शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

By admin | Updated: February 13, 2015 00:57 IST

‘दत्त-आसुर्ले’ उताऱ्यात, तर ‘जवाहर’ गाळपात आघाडीवर : जिल्ह्यात २० लाख टन, सांगली जिल्ह्यात १५ लाख टन ऊस शिल्लक

प्रकाश पाटील- कोपार्डे कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर व सांगली) ३७ साखर कारखान्यांनी आजअखेर एक कोटी ३१ लाख ३६ हजार ६१८ मे. टन उसाचे गाळप करून १२.२१ च्या सरासरी उताऱ्यासह एक कोटी ६० लाख ३८ हजार १०५ क्विंटल साखर तयार केली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सर्वच साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आले असून, अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात २० लाख टन, तर सांगली जिल्ह्यात १५ लाख टन, असे ३५ लाख टन उसाचे क्षेत्र गाळपासाठी शिल्लक असल्याचा अंदाज आहे.साखरेचे दर घसरल्याने जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी एफआरपी एवढा दर देणेही कठीण होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी ऊसदराचा रेटा लावून धरला, तर गाळप हंगाम लांबणार म्हणून एक पाऊल मागे येत संघटनेच्या जयसिंगपूर येथील ऊस परिषदेतील २७०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर करा व कारखाने सुरू करा, असा अल्टीमेटम दिला. यातही थोडी सूट देत एफआरपीप्रमाणे दर द्या, असे जाहीर केले.यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या हंगाम सुरू होऊन जवळजवळ तीन महिने संपले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांपैकी २१ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू आहेत. आतापर्यंत या कारखान्यांनी १२.३४ या राज्यातील उच्चांकी उताऱ्यासह ८५ लाख ५७ हजार ९४१ मे. टन उसाचे गाळप करत एक कोटी पाच लाख ६२ हजार १० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त दालमिया-आसुर्ले साखर कारखान्याने सरासरी साखर उताऱ्यात १२.८८ टक्के उतारा मिळवत जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांकाचा उतारा मिळविला आहे, तर जवाहर कारखान्याने ८ लाख ७२ हजार ९०० मे. टन उसाचे गाळप करत गाळपात आघाडी घेतली आहे.सांगली जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू असून, आजअखेर येथे ११.८९ च्या सरासरी साखर उताऱ्यासह ४८ लाख ४० हजार १५२ मे. टन उसाचे गाळप झाले आहे, तर ५७ लाख ५६ हजार ७२० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथील सर्वोदय रा. बा. पाटील साखर कारखान्याने १२.८१ सरासरी साखर उतारा मिळवून कोल्हापूर विभागात उताऱ्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही २० लाख मे. टन, तर सांगली जिल्ह्यात १५ लाख मे. टन ऊस गाळपाविना शिल्लक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा हंगाम सर्वसाधारण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहील, असेही सांगण्यात येत आहे.शेतकरी आर्थिक अडचणीतजिल्ह्यातील दत्त-दालमिया वगळता इतर सर्वच कारखाने उसाचे बिलिंग करताना ढेपाळले आहेत. साखरेचे दर पडल्याने सर्वच कारखाने डिसेंबर अखेरपर्यंतच उसाचे पेमेंट करू शकले आहेत. यामुळे शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडला आहे. दत्त-दालमिया साखर कारखान्याने दर १५ दिवसांचे उसाचे बिलिंग करण्याचा आपला वायदा पाळला आहे. गाळप (लाख मे. टन) प्रथम तीन कारखानेजवाहर, कोल्हापूर - ८,७२,९००वारणा, कोल्हापूर - ८,३५,५००दत्त-शिरोळ, कोल्हापूर - ७,०३,१०१.विभागात उताऱ्यात प्रथम तीन कारखानेदत्त-दालमिया आसुर्ले, कोल्हापूर - १२.८८ टक्केसर्वोदय रा. बा. पाटील, सांगली - १२.८१ टक्केगुरुदत्त टाकळी, कोल्हापूर - १२.७६ टक्केरा. बा. पाटील, सांगली १२.७६ टक्केविभागात उताऱ्यात प्रथम तीन कारखानेदत्त-दालमिया आसुर्ले, कोल्हापूर - १२.८८ टक्केसर्वोदय रा. बा. पाटील, सांगली - १२.८१ टक्केगुरुदत्त टाकळी, कोल्हापूर - १२.७६ टक्केरा. बा. पाटील, सांगली १२.७६ टक्के