शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रोजी गेली तरी, साडेपाच लाख कुटुंबांना मिळणार रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि संचारबंदीमुळे जिल्ह्यातील गरिबांची रोजची कमाई बंद झाली असली तरी, त्यांची जेवणाची भ्रांत होणार ...

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि संचारबंदीमुळे जिल्ह्यातील गरिबांची रोजची कमाई बंद झाली असली तरी, त्यांची जेवणाची भ्रांत होणार नाही. राज्य शासनाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य देण्याचे जाहीर केल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील ५ लाख ६५ हजार २३८ कार्डधारकांना होणार आहे. या महिन्याचे धान्य वाटप झाले असल्याने पुढच्या महिन्यात या धान्याचे वाटप होणार आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट गंभीर रूप धारण करत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. लॉकडाऊन असो की संचारबंदी, याचा सगळ्यात मोठा फटका बसतो तो हातावरचे पोट असलेल्या कुटुंबांना. गेल्यावर्षी ही झळ सहन केल्यानंतर आता पुन्हा एकदा गरिबांचा रोजगार बुडाला आहे. पैशाच्या पातळीवर होत असलेली हानी भरून काढता येत नसली तरी, शासनाने या लोकांना किमान दोनवेळचे अन्न मिळावे यासाठी दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना माणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदुळ मोफत देण्याचे जाहीर केले आहे. याचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्यक्रम या गटातील शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना होणार आहे.

---

लाभार्थी शिधापत्रिकांची संख्या अशी :

तालुका : अंत्योदय : प्राधान्यक्रम

शिरोळ : ४ हजार ६४१ : ५५ हजार ४२५

आजरा : ३ हजार ७५१ : १७ हजार २४

गगनबावडा : ८६३ : ३ हजार ९११

करवीर : १ हजार ३६५ : ७० हजार ५९८

भुदरगड : २ हजार ७८८ : २२ हजार ४३१

चंदगड : ६ हजार २२ : २२ हजार ९००

गडहिंग्लज : ५ हजार ९१६ : २८ हजार ४१६

हातकणंगले : ४ हजार ९४२ : ६१ हजार ७७७

इचलकरंजी शहर : ४ हजार ८७८ : २९ हजार १८८

राधानगरी : ४ हजार ११५ : ३० हजार ४

शाहूवाडी : २ हजार ९८६ : २४ हजार ९८१

कागल : ४ हजार ४८ : ३६ हजार ५६६

कोल्हापूर शहर : ३ हजार ६२ : ६९ हजार ७५७

पन्हाळा : ३ हजार ८४४ : ३९ हजार ३९

एकूण : ५३ हजार २२१ : ५ लाख १२ हजार ०१७

---

गहू, तांदळासोबत डाळी, तेलही मिळावे

सध्या रेशनवर प्रत्येकी ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ दिला जातो. मागील लॉकडाऊनमध्ये केंद्राने दिलेल्या या धान्यावर गरिबांचे पोट भागले. पण केवळ तांदुळ आणि गव्हाने जेवण बनत नाही. त्यासाठी तेल, डाळी, मीठ मसाल्यांपर्यंतच्या गोष्टी लागतात. त्यामुळे शासनाने या कठीण काळात किमान डाळी, तेल, साखर द्यावी, अशी या गरिबांची अपेक्षा आहे.

--

गेल्यावर्षी कामधंदा बंद होता, तेव्हा हातात पैसा नव्हता. घर कसं चालवायचं ही चिंता होती. रेशनवर मोफत धान्य मिळाले, म्हणून किमान पोराबाळांची पोट तरी भरली. आता परत मोफत धान्य देणार असल्याने संचारबंदीत तो एक मोठा आधारच आहे. धान्यदेखील चांगलं आणि खाण्यासारखं आहे.

- मनीषा वाळवे

यादवनगर, कोल्हापूर.

--

मी पार्लर चालवते. कोरोना परत वाढू लागला, तेव्हापासून पार्लर बंद आहे. घरात पण सगळे बसून आहेत. पण भूक तर रोजच लागते. या अवघड काळात हातावरचं पोट असलेल्यांना मोफत धान्यामुळे उपाशी झोपावं लागत नाही.

- गायत्री कारजगे

फुलेवाडी, ता. करवीर.

--

आम्ही कचरावेचक बायका. शासनाने कायमच आमच्याकडे दुर्लक्ष केले. मोफत तांदुळ, गहू देणार ही चांगलीच गोष्ट आहे. पण तेवढ्याने जेवण होत नाही. त्यासाठी डाळ, तेल, चटणी तर लागतेच. हातात पैसा नसल्याने या गोष्टी आम्ही विकत घेऊ शकत नाही. याचा विचार करून रेशनवर या वस्तू मिळाव्यात.

- आक्काताई गोसावी

वडणगे, ता. करवीर.

--