शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

रोजी गेली तरी, साडेपाच लाख कुटुंबांना मिळणार रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि संचारबंदीमुळे जिल्ह्यातील गरिबांची रोजची कमाई बंद झाली असली तरी, त्यांची जेवणाची भ्रांत होणार ...

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि संचारबंदीमुळे जिल्ह्यातील गरिबांची रोजची कमाई बंद झाली असली तरी, त्यांची जेवणाची भ्रांत होणार नाही. राज्य शासनाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य देण्याचे जाहीर केल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील ५ लाख ६५ हजार २३८ कार्डधारकांना होणार आहे. या महिन्याचे धान्य वाटप झाले असल्याने पुढच्या महिन्यात या धान्याचे वाटप होणार आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट गंभीर रूप धारण करत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. लॉकडाऊन असो की संचारबंदी, याचा सगळ्यात मोठा फटका बसतो तो हातावरचे पोट असलेल्या कुटुंबांना. गेल्यावर्षी ही झळ सहन केल्यानंतर आता पुन्हा एकदा गरिबांचा रोजगार बुडाला आहे. पैशाच्या पातळीवर होत असलेली हानी भरून काढता येत नसली तरी, शासनाने या लोकांना किमान दोनवेळचे अन्न मिळावे यासाठी दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना माणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदुळ मोफत देण्याचे जाहीर केले आहे. याचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्यक्रम या गटातील शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना होणार आहे.

---

लाभार्थी शिधापत्रिकांची संख्या अशी :

तालुका : अंत्योदय : प्राधान्यक्रम

शिरोळ : ४ हजार ६४१ : ५५ हजार ४२५

आजरा : ३ हजार ७५१ : १७ हजार २४

गगनबावडा : ८६३ : ३ हजार ९११

करवीर : १ हजार ३६५ : ७० हजार ५९८

भुदरगड : २ हजार ७८८ : २२ हजार ४३१

चंदगड : ६ हजार २२ : २२ हजार ९००

गडहिंग्लज : ५ हजार ९१६ : २८ हजार ४१६

हातकणंगले : ४ हजार ९४२ : ६१ हजार ७७७

इचलकरंजी शहर : ४ हजार ८७८ : २९ हजार १८८

राधानगरी : ४ हजार ११५ : ३० हजार ४

शाहूवाडी : २ हजार ९८६ : २४ हजार ९८१

कागल : ४ हजार ४८ : ३६ हजार ५६६

कोल्हापूर शहर : ३ हजार ६२ : ६९ हजार ७५७

पन्हाळा : ३ हजार ८४४ : ३९ हजार ३९

एकूण : ५३ हजार २२१ : ५ लाख १२ हजार ०१७

---

गहू, तांदळासोबत डाळी, तेलही मिळावे

सध्या रेशनवर प्रत्येकी ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ दिला जातो. मागील लॉकडाऊनमध्ये केंद्राने दिलेल्या या धान्यावर गरिबांचे पोट भागले. पण केवळ तांदुळ आणि गव्हाने जेवण बनत नाही. त्यासाठी तेल, डाळी, मीठ मसाल्यांपर्यंतच्या गोष्टी लागतात. त्यामुळे शासनाने या कठीण काळात किमान डाळी, तेल, साखर द्यावी, अशी या गरिबांची अपेक्षा आहे.

--

गेल्यावर्षी कामधंदा बंद होता, तेव्हा हातात पैसा नव्हता. घर कसं चालवायचं ही चिंता होती. रेशनवर मोफत धान्य मिळाले, म्हणून किमान पोराबाळांची पोट तरी भरली. आता परत मोफत धान्य देणार असल्याने संचारबंदीत तो एक मोठा आधारच आहे. धान्यदेखील चांगलं आणि खाण्यासारखं आहे.

- मनीषा वाळवे

यादवनगर, कोल्हापूर.

--

मी पार्लर चालवते. कोरोना परत वाढू लागला, तेव्हापासून पार्लर बंद आहे. घरात पण सगळे बसून आहेत. पण भूक तर रोजच लागते. या अवघड काळात हातावरचं पोट असलेल्यांना मोफत धान्यामुळे उपाशी झोपावं लागत नाही.

- गायत्री कारजगे

फुलेवाडी, ता. करवीर.

--

आम्ही कचरावेचक बायका. शासनाने कायमच आमच्याकडे दुर्लक्ष केले. मोफत तांदुळ, गहू देणार ही चांगलीच गोष्ट आहे. पण तेवढ्याने जेवण होत नाही. त्यासाठी डाळ, तेल, चटणी तर लागतेच. हातात पैसा नसल्याने या गोष्टी आम्ही विकत घेऊ शकत नाही. याचा विचार करून रेशनवर या वस्तू मिळाव्यात.

- आक्काताई गोसावी

वडणगे, ता. करवीर.

--