शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

रोजी गेली तरी, साडेपाच लाख कुटुंबांना मिळणार रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि संचारबंदीमुळे जिल्ह्यातील गरिबांची रोजची कमाई बंद झाली असली तरी, त्यांची जेवणाची भ्रांत होणार ...

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि संचारबंदीमुळे जिल्ह्यातील गरिबांची रोजची कमाई बंद झाली असली तरी, त्यांची जेवणाची भ्रांत होणार नाही. राज्य शासनाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य देण्याचे जाहीर केल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील ५ लाख ६५ हजार २३८ कार्डधारकांना होणार आहे. या महिन्याचे धान्य वाटप झाले असल्याने पुढच्या महिन्यात या धान्याचे वाटप होणार आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट गंभीर रूप धारण करत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. लॉकडाऊन असो की संचारबंदी, याचा सगळ्यात मोठा फटका बसतो तो हातावरचे पोट असलेल्या कुटुंबांना. गेल्यावर्षी ही झळ सहन केल्यानंतर आता पुन्हा एकदा गरिबांचा रोजगार बुडाला आहे. पैशाच्या पातळीवर होत असलेली हानी भरून काढता येत नसली तरी, शासनाने या लोकांना किमान दोनवेळचे अन्न मिळावे यासाठी दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना माणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदुळ मोफत देण्याचे जाहीर केले आहे. याचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्यक्रम या गटातील शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना होणार आहे.

---

लाभार्थी शिधापत्रिकांची संख्या अशी :

तालुका : अंत्योदय : प्राधान्यक्रम

शिरोळ : ४ हजार ६४१ : ५५ हजार ४२५

आजरा : ३ हजार ७५१ : १७ हजार २४

गगनबावडा : ८६३ : ३ हजार ९११

करवीर : १ हजार ३६५ : ७० हजार ५९८

भुदरगड : २ हजार ७८८ : २२ हजार ४३१

चंदगड : ६ हजार २२ : २२ हजार ९००

गडहिंग्लज : ५ हजार ९१६ : २८ हजार ४१६

हातकणंगले : ४ हजार ९४२ : ६१ हजार ७७७

इचलकरंजी शहर : ४ हजार ८७८ : २९ हजार १८८

राधानगरी : ४ हजार ११५ : ३० हजार ४

शाहूवाडी : २ हजार ९८६ : २४ हजार ९८१

कागल : ४ हजार ४८ : ३६ हजार ५६६

कोल्हापूर शहर : ३ हजार ६२ : ६९ हजार ७५७

पन्हाळा : ३ हजार ८४४ : ३९ हजार ३९

एकूण : ५३ हजार २२१ : ५ लाख १२ हजार ०१७

---

गहू, तांदळासोबत डाळी, तेलही मिळावे

सध्या रेशनवर प्रत्येकी ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ दिला जातो. मागील लॉकडाऊनमध्ये केंद्राने दिलेल्या या धान्यावर गरिबांचे पोट भागले. पण केवळ तांदुळ आणि गव्हाने जेवण बनत नाही. त्यासाठी तेल, डाळी, मीठ मसाल्यांपर्यंतच्या गोष्टी लागतात. त्यामुळे शासनाने या कठीण काळात किमान डाळी, तेल, साखर द्यावी, अशी या गरिबांची अपेक्षा आहे.

--

गेल्यावर्षी कामधंदा बंद होता, तेव्हा हातात पैसा नव्हता. घर कसं चालवायचं ही चिंता होती. रेशनवर मोफत धान्य मिळाले, म्हणून किमान पोराबाळांची पोट तरी भरली. आता परत मोफत धान्य देणार असल्याने संचारबंदीत तो एक मोठा आधारच आहे. धान्यदेखील चांगलं आणि खाण्यासारखं आहे.

- मनीषा वाळवे

यादवनगर, कोल्हापूर.

--

मी पार्लर चालवते. कोरोना परत वाढू लागला, तेव्हापासून पार्लर बंद आहे. घरात पण सगळे बसून आहेत. पण भूक तर रोजच लागते. या अवघड काळात हातावरचं पोट असलेल्यांना मोफत धान्यामुळे उपाशी झोपावं लागत नाही.

- गायत्री कारजगे

फुलेवाडी, ता. करवीर.

--

आम्ही कचरावेचक बायका. शासनाने कायमच आमच्याकडे दुर्लक्ष केले. मोफत तांदुळ, गहू देणार ही चांगलीच गोष्ट आहे. पण तेवढ्याने जेवण होत नाही. त्यासाठी डाळ, तेल, चटणी तर लागतेच. हातात पैसा नसल्याने या गोष्टी आम्ही विकत घेऊ शकत नाही. याचा विचार करून रेशनवर या वस्तू मिळाव्यात.

- आक्काताई गोसावी

वडणगे, ता. करवीर.

--