शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

उन्हाळा सुसह्य करणाऱ्या टरबूजची पाच टन आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:26 IST

कोल्हापूर : उन्हाळ्यात उच्चकोटीच्या तपमानामुळे शरीरातील पाणी घामावाटे निघून जाते. त्यामुळे शरीराला पाण्याची नितांत गरज भासते. अशावेळी भरपूर पाणी ...

कोल्हापूर : उन्हाळ्यात उच्चकोटीच्या तपमानामुळे शरीरातील पाणी घामावाटे निघून जाते. त्यामुळे शरीराला पाण्याची नितांत गरज भासते. अशावेळी भरपूर पाणी पिण्यासोबतच पाण्याचा अंश असलेल्या फळे खाणे आवश्यक असते. त्यामुळे कलिंगडासोबतच टरबुजाला मागणी वाढली आहे. त्यामुळे कोल्हापुरात माडग्याळ (ता. जत) येथून रोज पाच टनांची आवक होते.

उन्हाचा पारा जसजसा वाढू लागला तसे विविध प्रकारची सरबते, आइस्क्रीम आणि फळांचे ज्यूसला मागणी वाढते. मात्र, यात कृत्रिम शीतपेये शरीराची तात्पुरती तहान भागवतात. मात्र, त्यात कोणते रंग असतात अथवा कोणत्या रासायनिक पदार्थांपासून त्याची निर्मिती होते, याची जाणीव सर्वसामान्यांना नसते. त्यामुळे लिंबू सरबत, कोकम, विविध फळांचे ज्यूस आणि आइस्क्रीमला मागणी वाढते. मात्र, त्यातून शरीराला काही काळ थंडवा मिळतोही. मात्र, सातत्याने तहान लागत असते. अशा वेळी पाण्याबरोबरच कलिंगड, काकडी, टरबूज अशा ९५ टक्के पाणीवर्गीय फळांची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होती. त्यात टरबुजालाही मागणी वाढत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील माडग्याळ (ता. जत) येथून कोल्हापुरात रोज पाच टन टरबुजाची कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजारात आवक होऊ लागली आहे.

चौकट

यामुळे टरबुजाला मागणी

टरबुजात जीवनसत्त्व ‘अ’ आणि पोषक तत्त्वे असलेले खनिज पदार्थ असल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. यात लायकोपीन, कॅरोटिनाइड यात असल्याने हृदयाचे कार्य सुधारते. प्रतिकारशक्ती अधिक असल्याने त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. मधुमेही असणाऱ्या लोकांना टरबूज फायदेशीर ठरते. कर्करुग्णाला कर्करोगाचे सेल्स वाढण्यापासून रोखण्याची शक्ती टरबुजात असते. तणाव, उच्च रक्तदाबसारख्या समस्यांमध्ये ते फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात टरबुजाला मागणी वाढते, असे जाणकार सांगतात.

कोट

टरबूज खाल्ल्यामुळे शरीरास जीवनसत्त्व अ व क मिळते. डोळ्यांसह कर्करोगाच्या पेशींंविरोधात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम ते करते. त्यामुळे उन्हाळ्यासह बारमाही टरबुजाचा वापर करावा. ते आरोग्यास चांगलेच आहे.

-डाॅ. गौरी माणगावकर, आहारतज्ज्ञ