शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

स्टार १११७ कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांच्या मदतीचा मेसेज बनावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:51 IST

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना चार लाख ...

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये देण्यात येणार असल्याचा समाजमाध्यमावरील मेसेज बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्यावर्षीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने उच्छाद मांडला असून पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूची संख्या वाढली आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ९९९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील १ लाख ९६ हजार ८२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५ हजार ७०० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १४७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना खर्चही मोठा आलेला असतो. शासकीय रुग्णालयात जे रुग्ण दाखल केले जातात त्या ठिकाणी फारसा खर्च येत नाही. मात्र, खाजगी रुग्णालयातील बिले भरता भरता नातेवाइकांना नाकी नऊ आल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक जणांचा मृत्यू झाला तरी त्यांची खाजगी रुग्णालयातील बिले पाच, सहा लाख झाल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे हवालदिल झालेल्या अनेक नागरिकांना हा चार लाखांचा मेसेज दिलासा देणारा ठरत आहे; परंतु त्याची सत्य माहिती नसल्याने अनेक जण कागदपत्रांची जुळणी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चौकशी करत आहेत. मात्र, हा मेसेजच बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

चौकट

काय आहे मेसेज

केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये देण्यात येणार आहेत, असा हा मेसेज आहे. यासाठी करावयाचा अर्ज, न्यायालयाचा निकाल, मंत्रालयाचे पत्रही जोडण्यात आले आहे. ही सर्व कागदपत्रे आणि अर्ज भरून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावा, अशी सूचनाही या मेसेजमध्ये करण्यात आली आहे.

चौकट

रोज फोनवरून चौकशी सुरूच

रोज कोणी ना कोणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे याबाबत फोनवरून चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगण्यात येत आहे. काही जण अर्जही घेऊन येत आहेत. मात्र, योजनाचा नसल्याने त्यांचे अर्जही स्वीकारले जात नसल्याचे सांगण्यात आले.

कोट

अशी कोणतीही योजना नाही

केंद्र शासनाची अशी कोणतीही योजना नाही. त्यामुळे नागरिकांनी बनावट मेसेज वाचून अर्ज दाखल करू नये. तसेच कोणी अशा पद्धतीने मदत मिळवून देतो, असे सांगितले तरी या भूलथापांना बळी पडू नये. केंद्र किंवा राज्य शासनाची अशी कोणीतीही योजना नसल्याने नागरिकांनी अशा मेसेजना बळी पडू नये.

-प्रसाद संकपाळ

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,

जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर