शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषी संजीवनी’ला शेतकऱ्यांचा थंडा प्रतिसाद

By admin | Updated: November 26, 2014 00:06 IST

जागृती करण्यात अपयश : थकबाकीदार ३४ लाख शेतकरी, पाच लाख शेतकऱ्यांनीच घेतला लाभ

प्रकाश पाटील - कोपार्डे --वीज थकबाकीतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी आघाडी शासनाने सुरू केलेल्या ‘कृषी संजीवनी’ योजनेला शेतकऱ्यांनी थंडा प्रतिसाद दिल्याचे चित्र असून, थकबाकीदार असलेल्या राज्यातील ३४ लाख शेतकऱ्यांपैकी अवघ्या पाच लाख शेतकऱ्यांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात एकतर शासनाला अपयश आले आहे.राज्यातील शेतकऱ्यांकडे शेती वीजपंपांच्या असणाऱ्या थकबाकीकडे महावितरणने विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील ३४ लाख शेतकऱ्यांकडे असलेल्या सुमारे ११ हजार ५०० कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे महावितरणला मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यातच कोळसा आणि गॅस टंचाईमुळे वीजनिर्मिती हा कळीचा मुद्दा बनला आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी कमी दराने वीज यामुळे शेतकऱ्यांच्या वीज बिल थकबाकीवर ‘कृषी संजीवनी’ योजना सुरू केली. या योजनेनुसार शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या मूळ थकबाकीच्या निम्मी रक्कम भरल्यास उर्वरित निम्मी रक्कम आणि त्यावरील व्याज आणि दंड माफ करण्यात येते.३१ आॅक्टोबरला या योजनेची मुदत संपली; मात्र अवघ्या पाच लाख १५ हजार शेतकऱ्यांनीच या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे थकबाकीपोटी महावितरणच्या तिजोरीत अवघे ४६० कोटी रुपये जमा झाले आहेत. अद्याप ३३ लाख ८५ हजार शेतकरी थकबाकीदार असून, त्यांच्याकडे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना मोफत, कधी निम्म्या किमतीत, तर कधी २४ तास वीज पुरविण्याच्या आकर्षक घोषणा भाजपने दिल्या होत्या. दरवर्षी दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे अडचणीत येणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेची भुरळ पडल्याने त्यांनी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेला भरभरून यश दिले आहे. आता भाजप सरकार सत्तेवर आले असून, मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, चुकीच्या वाढीव बिलांमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. गळती कमी दाखविण्यासाठी एकूण वापरापैकी २५ टक्के वीज वापर हा कृषिपंपांना दाखविला आहे. तसेच मीटर असूनही अवाजवी रीडिंग घेऊन, तर मीटर नसलेल्या वीजपंपांना अश्वशक्ती क्षमता वाढवून बिले दिली असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली असल्याचेही चित्र आहे.परिमंडलनिहाय जमा थकबाकी (कोटी रुपयांत)पुणे : १८.८५अकोला : १६.८३औरंगाबाद : १०.९६बारामती : ८६.१०भांडूप : ३जळगाव : १०८.७०कल्याण : १.६कोकण : १२कोल्हापूर : ३५.९८लातूर : ३५.४०नांदेड : ७.७०नाशिक : ११९.५८नागपूर (शहर) : ६.३०नागपूर (ग्रामीण) : १२.४१