शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:15 IST

जयसिंगपूर : टाकळी येथे कृष्णा नदीवर कर्नाटक शासनाच्यावतीने कर्नाटकातील चंदूर व महाराष्ट्रातील टाकळी या गावादरम्यान नवीन पुलाचे बांधकाम सुरू ...

जयसिंगपूर : टाकळी येथे कृष्णा नदीवर कर्नाटक शासनाच्यावतीने कर्नाटकातील चंदूर व महाराष्ट्रातील टाकळी या गावादरम्यान नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामामुळे टाकळीकडील बाजूच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून दिली जाईल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

या पुलाच्या बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराने चंदूर गावच्या बाजूने भराव टाकल्यामुळे पावसाळ्यात नदीपात्रात येणारे पाणी मोठ्या प्रमाणात टाकळीकडील बाजूला असलेल्या शेतामध्ये वेगाने प्रवाहित झाले आहे. यामुळे टाकळीकडील बाजूच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतामधील माती वाहून जाण्याबरोबरच शेतीपंप, विद्युत केबल, तराफा तसेच पाईपलाईन उद्ध्वस्त झाल्या आहेत. एकूणच या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, शेतकऱ्यांच्या या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचनाही दिल्या असल्याचे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

कोट - या घटनेबाबत कर्नाटक राज्याचे माजी मंत्री प्रकाश हुक्केरी, मंत्री श्रीमंत पाटील व आमदार गणेश हुक्केरी यांच्याशी चर्चा झाली आहे. शुक्रवारी कर्नाटक राज्याच्या लोकप्रतिनिधींसह कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत याठिकाणी जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.

- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

फोटो - २९०६२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - टाकळी येथे महाराष्ट्र-कर्नाटक दरम्यान होणाऱ्या पुलाची पाहणी डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली.