शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

‘आंबेओहळ’च्या रूपाने उत्तूर विभागाचे पांग फेडता आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आंबेओहळ प्रकल्पात पहिल्यांदाच ३० टक्के पाणी साठले असून या प्रकल्पाच्या रूपाने उत्तूर विभागातील जनतेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : आंबेओहळ प्रकल्पात पहिल्यांदाच ३० टक्के पाणी साठले असून या प्रकल्पाच्या रूपाने उत्तूर विभागातील जनतेचे पांग फेडण्याची संधी परमेश्वराने आपणास दिली, अशी कृतज्ञतेची भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागामुळे व अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा प्रकल्प पुर्णत्वाला गेला असून लवकरच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पाणीपूजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कृष्णा खोरे लवादाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याचे एक थेंबही पाणी गेल्या दहा वर्षात अडवले नव्हते. आंबेओहळ प्रकल्पाच्या रूपाने हे पाणी अडविण्यात यश मिळाले. आंबेओहळच्या शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे वचन आपण दिले होते. त्यासाठी सोमवारपासून महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावून उर्वरित पुनर्वसन तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

यावेळी उपजिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी विजया पांगारकर, जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे आदी उपस्थित होते.

महसूल, जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार

‘आंबेओहळ’ प्रकल्पाचे काम गतीने व चिकाटीने पूर्ण केल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात उपजिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी विजया पांगारकर, जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे या अधिकाऱ्यांचा कृतज्ञतापर सत्कार करून कौतुक केले.

दृष्टिक्षेपात ‘आंबेओहळ’प्रकल्प-

साठवणूक क्षमता - १२५० एमसीएफटी

सिंचनाखाली येणारी जमीन- ६ हजार हेक्टर

बंधाऱ्यांचे काम - सहा बंधारे पूर्ण, एकाचे अंतिम टप्प्यात काम

जमिनीची गरज - ३८ हेक्टर

जमिनीची मागणी करणारे शेतकरी- ३५

पॅकेजची मागणी करणारे शेतकरी -३१

फोटो ओळी -

१) आंबेओहळ प्रकल्पात यंदा पहिल्यांदाच पाणी साठवण्यात आले, याबद्दल उपजिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी विजया पांगारकर, जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे या अधिकाऱ्यांचा कृतज्ञता सत्कार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. (फोटो-१८०६२०२१-कोल-आंबेओहळ०१)

२) आंबेओहळ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसामुळे प्रकल्पात पहिल्यांदाच ३० टक्के पाणी साठले आहे. (फोटो-१८०६२०२१-कोल-आंबेओहळ)