शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

परीक्षेत पहिले येणे म्हणजे यश नव्हे

By admin | Updated: September 1, 2016 00:45 IST

जी. डी. यादव : जगात टाकाऊ काहीच नाही; देशाला पुढे नेण्याची क्षमता तरुणाईमध्ये

कोल्हापूर : आजकाल पालक आणि विद्यार्थीही परीक्षेत पहिले येण्यासाठी धडपडत असतात; पण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नंबर महत्त्वाचे नाहीत. आज इंटरनेट हे गुरू द्रोणाचार्याच्या भूमिकेत आहे. त्यातून कोणते आणि कसे ज्ञान घ्यायचे हे आजच्या एकलव्याने शिकले पाहिजे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल, त्यात पारंगत होण्याचे ध्येय बाळगा, असे प्रतिपादन मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांनी केले. दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी व माजी विद्यार्थी संघाच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे होते. व्यासपीठावर प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. ना. गोगटे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भूपेंद्र शहा, डॉ. अजित भागवत, विनोद डिग्रजकर, बी. जी. देशपांडे, एस. जी. भोसले, एस. आर. डिंगणकर, उदय सांगवडेकर उपस्थित होते. यादव म्हणाले, मुलांना चांगले गुण मिळाले की पालक त्यांना झाडावर चढवतात; पण कमी गुण पडले की तेच पाल्यांना सर्वाधिक दु:खी करतात. खरे तर याच काळात पाल्याला आई-वडिलांच्या भक्कम आधाराची गरज असते. आज इंटरनेटद्वारे सगळे जग अभ्यासासाठी खुले झाले आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान कोठेही, कधीही मिळाले पाहिजे. इंटरनेटचा धोका म्हणजे येथे तुमचे चुकले की तुमचे कान पकडणारा गुरू नाही. त्यामुळे आपला पाल्य कोणते ज्ञान घेत आहे हे पाहण्याची जबाबदारी पालकांची आहे. या जगात टाकाऊ काहीच नाही. आजच्या मुलांना समुपदेशनाची गरज आहे. देशाला पुढे नेण्याची क्षमता तरुणाईमध्ये आहे. यावेळी यादव यांनी माझ्यावतीने शाळेच्या आजी व माजी अशा दोन गुणवंत विद्यार्थ्यांना आपले गुरू गंगातीरकर यांच्या नावे पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा केली. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी समारोप केला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी मयूरी भोपळे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेतील गुणवंत शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बी. जी. देशपांडे यांनी संस्थेचा परिचय करून दिला. उदय सांगवडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मा. ना. गोगटे व भूपेंद्र शहा यांनी मनोगत व्यक्त केले. शोभना कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. एम. आर. गोरे यांनी आभार मानले. पहिलं काम फॉरवर्ड यादव म्हणाले, आज घरी आलेली मुलं पालकांशी न बोलता फोनवर बोलत बसतात. रात्री झोपल्यानंतर उशाला दोन-दोन मोबाईल असतात. सकाळी उठलं की स्नान, देवाचे नामस्मरण करण्याआधी मोबाईल चेक करतात आणि काही वाचायच्या आधी व्हॉट्स अ‍ॅपवर आलेले मेसेजेस फॉरवर्ड करतात. सोशल मीडियाच्या जगातील सगळ्याच गोष्टी खऱ्या नाहीत. आमिषांच्या या जगात हरवायचे नसेल, तर बंधन आवश्यक आहे.