शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

परीक्षेत पहिले येणे म्हणजे यश नव्हे

By admin | Updated: September 1, 2016 00:45 IST

जी. डी. यादव : जगात टाकाऊ काहीच नाही; देशाला पुढे नेण्याची क्षमता तरुणाईमध्ये

कोल्हापूर : आजकाल पालक आणि विद्यार्थीही परीक्षेत पहिले येण्यासाठी धडपडत असतात; पण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नंबर महत्त्वाचे नाहीत. आज इंटरनेट हे गुरू द्रोणाचार्याच्या भूमिकेत आहे. त्यातून कोणते आणि कसे ज्ञान घ्यायचे हे आजच्या एकलव्याने शिकले पाहिजे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल, त्यात पारंगत होण्याचे ध्येय बाळगा, असे प्रतिपादन मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांनी केले. दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी व माजी विद्यार्थी संघाच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे होते. व्यासपीठावर प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. ना. गोगटे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भूपेंद्र शहा, डॉ. अजित भागवत, विनोद डिग्रजकर, बी. जी. देशपांडे, एस. जी. भोसले, एस. आर. डिंगणकर, उदय सांगवडेकर उपस्थित होते. यादव म्हणाले, मुलांना चांगले गुण मिळाले की पालक त्यांना झाडावर चढवतात; पण कमी गुण पडले की तेच पाल्यांना सर्वाधिक दु:खी करतात. खरे तर याच काळात पाल्याला आई-वडिलांच्या भक्कम आधाराची गरज असते. आज इंटरनेटद्वारे सगळे जग अभ्यासासाठी खुले झाले आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान कोठेही, कधीही मिळाले पाहिजे. इंटरनेटचा धोका म्हणजे येथे तुमचे चुकले की तुमचे कान पकडणारा गुरू नाही. त्यामुळे आपला पाल्य कोणते ज्ञान घेत आहे हे पाहण्याची जबाबदारी पालकांची आहे. या जगात टाकाऊ काहीच नाही. आजच्या मुलांना समुपदेशनाची गरज आहे. देशाला पुढे नेण्याची क्षमता तरुणाईमध्ये आहे. यावेळी यादव यांनी माझ्यावतीने शाळेच्या आजी व माजी अशा दोन गुणवंत विद्यार्थ्यांना आपले गुरू गंगातीरकर यांच्या नावे पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा केली. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी समारोप केला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी मयूरी भोपळे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेतील गुणवंत शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बी. जी. देशपांडे यांनी संस्थेचा परिचय करून दिला. उदय सांगवडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मा. ना. गोगटे व भूपेंद्र शहा यांनी मनोगत व्यक्त केले. शोभना कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. एम. आर. गोरे यांनी आभार मानले. पहिलं काम फॉरवर्ड यादव म्हणाले, आज घरी आलेली मुलं पालकांशी न बोलता फोनवर बोलत बसतात. रात्री झोपल्यानंतर उशाला दोन-दोन मोबाईल असतात. सकाळी उठलं की स्नान, देवाचे नामस्मरण करण्याआधी मोबाईल चेक करतात आणि काही वाचायच्या आधी व्हॉट्स अ‍ॅपवर आलेले मेसेजेस फॉरवर्ड करतात. सोशल मीडियाच्या जगातील सगळ्याच गोष्टी खऱ्या नाहीत. आमिषांच्या या जगात हरवायचे नसेल, तर बंधन आवश्यक आहे.