शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

परीक्षेत पहिले येणे म्हणजे यश नव्हे

By admin | Updated: September 1, 2016 00:45 IST

जी. डी. यादव : जगात टाकाऊ काहीच नाही; देशाला पुढे नेण्याची क्षमता तरुणाईमध्ये

कोल्हापूर : आजकाल पालक आणि विद्यार्थीही परीक्षेत पहिले येण्यासाठी धडपडत असतात; पण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नंबर महत्त्वाचे नाहीत. आज इंटरनेट हे गुरू द्रोणाचार्याच्या भूमिकेत आहे. त्यातून कोणते आणि कसे ज्ञान घ्यायचे हे आजच्या एकलव्याने शिकले पाहिजे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल, त्यात पारंगत होण्याचे ध्येय बाळगा, असे प्रतिपादन मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांनी केले. दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी व माजी विद्यार्थी संघाच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे होते. व्यासपीठावर प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. ना. गोगटे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भूपेंद्र शहा, डॉ. अजित भागवत, विनोद डिग्रजकर, बी. जी. देशपांडे, एस. जी. भोसले, एस. आर. डिंगणकर, उदय सांगवडेकर उपस्थित होते. यादव म्हणाले, मुलांना चांगले गुण मिळाले की पालक त्यांना झाडावर चढवतात; पण कमी गुण पडले की तेच पाल्यांना सर्वाधिक दु:खी करतात. खरे तर याच काळात पाल्याला आई-वडिलांच्या भक्कम आधाराची गरज असते. आज इंटरनेटद्वारे सगळे जग अभ्यासासाठी खुले झाले आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान कोठेही, कधीही मिळाले पाहिजे. इंटरनेटचा धोका म्हणजे येथे तुमचे चुकले की तुमचे कान पकडणारा गुरू नाही. त्यामुळे आपला पाल्य कोणते ज्ञान घेत आहे हे पाहण्याची जबाबदारी पालकांची आहे. या जगात टाकाऊ काहीच नाही. आजच्या मुलांना समुपदेशनाची गरज आहे. देशाला पुढे नेण्याची क्षमता तरुणाईमध्ये आहे. यावेळी यादव यांनी माझ्यावतीने शाळेच्या आजी व माजी अशा दोन गुणवंत विद्यार्थ्यांना आपले गुरू गंगातीरकर यांच्या नावे पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा केली. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी समारोप केला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी मयूरी भोपळे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेतील गुणवंत शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बी. जी. देशपांडे यांनी संस्थेचा परिचय करून दिला. उदय सांगवडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मा. ना. गोगटे व भूपेंद्र शहा यांनी मनोगत व्यक्त केले. शोभना कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. एम. आर. गोरे यांनी आभार मानले. पहिलं काम फॉरवर्ड यादव म्हणाले, आज घरी आलेली मुलं पालकांशी न बोलता फोनवर बोलत बसतात. रात्री झोपल्यानंतर उशाला दोन-दोन मोबाईल असतात. सकाळी उठलं की स्नान, देवाचे नामस्मरण करण्याआधी मोबाईल चेक करतात आणि काही वाचायच्या आधी व्हॉट्स अ‍ॅपवर आलेले मेसेजेस फॉरवर्ड करतात. सोशल मीडियाच्या जगातील सगळ्याच गोष्टी खऱ्या नाहीत. आमिषांच्या या जगात हरवायचे नसेल, तर बंधन आवश्यक आहे.