शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
5
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
6
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
8
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
9
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
10
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
11
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
12
१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!
13
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
14
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
15
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
16
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
17
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
18
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
19
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
20
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर आणखी भारनियमनाचा ‘फोर्स’

By admin | Updated: April 6, 2017 00:54 IST

गरजेनुसार भारनियमन : नियमित पुरवठ्यातही वीज कपात

दत्तात्रय पाटील ल्ल म्हाकवेविजवितरणला भारनियमन करण्याची गरज वाटली की पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचीच आठवण होत असते. सध्या, शेती पंपाना १४ ते १६ तासापार्यंत भारनियमन असतानाही आता भारनियमनाची गरज पडेल त्यावेळी ‘फोर्स’ भारनियमनाच्या नावाखाली वीज मिळणाऱ्या ८ ते १० तासांपैकी आणखी ३ ते ४ तासांपर्यंत वीजवितरण कंपनीने भारनियमनाचा घाट घातला आहे. याबाबत शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.औद्योगिक क्षेत्राप्रमाणे शेतीलाही कायमस्वरूपी विजेची शेतकऱ्यांची मागणी होत आहे. कारण एखाद्यावेळी उद्योगाला अपुरा वीजपुरवठा झाला तर आर्थिक नुकसान होण्यापलीकडे काहीही होत नाही. मात्र, शेतीला वीज न मिळाल्यास आर्थिक नुकसानीबरोबर जीवनावश्यक ‘अन्नधान्य’ या घटकालाही मुकावे लागणार आहे. आणि अन्नधान्य तयार करणारा शेती शिवाय दुसरा कारखानाच या जगतात झालेला नाही. याची जाणीव असतानाही वीज वितरणसह शासनाच्या अधिकाऱ्यांकडून शेती आणि पर्यायाने शेतकऱ्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होते. ही शोकांतिका असल्याच्या प्रतिक्रिया अनेक कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत.सध्या, वैशाख वणव्यामुळे ६ ते ८ दिवसांनंतर पिकांना पाण्याची गरज भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून विजेची मागणी वाढली आहे. तर धरणातील पाणी तुटवड्यामुळे वीजनिर्मितीवरही मर्यादा आली आहे. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मार्ग काढताना दमछाक होत आहे.दरम्यान, वाढत्या उन्हामुळे आणि वाढत्या मागणीमुळे ओरकरन (ड्रीप) होऊन वारंवार वीजपुरठा खंडित होत आहे. त्यामुळे कृषी पंपाच्या फ्युजपेटीत अ‍ॅटो स्टार्ट नसेल, तर वारंवार फ्युजपेटीकडे चकरा माराव्या लागत आहेत. किंवा फ्युजपेटीजवळ एखाद्या व्यक्तीला थांबून राहावे लागत आहे. याबाबततही शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.रात्री-अपरात्रीचा वनवास थांबावाग्रामीण भागात सध्या वीज वितरणच्या उपकेंद्राने आपल्यातंर्गत येणाऱ्या गावांचे दोन विभाग करून आठवड्यातील तीन दिवस एका विभागाला दिवसा व दुसऱ्या विभागाला रात्री असा आलटून-पालटून वीजपुरवठा केला जात आहे; परंतु काळ्याकुट्ट अंधारात शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जीव धोक्यात घालूनच रात्री-अपरात्रीही शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी पाणी पाजावे लागते. त्यामुळे पहाटे ५.३० ते दुपारी १ पर्यंत एका विभागाला आणि दुपारी १ ते सायं. ७.३० वाजेपर्यंत दुसऱ्या विभागाला आलटून-पालटून वीजपुरवठा करावा किंवा शेतकऱ्यांना दररोज दिवसाचा वीजपुरवठा होईल असा पर्याय निवडावा. यामुळे वीज आणि पाण्याचीही बचत होऊन बळीराजाचाही रात्री-अपरात्रीचा वनवास थांबेल, अशी अपेक्षाही जाणकारांतून व्यक्त होत आहे.