शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

गुरुजींना पाच विद्यार्थ्यांचे ‘टार्गेट’

By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST

महापालिका शाळांची स्थिती : यंदा १८७० विद्यार्थी वाढवण्याचे उद्दीष्ट

संतोष पाटील - कोल्हापूर -शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या झपाट्याने रोडावत आहे. ५९ पैकी मोजक्या चार ते पाच शाळा सोडल्यास चाळीसहून अधिक शाळांत विद्यार्थ्यांची संख्या तीन अंकीही नाही. त्यामुळे शाळेतील पटसंख्या वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांना देण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक शिक्षकाने पहिलीसाठी किमान पाच विद्यार्थी आणावेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. ६ जूनपासून घरोघरी महापालिकेच्या शाळांचे मार्केटिंग केले जाणार आहे. त्यातून शिक्षण मंडळाने १८७० विद्यार्थीसंख्या वाढीचे उद्दिष्ट आखले आहे.महानगरपालिकेच्या शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारमय, असाच सर्वसामान्य जनतेचा ग्रह झाला आहे. त्याच मानसिकतेमुळे गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गेल्या चार वर्षांत अकराहून अधिक शाळा बंद पडल्या आहेत. हा समज पुसून टाकण्यासाठी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने कात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शैक्षणिक वर्षात नवनवीन उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच विद्यार्थीसंख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.खासगी शाळांचे जसे प्रस्थ वाढत गेले तसे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थीसंख्येला गळती लागली, ती आजतागायत सुरूच आहे. गेल्या दोन वर्षांत २९४ विद्यार्थी कमी झाले. ५९ शाळांत फक्त ९५९७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी गळती का झाली याचा शोध घेण्यापेक्षा ठोस कृती आराखडा तयार करून पटसंख्या वाढविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यासाठी मंगळवारी महापालिका शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. प्रत्येक शिक्षकाने किमान पाच नवीन विद्यार्थी आणावेत, अशी सूचना उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी केली. त्यामुळे महापालिकेच्या शाळेत ३७४ शिक्षकांकडून तब्बल १८७० विद्यार्थीसंख्या वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.व्यक्तिमत्त्व विकासावर अधिक भर देण्याचा निर्धार करत विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षांसाठी खास मार्गदर्शन वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्याची सर्व माहिती गुरुजी शहरातील घराघरांत जाऊन देणार आहेत. यासाठी शनिवार, ६ जूनपासून मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शाळांतील विद्यार्थीसंख्या वाढवायचीच, या निर्धाराने सर्व शिक्षक कामाला लागणार आहेत. महापालिकेच्या शाळा- ७५सुरू असलेल्या शाळा- ५९विद्यार्थ्यांची संख्या- ९५९७शिक्षक संख्या- ३७४प्रत्येकी पाचप्रमाणे १८७० विद्यार्थी संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट