शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

गतवेळी साडेचार टक्के मतदान, आता सत्तेच्या रेसमध्ये

By admin | Updated: October 6, 2015 01:11 IST

भाजपची वाटचाल : या निवडणुकीत हवा; पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला; केंद्रात-राज्यातील सत्तेचा फायदा ले खा जो खा भाजप

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज, मंगळवारपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्याच गतनिवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाची ताकद किती होती आणि आता त्यात नेमका काय बदल झाला आहे, याचा लेखाजोखा मांडणारी विश्लेषणात्मक राजकीय वृत्तमालिका आजपासून...(उद्याच्या अंकात शिवसेना)विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरमहापालिकेच्या गतनिवडणुकीत आता राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला तेव्हा कशीबशी १३ हजार १०४ (साडेचार टक्केच) मते मिळाली होती. त्यांचे तिघे उमेदवार निवडून आले होते. भाजप म्हणजे विशिष्ट जातीचे प्राबल्य असलेला पक्ष, संघटनात्मक बांधणीकडे झालेले दुर्लक्ष आणि जिल्ह्यातील कोणतीच राजकीय सत्ता हाती नसल्याने या पक्षाच्या महापालिकेतील वाढीलाही मर्यादा पडल्याचे वास्तव होते. आता ही साडेचार टक्क्यांची नामुष्की मागे टाकून महापालिकेचीच सत्ता काबीज करण्यासाठी हा पक्ष सरसावला आहे. महापालिकेच्या २०१०च्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती झाली होती. हे दोन्ही पक्ष त्यावेळी राज्यात व केंद्रातही विरोधात होते. दोन्ही पक्षांची युतीही भक्कम होती. या दोन पक्षांत जागांसाठी बरीच रस्सीखेच झाल्यानंतर भाजपच्या वाट्याला २३ जागा आल्या होत्या; तर चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्यावेळी तत्कालीन आमदार चंद्रकांतदादा पाटील व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते.या निवडणुकीला सामोरा जाताना भाजपची ताकद सर्वच बाबतींत वाढली आहे. या पक्षाचे जिल्ह्यात आता तीन आमदार आहेत. त्याशिवाय महत्त्वाची पाच खाती असलेले कॅबिनेट मंत्रिपद चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आहे. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे केंद्रात व राज्यात भाजपची एकहाती सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. ज्या भाजपची गेल्या निवडणुकीत १३ हजारांचा पल्ला गाठतानाही दमछाक झाली, त्याच पक्षाचे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश जाधव यांना तब्बल ४० हजार मते मिळाली. कोल्हापूर दक्षिणमधून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करून भाजपमुळेच नवखे अमल महाडिक आमदार म्हणून निवडून आले. राज्यात सत्ता आल्यामुळे कार्यकर्त्यांचाही ओघ पक्षाकडे वाढला आहे. त्यामुळेच या निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीकडे कोल्हापूरसह राज्याचे लक्ष आहे.भाजप राज्यात सत्तेत आल्यानंतर वर्षपूर्तीनंतर कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील निवडणूक होत आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभेला जे लोकमानस होते, तेच अजूनही कायम आहे की त्यात बदल झाला आहे, याचीही लिटमस टेस्ट या निवडणुकीमुळे होत आहे. म्हणूनच भाजपला या निवडणुकीत काही करून सत्ता हवी आहे. येथील भाजपचे यशापयश हे चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रतिष्ठेशी जोडले जाणार आहे. मग हे एकट्या भाजपच्या जिवावर शक्य नाही म्हणून त्यांनी ताराराणी आघाडीशी युती करून आव्हानात हवा भरली आहे. आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक यांच्या मदतीने भाजपचे कमळ महापालिकेत फुलविण्याची ही रणनीती आहे.