शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

स्टार १११७ कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांच्या मदतीचा मेसेज बनावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:51 IST

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना चार लाख ...

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये देण्यात येणार असल्याचा समाजमाध्यमावरील मेसेज बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्यावर्षीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने उच्छाद मांडला असून पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूची संख्या वाढली आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ९९९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील १ लाख ९६ हजार ८२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५ हजार ७०० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १४७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना खर्चही मोठा आलेला असतो. शासकीय रुग्णालयात जे रुग्ण दाखल केले जातात त्या ठिकाणी फारसा खर्च येत नाही. मात्र, खाजगी रुग्णालयातील बिले भरता भरता नातेवाइकांना नाकी नऊ आल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक जणांचा मृत्यू झाला तरी त्यांची खाजगी रुग्णालयातील बिले पाच, सहा लाख झाल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे हवालदिल झालेल्या अनेक नागरिकांना हा चार लाखांचा मेसेज दिलासा देणारा ठरत आहे; परंतु त्याची सत्य माहिती नसल्याने अनेक जण कागदपत्रांची जुळणी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चौकशी करत आहेत. मात्र, हा मेसेजच बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

चौकट

काय आहे मेसेज

केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये देण्यात येणार आहेत, असा हा मेसेज आहे. यासाठी करावयाचा अर्ज, न्यायालयाचा निकाल, मंत्रालयाचे पत्रही जोडण्यात आले आहे. ही सर्व कागदपत्रे आणि अर्ज भरून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावा, अशी सूचनाही या मेसेजमध्ये करण्यात आली आहे.

चौकट

रोज फोनवरून चौकशी सुरूच

रोज कोणी ना कोणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे याबाबत फोनवरून चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगण्यात येत आहे. काही जण अर्जही घेऊन येत आहेत. मात्र, योजनाचा नसल्याने त्यांचे अर्जही स्वीकारले जात नसल्याचे सांगण्यात आले.

कोट

अशी कोणतीही योजना नाही

केंद्र शासनाची अशी कोणतीही योजना नाही. त्यामुळे नागरिकांनी बनावट मेसेज वाचून अर्ज दाखल करू नये. तसेच कोणी अशा पद्धतीने मदत मिळवून देतो, असे सांगितले तरी या भूलथापांना बळी पडू नये. केंद्र किंवा राज्य शासनाची अशी कोणीतीही योजना नसल्याने नागरिकांनी अशा मेसेजना बळी पडू नये.

-प्रसाद संकपाळ

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,

जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर