शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शेतकऱ्यांवर आणखी भारनियमनाचा ‘फोर्स’

By admin | Updated: April 6, 2017 00:54 IST

गरजेनुसार भारनियमन : नियमित पुरवठ्यातही वीज कपात

दत्तात्रय पाटील ल्ल म्हाकवेविजवितरणला भारनियमन करण्याची गरज वाटली की पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचीच आठवण होत असते. सध्या, शेती पंपाना १४ ते १६ तासापार्यंत भारनियमन असतानाही आता भारनियमनाची गरज पडेल त्यावेळी ‘फोर्स’ भारनियमनाच्या नावाखाली वीज मिळणाऱ्या ८ ते १० तासांपैकी आणखी ३ ते ४ तासांपर्यंत वीजवितरण कंपनीने भारनियमनाचा घाट घातला आहे. याबाबत शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.औद्योगिक क्षेत्राप्रमाणे शेतीलाही कायमस्वरूपी विजेची शेतकऱ्यांची मागणी होत आहे. कारण एखाद्यावेळी उद्योगाला अपुरा वीजपुरवठा झाला तर आर्थिक नुकसान होण्यापलीकडे काहीही होत नाही. मात्र, शेतीला वीज न मिळाल्यास आर्थिक नुकसानीबरोबर जीवनावश्यक ‘अन्नधान्य’ या घटकालाही मुकावे लागणार आहे. आणि अन्नधान्य तयार करणारा शेती शिवाय दुसरा कारखानाच या जगतात झालेला नाही. याची जाणीव असतानाही वीज वितरणसह शासनाच्या अधिकाऱ्यांकडून शेती आणि पर्यायाने शेतकऱ्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होते. ही शोकांतिका असल्याच्या प्रतिक्रिया अनेक कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत.सध्या, वैशाख वणव्यामुळे ६ ते ८ दिवसांनंतर पिकांना पाण्याची गरज भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून विजेची मागणी वाढली आहे. तर धरणातील पाणी तुटवड्यामुळे वीजनिर्मितीवरही मर्यादा आली आहे. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मार्ग काढताना दमछाक होत आहे.दरम्यान, वाढत्या उन्हामुळे आणि वाढत्या मागणीमुळे ओरकरन (ड्रीप) होऊन वारंवार वीजपुरठा खंडित होत आहे. त्यामुळे कृषी पंपाच्या फ्युजपेटीत अ‍ॅटो स्टार्ट नसेल, तर वारंवार फ्युजपेटीकडे चकरा माराव्या लागत आहेत. किंवा फ्युजपेटीजवळ एखाद्या व्यक्तीला थांबून राहावे लागत आहे. याबाबततही शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.रात्री-अपरात्रीचा वनवास थांबावाग्रामीण भागात सध्या वीज वितरणच्या उपकेंद्राने आपल्यातंर्गत येणाऱ्या गावांचे दोन विभाग करून आठवड्यातील तीन दिवस एका विभागाला दिवसा व दुसऱ्या विभागाला रात्री असा आलटून-पालटून वीजपुरवठा केला जात आहे; परंतु काळ्याकुट्ट अंधारात शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जीव धोक्यात घालूनच रात्री-अपरात्रीही शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी पाणी पाजावे लागते. त्यामुळे पहाटे ५.३० ते दुपारी १ पर्यंत एका विभागाला आणि दुपारी १ ते सायं. ७.३० वाजेपर्यंत दुसऱ्या विभागाला आलटून-पालटून वीजपुरवठा करावा किंवा शेतकऱ्यांना दररोज दिवसाचा वीजपुरवठा होईल असा पर्याय निवडावा. यामुळे वीज आणि पाण्याचीही बचत होऊन बळीराजाचाही रात्री-अपरात्रीचा वनवास थांबेल, अशी अपेक्षाही जाणकारांतून व्यक्त होत आहे.