शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पावसाअभावी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST

जून-महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात तालुक्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी रताळी, भुईमूग, भात व नाचणी तरवे यांची पेरणी ...

जून-महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात तालुक्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी रताळी, भुईमूग, भात व नाचणी तरवे यांची पेरणी केली होती. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली आहे.

माळरानावरील रताळी, भुईमूग, भात ही पिके अडचणीत आली आहेत. आणखी काही दिवस पावसाने उसंत घेतल्यास दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. तुडये-हाजगोळी भागात रताळी लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. मात्र, पावसाभावी रताळी पिकाचे वेल सुकत आहेत.

नाचणी पीक लागवडीला अजून उशीर असला तरी कर्यात भाग, उमगाव, पाटणे या परिसरात भात पिकाचे तरवे रोप लागवडीसाठी तयार आहेत. मात्र, पाण्याची सोय नसल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्याची भात रोप लागवड सुरू केली आहे.

मजुरांचा तुटवडा

तालुक्यात मोठ्या प्रमाणात काजू उद्योग स्थिरावला आहे. त्यामध्ये वर्षभर काम मिळत असून महिला मजुरांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे शेती कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. तालुक्याची भौगोलिक रचना पाहता पूर्वी पावसाचे प्रमाण खूप होते. मात्र, अलिकडील काळात अनियमित पाऊस पडत असल्याने तालुक्यातील शेती व्यवसायच अडचणीत आला आहे. त्यात शेतीमधून मिळणारे उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ घालणे शेतकरी वर्गाला कठीण जात असल्याने त्यांनी पोल्ट्री, ग्रीन हाऊस याकडे आपले लक्ष वळविले आहे.

फोटो ओळी : तुडये (ता. चंदगड) येथे पावसाभावी रताळी पीक सुकून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

क्रमांक : ०१०७२०२१-गड-०३