शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

चार वर्षांनी नव्या स्थानकात बस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2015 00:12 IST

वाठारस्टेशन : गावच्या राजकारणातून वापराविना पडलेली सुसज्ज इमारत कार्यरत; प्रवाशांची मात्र पाठ

वाठार स्टेशन : सातारा-लोणंद या प्रमुख राज्यमार्गावर वाठार स्टेशन येथे चार वर्षांपूर्वी ३४ लाख खर्च करून बांधलेले सुसज्य बसस्थानक उद्घाटनानंतरही बंद होते. बसस्थानक सुरू व्हावी, अशी अनेक प्रवाशांची मागणी असतानाही गावच्या राजकारणामुळे हे बसस्थानक बंद होते. आमदार दीपक चव्हाण यांनी विशेष लक्ष घातल्याने आता हे नवीन बसस्थानक सुरू झाले आहे. ब्रिटिीशकाळापासूनच रेल्वेच्या हद्दीत छोट्या जागेत असलेल्या एसटी बसस्थानकात प्रवाशांना मूलभूत सोयी उपलब्ध नसल्याने तसेच रेल्वे गेट, वडाप व अरुंद रस्त्यामुळे सातारा-लोणंद राज्यमार्गावर नवीन बसस्थानकाचा प्रस्ताव गावातील काही ग्रामस्थांनी दिला होता. एसटी व रेल्वे बसस्थानकामुळेच येथील व्यावसायिकांना रोजगार मिळत असल्याने हे बसस्थानक बंद करूनये, असा प्रस्ताव काही व्यापारी बांधवांनी दिल्याने वाठार स्टेशनच्या नव्या बसस्थानकाचा वाद न्यायालयात गेला. यावर मुंबई उच्च न्यायालयाने नवीन बसस्थानक हे सातारा-लोणंद मार्गावर तत्काळ बांधण्याचा आदेश एसटीला दिला. यानंतर महामंडळाने या ठिकाणी नवीन सुसज्य बसस्थानक उभारले. बसस्थानक पूर्ण झाल्यानंतर या उद्घाटनास सरपंचानाच निमंत्रण न दिल्याने सरपंचांनी तत्कालीन विभाग नियंत्रक अनंत मुंडीवाले यांच्या गाडीच्या काचा फोडत विरोध केला. यानंतर पुन्हा या बसस्थानकाचे उद्घाटन वाठार स्टेशनच्या सरपंचांच्याच हस्ते झाले; परंतु यावेळी हे बसस्थानक सुरू करा; जुने बसस्थानक कायम चालू ठेवावे, असा इशाराही दिला.त्यानंतर काही दिवस हे बसस्थानक सुरू झाले; मात्र चालक स्थानकात जाण्यास कंटाळा करूलागल्याने हे बसस्थानक बंद पडले. आमदार दीपक चव्हाण यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन हे नवीन बसस्थानक सुरू करण्याबाबत निवेदन दिले. त्यानंतर नव्या बसस्थानकाचा मार्ग मोकळा झाला. (वार्ताहर)दोन्ही ठिकाणी नियंत्रकाची मागणीबसस्थानकात कोरेगाव,सातारा, फलटण, पारगाव-खंडाळा, वाई या आगाराच्या पन्नास बसेस दररोज ये-जा करत आहेत. मात्र, या बसस्थानकाबाबत अजूनही प्रवाशांची विश्वासार्हता नसल्याने प्रवासी थांबत थांबत नाहीत. नवीन बसस्थानकाबरोबरच जुन्या बसस्थानकात एसटीने रेल्वे कडून जागा घेऊन मूलभूत सोयी पुरवाव्यात व दोन्ही बसस्थानकात स्वतंत्र वाहतूक नियंत्रक करावा. नवीन बसस्थानकात सध्या केवळ सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत तात्पुरता वाहतूक नियंत्रक असून, या ठिकाणी सायंकाळी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.