शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

चार वर्षांनी नव्या स्थानकात बस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2015 00:12 IST

वाठारस्टेशन : गावच्या राजकारणातून वापराविना पडलेली सुसज्ज इमारत कार्यरत; प्रवाशांची मात्र पाठ

वाठार स्टेशन : सातारा-लोणंद या प्रमुख राज्यमार्गावर वाठार स्टेशन येथे चार वर्षांपूर्वी ३४ लाख खर्च करून बांधलेले सुसज्य बसस्थानक उद्घाटनानंतरही बंद होते. बसस्थानक सुरू व्हावी, अशी अनेक प्रवाशांची मागणी असतानाही गावच्या राजकारणामुळे हे बसस्थानक बंद होते. आमदार दीपक चव्हाण यांनी विशेष लक्ष घातल्याने आता हे नवीन बसस्थानक सुरू झाले आहे. ब्रिटिीशकाळापासूनच रेल्वेच्या हद्दीत छोट्या जागेत असलेल्या एसटी बसस्थानकात प्रवाशांना मूलभूत सोयी उपलब्ध नसल्याने तसेच रेल्वे गेट, वडाप व अरुंद रस्त्यामुळे सातारा-लोणंद राज्यमार्गावर नवीन बसस्थानकाचा प्रस्ताव गावातील काही ग्रामस्थांनी दिला होता. एसटी व रेल्वे बसस्थानकामुळेच येथील व्यावसायिकांना रोजगार मिळत असल्याने हे बसस्थानक बंद करूनये, असा प्रस्ताव काही व्यापारी बांधवांनी दिल्याने वाठार स्टेशनच्या नव्या बसस्थानकाचा वाद न्यायालयात गेला. यावर मुंबई उच्च न्यायालयाने नवीन बसस्थानक हे सातारा-लोणंद मार्गावर तत्काळ बांधण्याचा आदेश एसटीला दिला. यानंतर महामंडळाने या ठिकाणी नवीन सुसज्य बसस्थानक उभारले. बसस्थानक पूर्ण झाल्यानंतर या उद्घाटनास सरपंचानाच निमंत्रण न दिल्याने सरपंचांनी तत्कालीन विभाग नियंत्रक अनंत मुंडीवाले यांच्या गाडीच्या काचा फोडत विरोध केला. यानंतर पुन्हा या बसस्थानकाचे उद्घाटन वाठार स्टेशनच्या सरपंचांच्याच हस्ते झाले; परंतु यावेळी हे बसस्थानक सुरू करा; जुने बसस्थानक कायम चालू ठेवावे, असा इशाराही दिला.त्यानंतर काही दिवस हे बसस्थानक सुरू झाले; मात्र चालक स्थानकात जाण्यास कंटाळा करूलागल्याने हे बसस्थानक बंद पडले. आमदार दीपक चव्हाण यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन हे नवीन बसस्थानक सुरू करण्याबाबत निवेदन दिले. त्यानंतर नव्या बसस्थानकाचा मार्ग मोकळा झाला. (वार्ताहर)दोन्ही ठिकाणी नियंत्रकाची मागणीबसस्थानकात कोरेगाव,सातारा, फलटण, पारगाव-खंडाळा, वाई या आगाराच्या पन्नास बसेस दररोज ये-जा करत आहेत. मात्र, या बसस्थानकाबाबत अजूनही प्रवाशांची विश्वासार्हता नसल्याने प्रवासी थांबत थांबत नाहीत. नवीन बसस्थानकाबरोबरच जुन्या बसस्थानकात एसटीने रेल्वे कडून जागा घेऊन मूलभूत सोयी पुरवाव्यात व दोन्ही बसस्थानकात स्वतंत्र वाहतूक नियंत्रक करावा. नवीन बसस्थानकात सध्या केवळ सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत तात्पुरता वाहतूक नियंत्रक असून, या ठिकाणी सायंकाळी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.