सत्तेत आल्यानंतर वर्षपूर्तीनंतर कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील निवडणूक होत आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभेला जे लोकमानस होते, तेच अजूनही कायम आहे की त्यात बदल झाला आहे, याचीही लिटमस टेस्ट या निवडणुकीमुळे होत आहे. म्हणूनच भाजपला या निवडणुकीत काही करून सत्ता हवी आहे. येथील भाजपचे यशापयश हे चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रतिष्ठेशी जोडले जाणार आहे. मग हे एकट्या भाजपच्या जिवावर शक्य नाही म्हणून त्यांनी ताराराणी आघाडीशी युती करून आव्हानात हवा भरली आहे. आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक यांच्या मदतीने भाजपचे कमळ महापालिकेत फुलविण्याची ही रणनीती आहे.