शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST

(दीपक मेटील) सडोली (खालसा) : कांडगाव, शेळकेवाडी, वाशी येथील कृषिपंपांना गेली दोन महिने कमी दाबाने वीजपुरवठा ...

(दीपक मेटील)

सडोली (खालसा) : कांडगाव, शेळकेवाडी, वाशी येथील कृषिपंपांना गेली दोन महिने कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. कोथळी व कांडगाव महावितरणकडे तक्रार देऊनही याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असून ऐन उन्हाळ्यात पाणी उशाला असून पिके मात्र करपली जात आहेत. येत्या दोन दिवसांत या कृषिपंपांना उच्च दाबाने वीजपुरवठा करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

भोगावती नदीवरील कांडगाव, वाशी, शेळकेवाडी या गावांतील कृषिपंपांना वाशी फिल्डअंतर्गत सहकारी संस्था व खासगी कृषिपंपधारकांना कोथळी महावितरण कार्यालयातून वीजपुरवठा केला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून दिवसपाळीत या कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असून, वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कमी दाबाने वीजपुरवठा सुरू असल्याने काही शेतकऱ्यांचे कृषिपंप जळाले आहेत. वारंवार हे सुरू असून, कृषिपंपांना आठ तासाऐवजी पाच तासच विद्युत पुरवठा होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने कृषिपंपही मोकळेच फिरून जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे वीजबिलात वाढ होत असल्याने यांचा भुर्दंडही सोसावा लागत आहे. गेली दोन महिने हा प्रकार सुरू असून कोथळी (ता. करवीर) येथील महावितरणच्या कार्यालयात तक्रार देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने येत्या दोन दिवसांत या कृषिपंपांना उच्च दाबाने वीजपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कृषिपंपधारकांनी केला आहे.

प्रतिक्रिया

कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असून यामुळे माझा कृषिपंप जळाला आहे. वारंवार महावितरण कार्यालयात तक्रार देऊनसुद्धा याकडे महावितरण दुर्लक्ष का करत आहे. या प्रकारामुळे ‘पाणी उशाला, कोरड घशाला’, अशी या परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. तत्काळ उच्चक्षमतेने विद्युत पुरवठा करावा अन्यथा आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.

जयदीप शेळके

शेळकेवाडी शेतकरी

प्रतिक्रिया 2

या परिसरात सहकारी संस्थांचे मोठ्या प्रमाणात जाळे असून सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या जिवावरच अनेक शेतकरी अवलंबून असून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने वारंवार वीज खंडित होत आहे. केवळ चार तासच वीजपुरवठा होत असल्याने पिके वाळू लागली आहेत, तर कृषिपंप जळण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

रणजित पाटील

सचिव महालक्ष्मी सह. पाणीपुरवठा कळंबा, ता. करवीर.