शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
3
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
4
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
5
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
6
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
7
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
8
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
9
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
10
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
11
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
12
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
13
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
14
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
15
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
16
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
17
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
18
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
19
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
20
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?

‘वनीकरण तुमचं आणि मरण आमचं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारुण : वाडवडिलांपासून कसत असलेल्या व प्रामुख्याने वहिवाट असणाऱ्या डोंगर रानात वनविभागाने प्रादेशिक वनीकरणाचे काम सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शित्तूर-वारुण :

वाडवडिलांपासून कसत असलेल्या व प्रामुख्याने वहिवाट असणाऱ्या डोंगर रानात वनविभागाने प्रादेशिक वनीकरणाचे काम सुरू केले असल्याने शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) पैकी ढवळेवाडी, विठ्ठलाई वाडा व तळीचा वाडा येथील ग्रामस्थांनी या कामास तीव्र विरोध केला आहे. ‘आधी आम्हाला या खड्ड्यांमध्ये गाढा व मगच सुरू असलेले हे बेकायदेशीर वनीकरण करा’ असा पावित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला.

वाडवडिलांपासून चालत आलेली व कूळ म्हणून कसत असलेली जमीन ही मूळ मालकाच्याच नावे राहिल्याने व मूळ मालक मृत पावल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या हाती कागदोपत्री कोणताच पुरावा? नाही. जिवंत असलेली हाडामासाची माणसं एवढाच काय तो पुरावा? ‘तुमची जमीन असल्याचा कागदोपत्री पुरावा? दाखवा’ या वन विभागाच्या प्रश्नाने जिवंत असलेल्या या माणसांचं अस्तित्वच नाकारण्याचा काहीसा प्रकार हा शित्तूर-वारुण या ठिकाणी राजरोसपणे घडतो आहे. रोजची वहिवाट असणाऱ्या डोंगररानात वनविभागाने वनीकरण केल्यास आमची गुरंढोरं चरणार कुठे? आणि दरवर्षी वनविभाग आपली हद्द अशीच वाढवत राहिला तर एक दिवस आम्ही बेघर होऊन मरण्यापेक्षा आताच आमच्यावर डोझर फिरवा व मोकळे व्हा! अशी उद्विग्न भावना येथील शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रल्हाद राघवेंद्र देसाई या मूळ मालकाची या परिसरात जवळजवळ २२०० हेक्टर जमीन आहे. त्या जमिनीत या वाड्यावस्त्यांवरील १२५ कुळं आहेत. २२०० हेक्टरपैकी १९७५ च्या नोटिफिकेशननुसार ६०० हेक्टर जमीन ही वनविभागाला प्राप्त झाली असून, सध्या त्याच जमिनीत वनीकरणाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून या जमिनीत लागवडीचे काम सुरू असून, आतापर्यंत ४५ हजार रोपांचे वनीकरण या ठिकाणी झाले आहे. यावर्षी सुमारे ३२ हजार ५०० रोपांचे वनीकरण करण्याच्या तयारीत सध्या वनविभाग आहे.

मूळ मालकाच्या जमिनीसाठी वनविभागासह स्वतःला वारस म्हणवून घेणारे आणि या जमिनीचा खरेदी व्यवहार करणाऱ्यांमध्ये कोर्टात दावे-प्रतिदावे सुरू आहेत. दीडशे-दोनशे वर्षांपासून जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांचे यांच्यापैकी कोणालाच कसल्याही प्रकारचे सोयरसूतक नाही. कायदेशीर शहाणपणाच्या अभावामुळे डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या या शेतकरीवर्गाचा आतापर्यंत सगळ्यांनीच केवळ फायद्यासाठीच वापर केला आहे.

आतापर्यंत लोकसभा-विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुकांमध्ये हा विषय केवळ चर्चेपुरताच मर्यादित राहिला आहे. कित्येकदा या जमिनीसाठी आंदोलनेही झाली आहेत. प्रत्यक्षात मात्र या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळावा या दृष्टीने कधीच खरेखुरे प्रयत्न झालेले नाहीत आणि तशी तसदी घेण्याचे धाडस आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी याआधी तरी कधी केलेले नाहीत. हा पेच सोडविण्यासाठी या प्रकरणात आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची व संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे.

चौकट :

या २२०० हेक्टर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात केवळ बॉक्साईट मिळणार असल्यामुळे व यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार असल्यामुळे या जमिनीसाठी प्रचंड मोठ्या चढाओढी सुरू आहेत.

नामदेव ढवळ ( ग्रामस्थ-ढवळेवाडी)

शासनाला दंड भरलेल्या जमिनीत सध्या वनीकरण्याचे काम सुरू आहे. आमच्या जमिनी या आता आमच्या नावावर होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. यापुढे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने कायदेशीर पद्धतीने हा लढा अधिक व्यापक करणार आहे.

नंदकुमार नलवडे (आरएफओ- शाहूवाडी) संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर ती जमीन नाही किंवा तशा स्वरूपाची कोणतीच कागदपत्रे त्यांच्याजवळ नाहीत. ती जमीन १९५३ पासून वनविभागाच्या नावावर असल्याने कायदेशीर मार्गाने त्या जमिनीवर सध्या प्रादेशिक वनीकरण्याचे काम सुरू आहे. शासकीय मोजणीनुसार ती जमीन जर खरोखर शेतकऱ्यांची असेल तर वनीकरणातील झाडांसह ती शेतकऱ्यांना परत देण्यात येईल.

फोटो:

प्रादेशिक वनीकरणाच्या कामास विरोध करताना त्या खड्ड्यांमध्ये बसलेले शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) पैकी ढवळेवाडी, विठ्ठलाई वाडा व तळीचा वाडा येथील ग्रामस्थ. (छाया : सतीश नांगरे)