शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

गुरुजींना पाच विद्यार्थ्यांचे ‘टार्गेट’

By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST

महापालिका शाळांची स्थिती : यंदा १८७० विद्यार्थी वाढवण्याचे उद्दीष्ट

संतोष पाटील - कोल्हापूर -शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या झपाट्याने रोडावत आहे. ५९ पैकी मोजक्या चार ते पाच शाळा सोडल्यास चाळीसहून अधिक शाळांत विद्यार्थ्यांची संख्या तीन अंकीही नाही. त्यामुळे शाळेतील पटसंख्या वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांना देण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक शिक्षकाने पहिलीसाठी किमान पाच विद्यार्थी आणावेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. ६ जूनपासून घरोघरी महापालिकेच्या शाळांचे मार्केटिंग केले जाणार आहे. त्यातून शिक्षण मंडळाने १८७० विद्यार्थीसंख्या वाढीचे उद्दिष्ट आखले आहे.महानगरपालिकेच्या शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारमय, असाच सर्वसामान्य जनतेचा ग्रह झाला आहे. त्याच मानसिकतेमुळे गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गेल्या चार वर्षांत अकराहून अधिक शाळा बंद पडल्या आहेत. हा समज पुसून टाकण्यासाठी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने कात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शैक्षणिक वर्षात नवनवीन उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच विद्यार्थीसंख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.खासगी शाळांचे जसे प्रस्थ वाढत गेले तसे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थीसंख्येला गळती लागली, ती आजतागायत सुरूच आहे. गेल्या दोन वर्षांत २९४ विद्यार्थी कमी झाले. ५९ शाळांत फक्त ९५९७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी गळती का झाली याचा शोध घेण्यापेक्षा ठोस कृती आराखडा तयार करून पटसंख्या वाढविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यासाठी मंगळवारी महापालिका शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. प्रत्येक शिक्षकाने किमान पाच नवीन विद्यार्थी आणावेत, अशी सूचना उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी केली. त्यामुळे महापालिकेच्या शाळेत ३७४ शिक्षकांकडून तब्बल १८७० विद्यार्थीसंख्या वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.व्यक्तिमत्त्व विकासावर अधिक भर देण्याचा निर्धार करत विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षांसाठी खास मार्गदर्शन वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्याची सर्व माहिती गुरुजी शहरातील घराघरांत जाऊन देणार आहेत. यासाठी शनिवार, ६ जूनपासून मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शाळांतील विद्यार्थीसंख्या वाढवायचीच, या निर्धाराने सर्व शिक्षक कामाला लागणार आहेत. महापालिकेच्या शाळा- ७५सुरू असलेल्या शाळा- ५९विद्यार्थ्यांची संख्या- ९५९७शिक्षक संख्या- ३७४प्रत्येकी पाचप्रमाणे १८७० विद्यार्थी संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट