शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीच्या मागणीसाठी पुन:श्च लढा, लवकरच व्यापक बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST

गेल्या ४३ वर्षापेक्षा जास्त काळ कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची मागणी असताना भाजप-शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने दि. १६ ऑगस्ट २०१७ रोजी ...

गेल्या ४३ वर्षापेक्षा जास्त काळ कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची मागणी असताना भाजप-शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने दि. १६ ऑगस्ट २०१७ रोजी शहराच्या लगतच्या ४२ गावांचा समावेश करुन कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाची स्थापना केली. तो उद्देश सफल झालाच नाही, उलटपक्ष कोल्हापूर शहराचा विकास संपूर्णपणे खुंटला तसेच प्राधिकरणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्येत वाढ झाली.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनास २० गावांच्या समावेशाचा प्रस्ताव तातडीने पाठवा, अशा सूचना दिल्या. त्यामुळे हद्दवाढीचा विषय मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली होती. पालिका प्रशासनाने तसा प्रस्ताव पाठविलाही आहे. परंतु त्याबाबत विद्यमान महाविकास आघाडीने अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. याउलट पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ झाली, असे पत्रकात म्हटले आहे.

कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणे आता अनिवार्य आहे. म्हणूनच याविषयी शासनाला जागे करण्याकरिता ई वाॅर्ड लोककल्याण व संघर्ष समितीच्या माध्यमातून येणाऱ्या पंधरा दिवसांत शहरातील आजी-माजी आमदार, खासदार, आजी-माजी महापौर, नगरसेवक, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, यांच्या उपस्थितीत व्यापक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत लढ्याचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

- प्राधिकरणाद्वारे झाली फसवणूक-

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याविषयी कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागातील कोणीही मागणी केली नव्हती; परंतु तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हद्दवाढीच्या विषय सोडविण्याच्या प्रयत्नात ग्रामीण व शहरी जनतेच्या बोकांडीवर प्राधिकरण मारले. या प्राधिकरणाचा फायदा ना शहरी जनतेला झाला, ना ग्रामीण भागातील जनतेला झाला. तत्कालिन शासनाने केलेली ही शुद्ध फसवणूक होती हे आता सर्वांना पटले आहे.