शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांची अडवणूक

By admin | Updated: October 23, 2014 00:16 IST

सेवा सोसायट्यांची अनास्था : खते, बियाणे देण्यास टाळाटाळ

गगनबावडा : कृषी विभाग व शेतकरी यांच्यात महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या सोसायट्यांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीवर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचा पुरवठा करण्याबाबत गावातील सहकार विकास सोसायट्यांनी अनुत्सुकता दर्शविली असल्याने शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांना खते व बी-बियाणे सेवा सोसायट्यांमार्फत स्थानिक पातळीवर देण्यात येत असल्यामुळे त्यांच्या वेळेचा अपव्यही टळत होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सोसायट्यांनी खते, बी-बियाणे खरेदी करण्यास नकार दर्शविल्याचे कृषी विभागाकडून समजते. मुळात कृषी विस्तार व कृषी उत्पन्न वाढावे यासाठी या सोसायट्यांनी स्थानिक पातळीवर कृषी विभाजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना साधनसामग्री पुरविणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे. मात्र, तालुक्यातील बहुतांश सर्व सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देऊन बाकीची जबाबदारी झटकताना दिसतात. कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. शेतकरी व कृषी विभाग यांच्यात गावातील विकास सोसायटी हा केंद्रबिंदू आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला ग्राम स्थरावर सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना साधनसामग्री, कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. किंबहुना सोसायटी ही शेतकऱ्यांना महत्त्वाचा दुवा ठरणारी अशी संस्था आहे. विकास सोसायटीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू असतानाही तालुक्यातील सोसायटी चालकांच्या अनास्थेपायी शेतकऱ्यांना खते व बियाणे खरेदी करण्यासाठी तालुकास्तरावर पायपीट करावी लागते. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये सोसायट्यांच्या कार्यक्षमतेबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.