शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

शेतकऱ्यांवर आणखी भारनियमनाचा ‘फोर्स’

By admin | Updated: April 6, 2017 00:54 IST

गरजेनुसार भारनियमन : नियमित पुरवठ्यातही वीज कपात

दत्तात्रय पाटील ल्ल म्हाकवेविजवितरणला भारनियमन करण्याची गरज वाटली की पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचीच आठवण होत असते. सध्या, शेती पंपाना १४ ते १६ तासापार्यंत भारनियमन असतानाही आता भारनियमनाची गरज पडेल त्यावेळी ‘फोर्स’ भारनियमनाच्या नावाखाली वीज मिळणाऱ्या ८ ते १० तासांपैकी आणखी ३ ते ४ तासांपर्यंत वीजवितरण कंपनीने भारनियमनाचा घाट घातला आहे. याबाबत शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.औद्योगिक क्षेत्राप्रमाणे शेतीलाही कायमस्वरूपी विजेची शेतकऱ्यांची मागणी होत आहे. कारण एखाद्यावेळी उद्योगाला अपुरा वीजपुरवठा झाला तर आर्थिक नुकसान होण्यापलीकडे काहीही होत नाही. मात्र, शेतीला वीज न मिळाल्यास आर्थिक नुकसानीबरोबर जीवनावश्यक ‘अन्नधान्य’ या घटकालाही मुकावे लागणार आहे. आणि अन्नधान्य तयार करणारा शेती शिवाय दुसरा कारखानाच या जगतात झालेला नाही. याची जाणीव असतानाही वीज वितरणसह शासनाच्या अधिकाऱ्यांकडून शेती आणि पर्यायाने शेतकऱ्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होते. ही शोकांतिका असल्याच्या प्रतिक्रिया अनेक कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत.सध्या, वैशाख वणव्यामुळे ६ ते ८ दिवसांनंतर पिकांना पाण्याची गरज भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून विजेची मागणी वाढली आहे. तर धरणातील पाणी तुटवड्यामुळे वीजनिर्मितीवरही मर्यादा आली आहे. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मार्ग काढताना दमछाक होत आहे.दरम्यान, वाढत्या उन्हामुळे आणि वाढत्या मागणीमुळे ओरकरन (ड्रीप) होऊन वारंवार वीजपुरठा खंडित होत आहे. त्यामुळे कृषी पंपाच्या फ्युजपेटीत अ‍ॅटो स्टार्ट नसेल, तर वारंवार फ्युजपेटीकडे चकरा माराव्या लागत आहेत. किंवा फ्युजपेटीजवळ एखाद्या व्यक्तीला थांबून राहावे लागत आहे. याबाबततही शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.रात्री-अपरात्रीचा वनवास थांबावाग्रामीण भागात सध्या वीज वितरणच्या उपकेंद्राने आपल्यातंर्गत येणाऱ्या गावांचे दोन विभाग करून आठवड्यातील तीन दिवस एका विभागाला दिवसा व दुसऱ्या विभागाला रात्री असा आलटून-पालटून वीजपुरवठा केला जात आहे; परंतु काळ्याकुट्ट अंधारात शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जीव धोक्यात घालूनच रात्री-अपरात्रीही शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी पाणी पाजावे लागते. त्यामुळे पहाटे ५.३० ते दुपारी १ पर्यंत एका विभागाला आणि दुपारी १ ते सायं. ७.३० वाजेपर्यंत दुसऱ्या विभागाला आलटून-पालटून वीजपुरवठा करावा किंवा शेतकऱ्यांना दररोज दिवसाचा वीजपुरवठा होईल असा पर्याय निवडावा. यामुळे वीज आणि पाण्याचीही बचत होऊन बळीराजाचाही रात्री-अपरात्रीचा वनवास थांबेल, अशी अपेक्षाही जाणकारांतून व्यक्त होत आहे.