शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

पाच हजार हॉटेल कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:26 IST

नंदकुमार ढेरे। चंदगड : जगाचा श्वास रोखून धरलेल्या कोरोनाच्या महामारीचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसत आहे. अनेक उद्योग बंद ...

नंदकुमार ढेरे। चंदगड

: जगाचा श्वास रोखून धरलेल्या कोरोनाच्या महामारीचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसत आहे. अनेक उद्योग बंद पडले आहेत. पर्यटन व हॉटेल व्यवसायावर तर मोठे संकट आले आहे. या व्यवसायात चंदगड तालुक्यातील किमान ५ हजार कामगार अवलंबून आहेत. या ५ हजार कुटुंबांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. भाडेतत्त्वावर व कर्ज काढून चालवायला घेतलेले शंभराहून अधिक युवक कर्जबाजारी झाले आहेत.

तालुक्यातील विशेषत: पश्चिम भागातील युवक नोकरीच्या मागे न लागता उदरनिर्वाहासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर, अलिबाग, नाशिक, पंढरपूर, ठाणे, औरंगाबाद, बेळगाव, गोवा व कर्नाटक राज्यात हॉटेलमध्ये कामाला आहेत. १० ते ४० हजार रुपये पगारावर चहाची टपरी ते पंचतारांकित हॉटेलात कामाला असणाऱ्या युवकांनी या व्यवसायात बऱ्यापैकी प्रगती केली आहे. शहरात व गावाकडे कर्जे काढून घरे घेतली आहेत; पण गेल्या १४ महिन्यांपासून हॉटेल व्यवसायच बंद झाल्याने गेल्या वर्षभरापासून ते कामगार कामावर नाहीत.

वर्षभर हॉटेल सुरू नसल्याने कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस फुगत आहे. या हॉटेल कामगार असल्याची नोंद सरकारी दरबारी नसल्याने सरकारची कोणतीही मदतीची शक्यता नाही.

कमावणारा माणूस बेकार झाला तर त्याची मानसिक स्थिती चांगली नसते. तालुक्यातील हजारो हात सध्या रिकामे आहेत. त्यांचे दरमहा येणारे कोट्यवधी रुपये बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हॉटेलमध्येच काम करता-करता भाडेतत्त्वावर व कर्ज काढून हॉटेल चालवायला घेतलेल्या कर्मचारीच हॉटेल मालक बनू पाहणाऱ्या चंदगड तालुक्यातील शंभराहून अधिक युवक कर्जबाजारी झाले आहेत.

--------------------------

हॉटेलमधील कामगारांसाठी महामंडळ स्थापन करा.

हॉटेलमधील काम करणारा कामगारवर्ग संघटित नाही त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. गेल्या दोन्ही लॉकडाऊनमध्ये हॉटेल व्यवसायावर संक्रांत कोसळली आहे. एवढा मोठा व्यवसाय बंद करताना त्यातील कामगारवर्गाला कर्जाचे ओझे घेऊन उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या कर्मचाऱ्यांसाठी लघु महामंडळ स्थापन करावे.

- शंकर ढोणुक्षे, केरवडे, ता.चंदगड, सध्या अलिबाग येथील हॉटेल व्यावसायिक