शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

By admin | Updated: February 13, 2015 00:57 IST

‘दत्त-आसुर्ले’ उताऱ्यात, तर ‘जवाहर’ गाळपात आघाडीवर : जिल्ह्यात २० लाख टन, सांगली जिल्ह्यात १५ लाख टन ऊस शिल्लक

प्रकाश पाटील- कोपार्डे कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर व सांगली) ३७ साखर कारखान्यांनी आजअखेर एक कोटी ३१ लाख ३६ हजार ६१८ मे. टन उसाचे गाळप करून १२.२१ च्या सरासरी उताऱ्यासह एक कोटी ६० लाख ३८ हजार १०५ क्विंटल साखर तयार केली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सर्वच साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आले असून, अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात २० लाख टन, तर सांगली जिल्ह्यात १५ लाख टन, असे ३५ लाख टन उसाचे क्षेत्र गाळपासाठी शिल्लक असल्याचा अंदाज आहे.साखरेचे दर घसरल्याने जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी एफआरपी एवढा दर देणेही कठीण होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी ऊसदराचा रेटा लावून धरला, तर गाळप हंगाम लांबणार म्हणून एक पाऊल मागे येत संघटनेच्या जयसिंगपूर येथील ऊस परिषदेतील २७०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर करा व कारखाने सुरू करा, असा अल्टीमेटम दिला. यातही थोडी सूट देत एफआरपीप्रमाणे दर द्या, असे जाहीर केले.यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या हंगाम सुरू होऊन जवळजवळ तीन महिने संपले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांपैकी २१ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू आहेत. आतापर्यंत या कारखान्यांनी १२.३४ या राज्यातील उच्चांकी उताऱ्यासह ८५ लाख ५७ हजार ९४१ मे. टन उसाचे गाळप करत एक कोटी पाच लाख ६२ हजार १० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त दालमिया-आसुर्ले साखर कारखान्याने सरासरी साखर उताऱ्यात १२.८८ टक्के उतारा मिळवत जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांकाचा उतारा मिळविला आहे, तर जवाहर कारखान्याने ८ लाख ७२ हजार ९०० मे. टन उसाचे गाळप करत गाळपात आघाडी घेतली आहे.सांगली जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू असून, आजअखेर येथे ११.८९ च्या सरासरी साखर उताऱ्यासह ४८ लाख ४० हजार १५२ मे. टन उसाचे गाळप झाले आहे, तर ५७ लाख ५६ हजार ७२० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथील सर्वोदय रा. बा. पाटील साखर कारखान्याने १२.८१ सरासरी साखर उतारा मिळवून कोल्हापूर विभागात उताऱ्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही २० लाख मे. टन, तर सांगली जिल्ह्यात १५ लाख मे. टन ऊस गाळपाविना शिल्लक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा हंगाम सर्वसाधारण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहील, असेही सांगण्यात येत आहे.शेतकरी आर्थिक अडचणीतजिल्ह्यातील दत्त-दालमिया वगळता इतर सर्वच कारखाने उसाचे बिलिंग करताना ढेपाळले आहेत. साखरेचे दर पडल्याने सर्वच कारखाने डिसेंबर अखेरपर्यंतच उसाचे पेमेंट करू शकले आहेत. यामुळे शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडला आहे. दत्त-दालमिया साखर कारखान्याने दर १५ दिवसांचे उसाचे बिलिंग करण्याचा आपला वायदा पाळला आहे. गाळप (लाख मे. टन) प्रथम तीन कारखानेजवाहर, कोल्हापूर - ८,७२,९००वारणा, कोल्हापूर - ८,३५,५००दत्त-शिरोळ, कोल्हापूर - ७,०३,१०१.विभागात उताऱ्यात प्रथम तीन कारखानेदत्त-दालमिया आसुर्ले, कोल्हापूर - १२.८८ टक्केसर्वोदय रा. बा. पाटील, सांगली - १२.८१ टक्केगुरुदत्त टाकळी, कोल्हापूर - १२.७६ टक्केरा. बा. पाटील, सांगली १२.७६ टक्केविभागात उताऱ्यात प्रथम तीन कारखानेदत्त-दालमिया आसुर्ले, कोल्हापूर - १२.८८ टक्केसर्वोदय रा. बा. पाटील, सांगली - १२.८१ टक्केगुरुदत्त टाकळी, कोल्हापूर - १२.७६ टक्केरा. बा. पाटील, सांगली १२.७६ टक्के