शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर आल्यास सक्तीने अँटिजेन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी असताना अत्यावश्यक कामाच्या नावाखाली रस्त्यावर आल्यास संबंधित व्यक्तीची आज, शनिवारपासून मोबाईल ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी असताना अत्यावश्यक कामाच्या नावाखाली रस्त्यावर आल्यास संबंधित व्यक्तीची आज, शनिवारपासून मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तशा सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या.

राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातही संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरिक बाहेर पडून गर्दी करीत आहेत. दुकान, बँक, भाजी मार्केट येथे नागरिकांची जास्त गर्दी होत आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी शहरात फिरती करताना सर्वत्र गर्दी असल्याचे दिसून आले. त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे होते.

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गैरफायदा घेतला जात आहे. संचारबंदी असूनही होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव व धोका अधिकच वाढला आहे. शहरात मोबाईल व्हॅनच्या पथकाद्वारे रॅपिड अँटिजेन (कोविड) चाचणी करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना बलकवडे यांनी उपआयुक्त निखिल मोरे यांना दिल्या. महापालिकेच्या या पथकाद्वारे शहरातील ज्या-ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या ठिकाणी जागेवरच आज, शनिवारपासून कोविड चाचणी करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तत्काळ विलगीकरण कक्षात पाठविण्यात येणार आहे.

दसरा चौकातील कॅनरा बँक येथे गर्दी असल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या दारामध्ये नागरिकांची गर्दी झाल्यामुळे प्रशासक बलकवडे यांनी आपली गाडी थांबवून बँक मॅनेजर यांना बोलावून घेतले. यावेळी या बँकेमध्ये नागरिकांमध्ये सोशल डिस्टंन्स नसल्याचे मॅनेजरांना निदर्शनास आणून दिले. तसेच बँकेमध्ये मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्स व सॅनिटायझरचा वापर होणे आवश्यक असल्याबाबतच्या सूचना दिल्या.

-गर्दी करणाऱ्यांना बसणार आळा? -

कोरोनाची साखळी तोडण्याकरिता राज्य सरकारने संचारबंदी केली असली तरी नागरिक अजूनही बेजबाबदारपणे वागत आहेत. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. परंतु, कोरोनाचे रुग्ण वाढल्यावर महापालिकेच्या यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे गर्दी रोखायची असेल तर असा काही निर्णय घेतला तर नागरिक रस्त्यावर येण्याचे टाळतील, अशी अपेक्षा आहे.