शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रस्त्यावर आल्यास सक्तीने अँटिजेन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी असताना अत्यावश्यक कामाच्या नावाखाली रस्त्यावर आल्यास संबंधित व्यक्तीची आज, शनिवारपासून मोबाईल ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी असताना अत्यावश्यक कामाच्या नावाखाली रस्त्यावर आल्यास संबंधित व्यक्तीची आज, शनिवारपासून मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तशा सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या.

राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातही संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरिक बाहेर पडून गर्दी करीत आहेत. दुकान, बँक, भाजी मार्केट येथे नागरिकांची जास्त गर्दी होत आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी शहरात फिरती करताना सर्वत्र गर्दी असल्याचे दिसून आले. त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे होते.

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गैरफायदा घेतला जात आहे. संचारबंदी असूनही होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव व धोका अधिकच वाढला आहे. शहरात मोबाईल व्हॅनच्या पथकाद्वारे रॅपिड अँटिजेन (कोविड) चाचणी करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना बलकवडे यांनी उपआयुक्त निखिल मोरे यांना दिल्या. महापालिकेच्या या पथकाद्वारे शहरातील ज्या-ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या ठिकाणी जागेवरच आज, शनिवारपासून कोविड चाचणी करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तत्काळ विलगीकरण कक्षात पाठविण्यात येणार आहे.

दसरा चौकातील कॅनरा बँक येथे गर्दी असल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या दारामध्ये नागरिकांची गर्दी झाल्यामुळे प्रशासक बलकवडे यांनी आपली गाडी थांबवून बँक मॅनेजर यांना बोलावून घेतले. यावेळी या बँकेमध्ये नागरिकांमध्ये सोशल डिस्टंन्स नसल्याचे मॅनेजरांना निदर्शनास आणून दिले. तसेच बँकेमध्ये मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्स व सॅनिटायझरचा वापर होणे आवश्यक असल्याबाबतच्या सूचना दिल्या.

-गर्दी करणाऱ्यांना बसणार आळा? -

कोरोनाची साखळी तोडण्याकरिता राज्य सरकारने संचारबंदी केली असली तरी नागरिक अजूनही बेजबाबदारपणे वागत आहेत. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. परंतु, कोरोनाचे रुग्ण वाढल्यावर महापालिकेच्या यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे गर्दी रोखायची असेल तर असा काही निर्णय घेतला तर नागरिक रस्त्यावर येण्याचे टाळतील, अशी अपेक्षा आहे.