शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

उन्हाळा सुसह्य करणाऱ्या टरबूजची पाच टन आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:26 IST

कोल्हापूर : उन्हाळ्यात उच्चकोटीच्या तपमानामुळे शरीरातील पाणी घामावाटे निघून जाते. त्यामुळे शरीराला पाण्याची नितांत गरज भासते. अशावेळी भरपूर पाणी ...

कोल्हापूर : उन्हाळ्यात उच्चकोटीच्या तपमानामुळे शरीरातील पाणी घामावाटे निघून जाते. त्यामुळे शरीराला पाण्याची नितांत गरज भासते. अशावेळी भरपूर पाणी पिण्यासोबतच पाण्याचा अंश असलेल्या फळे खाणे आवश्यक असते. त्यामुळे कलिंगडासोबतच टरबुजाला मागणी वाढली आहे. त्यामुळे कोल्हापुरात माडग्याळ (ता. जत) येथून रोज पाच टनांची आवक होते.

उन्हाचा पारा जसजसा वाढू लागला तसे विविध प्रकारची सरबते, आइस्क्रीम आणि फळांचे ज्यूसला मागणी वाढते. मात्र, यात कृत्रिम शीतपेये शरीराची तात्पुरती तहान भागवतात. मात्र, त्यात कोणते रंग असतात अथवा कोणत्या रासायनिक पदार्थांपासून त्याची निर्मिती होते, याची जाणीव सर्वसामान्यांना नसते. त्यामुळे लिंबू सरबत, कोकम, विविध फळांचे ज्यूस आणि आइस्क्रीमला मागणी वाढते. मात्र, त्यातून शरीराला काही काळ थंडवा मिळतोही. मात्र, सातत्याने तहान लागत असते. अशा वेळी पाण्याबरोबरच कलिंगड, काकडी, टरबूज अशा ९५ टक्के पाणीवर्गीय फळांची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होती. त्यात टरबुजालाही मागणी वाढत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील माडग्याळ (ता. जत) येथून कोल्हापुरात रोज पाच टन टरबुजाची कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजारात आवक होऊ लागली आहे.

चौकट

यामुळे टरबुजाला मागणी

टरबुजात जीवनसत्त्व ‘अ’ आणि पोषक तत्त्वे असलेले खनिज पदार्थ असल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. यात लायकोपीन, कॅरोटिनाइड यात असल्याने हृदयाचे कार्य सुधारते. प्रतिकारशक्ती अधिक असल्याने त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. मधुमेही असणाऱ्या लोकांना टरबूज फायदेशीर ठरते. कर्करुग्णाला कर्करोगाचे सेल्स वाढण्यापासून रोखण्याची शक्ती टरबुजात असते. तणाव, उच्च रक्तदाबसारख्या समस्यांमध्ये ते फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात टरबुजाला मागणी वाढते, असे जाणकार सांगतात.

कोट

टरबूज खाल्ल्यामुळे शरीरास जीवनसत्त्व अ व क मिळते. डोळ्यांसह कर्करोगाच्या पेशींंविरोधात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम ते करते. त्यामुळे उन्हाळ्यासह बारमाही टरबुजाचा वापर करावा. ते आरोग्यास चांगलेच आहे.

-डाॅ. गौरी माणगावकर, आहारतज्ज्ञ