शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

पाचट ठेवण्यास शेतकऱ्यांची अजूनही अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:36 IST

शेतीसाठी एक-आड सरी पाचट ठेवल्याने शेतीसाठी दोन-तीन टन एकरी सेंद्रिय खत प्राप्त होते. त्याचबरोबर पाण्याची व भांगलणीची ५० टक्के ...

शेतीसाठी एक-आड सरी पाचट ठेवल्याने शेतीसाठी दोन-तीन टन एकरी सेंद्रिय खत प्राप्त होते. त्याचबरोबर पाण्याची व भांगलणीची ५० टक्के बचत होते. जमिनीमध्ये गारवा निर्माण होऊन पीक वाढीसाठी वातावरण अनुकूल होते. तणासाठी मजुरी, भरणी यामध्ये वेळ व पैसा या दोन्हीची बचत होते. तरीही शेतकऱ्यांमध्ये

असणारे अज्ञान या पाचट ठेवण्यास फाटा देत आहे. उसामध्ये पाचट ठेवल्यास

उंदीर निर्माण होतात, पाला कुजत नाही. यासारखे गैरसमजाने शेतकऱ्यांमध्ये

न्यूनगंड निर्माण केले आहेत, तर उंदरामुळे पाल्यामध्ये साप येतात. यासारखी कारणे शेतकऱ्यांमधून सांगितली जातात. त्यामुळे ऊस तोडल्याबरोबर शेतकऱ्यांमध्ये कृषी खात्याने मार्गदर्शन व पाचट ठेवण्याचे फायदे

सांगूनही शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. चार वर्षांपूर्वी दुष्काळाच्या खाईत महाराष्ट्र लोटला होता त्यावेळी पाण्याचा जास्त वापर करणारे ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे

शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनाबरोबरच पाचट ठेवण्यास आवश्यकता आहे. शासनाबरोबरच काही साखर कारखान्यांनी पाचट ठेवण्यास व ठिबक सिंचनास अनुदान जाहीर केले होते. त्यामुळे शेतामध्ये पाचट ठेवणे

शेतकऱ्यांसाठी फायदेशीरच आहे.

कोट.....

शेतकऱ्यांनी पाचट ठेवणे शेतीसाठी उपयुक्त

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाचट ठेवणे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असून,

त्यामुळे शेतातील जमिनीमध्ये विविध सेंद्रिय घटक निर्माण होऊन जमिनीची

सुपीकता होणार आहे. त्यामुळे याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे

आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रबोधन करीत आहे. त्याचा फायदा

शेतकऱ्यांना पटवून सांगितला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने

शेती करणे सोडून आधुनिक शेती ‘व्यवसाय’ म्हणून करणे गरजेचा आहे.

- करुणा कांबळे (कृषी सहाय्यक असळज, ता. गगनबावडा)