शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नूल परिसरात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: April 9, 2017 23:52 IST

रात्री जागू लागल्या : हिरण्यकेशी नदीची पाणी पातळी घटली

संजय थोरात ल्ल नूलहिरण्यकेशी नदीचे पात्र पूर्णत: कोरडे पडल्यामुळे नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. आठ दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने बोअरच्या पाण्यासाठी लोकांची तोबा गर्दी होत आहे. रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी जागे राहावे लागत आहे.नूलची लोकसंख्या आठ हजारांच्या आसपास आहे. निलजी व रामपूरवाडी येथे जॅकवेल बांधून गावात पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीने सुरू केली आहे. दीड कोटी रुपये खर्चून जलशुद्धिकरण केंद्राची उभारणी केली आहे. हिरण्यकेशी नदीत पाणीसाठा असेपर्यंत दररोज नळांद्वारे पाणीपुरवठा होत असे. गेल्या आठ दिवसांपासून नदीतील पाणी आटल्यामुळे हिरण्यकेशी कोरडी झाली आहे. त्यामुळे नूलकरांना पाणीटंचाईची झळ बसली आहे.‘चित्री’चे पाणी सोडाग्रामपंचायतीने तनवडी रोडवरील पाण्याच्या टाकीत सार्वजनिक विहिरींचे पाणी सोडले आहे. खर्चासाठी हे पाणी लोकांना उपयोगी पडते, तर हरिजन वसाहतीत असणाऱ्या बोअरचे पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. या दोन्ही ठिकाणी ग्रामस्थांची दिवस-रात्र गर्दी असते. महिला, पुरुष, लहान मुले पाण्याचे गाडे, सायकली, मोटारसायकल घेऊन पाण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. ग्रामदैवत हनुमानाची यात्रा पुढील आठवड्यात असल्याने चित्रीचे पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.