शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

‘वनीकरण तुमचं आणि मरण आमचं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारुण : वाडवडिलांपासून कसत असलेल्या व प्रामुख्याने वहिवाट असणाऱ्या डोंगर रानात वनविभागाने प्रादेशिक वनीकरणाचे काम सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शित्तूर-वारुण :

वाडवडिलांपासून कसत असलेल्या व प्रामुख्याने वहिवाट असणाऱ्या डोंगर रानात वनविभागाने प्रादेशिक वनीकरणाचे काम सुरू केले असल्याने शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) पैकी ढवळेवाडी, विठ्ठलाई वाडा व तळीचा वाडा येथील ग्रामस्थांनी या कामास तीव्र विरोध केला आहे. ‘आधी आम्हाला या खड्ड्यांमध्ये गाढा व मगच सुरू असलेले हे बेकायदेशीर वनीकरण करा’ असा पावित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला.

वाडवडिलांपासून चालत आलेली व कूळ म्हणून कसत असलेली जमीन ही मूळ मालकाच्याच नावे राहिल्याने व मूळ मालक मृत पावल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या हाती कागदोपत्री कोणताच पुरावा? नाही. जिवंत असलेली हाडामासाची माणसं एवढाच काय तो पुरावा? ‘तुमची जमीन असल्याचा कागदोपत्री पुरावा? दाखवा’ या वन विभागाच्या प्रश्नाने जिवंत असलेल्या या माणसांचं अस्तित्वच नाकारण्याचा काहीसा प्रकार हा शित्तूर-वारुण या ठिकाणी राजरोसपणे घडतो आहे. रोजची वहिवाट असणाऱ्या डोंगररानात वनविभागाने वनीकरण केल्यास आमची गुरंढोरं चरणार कुठे? आणि दरवर्षी वनविभाग आपली हद्द अशीच वाढवत राहिला तर एक दिवस आम्ही बेघर होऊन मरण्यापेक्षा आताच आमच्यावर डोझर फिरवा व मोकळे व्हा! अशी उद्विग्न भावना येथील शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रल्हाद राघवेंद्र देसाई या मूळ मालकाची या परिसरात जवळजवळ २२०० हेक्टर जमीन आहे. त्या जमिनीत या वाड्यावस्त्यांवरील १२५ कुळं आहेत. २२०० हेक्टरपैकी १९७५ च्या नोटिफिकेशननुसार ६०० हेक्टर जमीन ही वनविभागाला प्राप्त झाली असून, सध्या त्याच जमिनीत वनीकरणाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून या जमिनीत लागवडीचे काम सुरू असून, आतापर्यंत ४५ हजार रोपांचे वनीकरण या ठिकाणी झाले आहे. यावर्षी सुमारे ३२ हजार ५०० रोपांचे वनीकरण करण्याच्या तयारीत सध्या वनविभाग आहे.

मूळ मालकाच्या जमिनीसाठी वनविभागासह स्वतःला वारस म्हणवून घेणारे आणि या जमिनीचा खरेदी व्यवहार करणाऱ्यांमध्ये कोर्टात दावे-प्रतिदावे सुरू आहेत. दीडशे-दोनशे वर्षांपासून जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांचे यांच्यापैकी कोणालाच कसल्याही प्रकारचे सोयरसूतक नाही. कायदेशीर शहाणपणाच्या अभावामुळे डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या या शेतकरीवर्गाचा आतापर्यंत सगळ्यांनीच केवळ फायद्यासाठीच वापर केला आहे.

आतापर्यंत लोकसभा-विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुकांमध्ये हा विषय केवळ चर्चेपुरताच मर्यादित राहिला आहे. कित्येकदा या जमिनीसाठी आंदोलनेही झाली आहेत. प्रत्यक्षात मात्र या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळावा या दृष्टीने कधीच खरेखुरे प्रयत्न झालेले नाहीत आणि तशी तसदी घेण्याचे धाडस आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी याआधी तरी कधी केलेले नाहीत. हा पेच सोडविण्यासाठी या प्रकरणात आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची व संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे.

चौकट :

या २२०० हेक्टर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात केवळ बॉक्साईट मिळणार असल्यामुळे व यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार असल्यामुळे या जमिनीसाठी प्रचंड मोठ्या चढाओढी सुरू आहेत.

नामदेव ढवळ ( ग्रामस्थ-ढवळेवाडी)

शासनाला दंड भरलेल्या जमिनीत सध्या वनीकरण्याचे काम सुरू आहे. आमच्या जमिनी या आता आमच्या नावावर होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. यापुढे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने कायदेशीर पद्धतीने हा लढा अधिक व्यापक करणार आहे.

नंदकुमार नलवडे (आरएफओ- शाहूवाडी) संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर ती जमीन नाही किंवा तशा स्वरूपाची कोणतीच कागदपत्रे त्यांच्याजवळ नाहीत. ती जमीन १९५३ पासून वनविभागाच्या नावावर असल्याने कायदेशीर मार्गाने त्या जमिनीवर सध्या प्रादेशिक वनीकरण्याचे काम सुरू आहे. शासकीय मोजणीनुसार ती जमीन जर खरोखर शेतकऱ्यांची असेल तर वनीकरणातील झाडांसह ती शेतकऱ्यांना परत देण्यात येईल.

फोटो:

प्रादेशिक वनीकरणाच्या कामास विरोध करताना त्या खड्ड्यांमध्ये बसलेले शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) पैकी ढवळेवाडी, विठ्ठलाई वाडा व तळीचा वाडा येथील ग्रामस्थ. (छाया : सतीश नांगरे)