शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

By admin | Updated: February 13, 2015 00:57 IST

‘दत्त-आसुर्ले’ उताऱ्यात, तर ‘जवाहर’ गाळपात आघाडीवर : जिल्ह्यात २० लाख टन, सांगली जिल्ह्यात १५ लाख टन ऊस शिल्लक

प्रकाश पाटील- कोपार्डे कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर व सांगली) ३७ साखर कारखान्यांनी आजअखेर एक कोटी ३१ लाख ३६ हजार ६१८ मे. टन उसाचे गाळप करून १२.२१ च्या सरासरी उताऱ्यासह एक कोटी ६० लाख ३८ हजार १०५ क्विंटल साखर तयार केली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सर्वच साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आले असून, अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात २० लाख टन, तर सांगली जिल्ह्यात १५ लाख टन, असे ३५ लाख टन उसाचे क्षेत्र गाळपासाठी शिल्लक असल्याचा अंदाज आहे.साखरेचे दर घसरल्याने जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी एफआरपी एवढा दर देणेही कठीण होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी ऊसदराचा रेटा लावून धरला, तर गाळप हंगाम लांबणार म्हणून एक पाऊल मागे येत संघटनेच्या जयसिंगपूर येथील ऊस परिषदेतील २७०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर करा व कारखाने सुरू करा, असा अल्टीमेटम दिला. यातही थोडी सूट देत एफआरपीप्रमाणे दर द्या, असे जाहीर केले.यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या हंगाम सुरू होऊन जवळजवळ तीन महिने संपले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांपैकी २१ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू आहेत. आतापर्यंत या कारखान्यांनी १२.३४ या राज्यातील उच्चांकी उताऱ्यासह ८५ लाख ५७ हजार ९४१ मे. टन उसाचे गाळप करत एक कोटी पाच लाख ६२ हजार १० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त दालमिया-आसुर्ले साखर कारखान्याने सरासरी साखर उताऱ्यात १२.८८ टक्के उतारा मिळवत जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांकाचा उतारा मिळविला आहे, तर जवाहर कारखान्याने ८ लाख ७२ हजार ९०० मे. टन उसाचे गाळप करत गाळपात आघाडी घेतली आहे.सांगली जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू असून, आजअखेर येथे ११.८९ च्या सरासरी साखर उताऱ्यासह ४८ लाख ४० हजार १५२ मे. टन उसाचे गाळप झाले आहे, तर ५७ लाख ५६ हजार ७२० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथील सर्वोदय रा. बा. पाटील साखर कारखान्याने १२.८१ सरासरी साखर उतारा मिळवून कोल्हापूर विभागात उताऱ्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही २० लाख मे. टन, तर सांगली जिल्ह्यात १५ लाख मे. टन ऊस गाळपाविना शिल्लक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा हंगाम सर्वसाधारण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहील, असेही सांगण्यात येत आहे.शेतकरी आर्थिक अडचणीतजिल्ह्यातील दत्त-दालमिया वगळता इतर सर्वच कारखाने उसाचे बिलिंग करताना ढेपाळले आहेत. साखरेचे दर पडल्याने सर्वच कारखाने डिसेंबर अखेरपर्यंतच उसाचे पेमेंट करू शकले आहेत. यामुळे शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडला आहे. दत्त-दालमिया साखर कारखान्याने दर १५ दिवसांचे उसाचे बिलिंग करण्याचा आपला वायदा पाळला आहे. गाळप (लाख मे. टन) प्रथम तीन कारखानेजवाहर, कोल्हापूर - ८,७२,९००वारणा, कोल्हापूर - ८,३५,५००दत्त-शिरोळ, कोल्हापूर - ७,०३,१०१.विभागात उताऱ्यात प्रथम तीन कारखानेदत्त-दालमिया आसुर्ले, कोल्हापूर - १२.८८ टक्केसर्वोदय रा. बा. पाटील, सांगली - १२.८१ टक्केगुरुदत्त टाकळी, कोल्हापूर - १२.७६ टक्केरा. बा. पाटील, सांगली १२.७६ टक्केविभागात उताऱ्यात प्रथम तीन कारखानेदत्त-दालमिया आसुर्ले, कोल्हापूर - १२.८८ टक्केसर्वोदय रा. बा. पाटील, सांगली - १२.८१ टक्केगुरुदत्त टाकळी, कोल्हापूर - १२.७६ टक्केरा. बा. पाटील, सांगली १२.७६ टक्के