शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST

(दीपक मेटील) सडोली (खालसा) : कांडगाव, शेळकेवाडी, वाशी येथील कृषिपंपांना गेली दोन महिने कमी दाबाने वीजपुरवठा ...

(दीपक मेटील)

सडोली (खालसा) : कांडगाव, शेळकेवाडी, वाशी येथील कृषिपंपांना गेली दोन महिने कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. कोथळी व कांडगाव महावितरणकडे तक्रार देऊनही याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असून ऐन उन्हाळ्यात पाणी उशाला असून पिके मात्र करपली जात आहेत. येत्या दोन दिवसांत या कृषिपंपांना उच्च दाबाने वीजपुरवठा करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

भोगावती नदीवरील कांडगाव, वाशी, शेळकेवाडी या गावांतील कृषिपंपांना वाशी फिल्डअंतर्गत सहकारी संस्था व खासगी कृषिपंपधारकांना कोथळी महावितरण कार्यालयातून वीजपुरवठा केला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून दिवसपाळीत या कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असून, वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कमी दाबाने वीजपुरवठा सुरू असल्याने काही शेतकऱ्यांचे कृषिपंप जळाले आहेत. वारंवार हे सुरू असून, कृषिपंपांना आठ तासाऐवजी पाच तासच विद्युत पुरवठा होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने कृषिपंपही मोकळेच फिरून जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे वीजबिलात वाढ होत असल्याने यांचा भुर्दंडही सोसावा लागत आहे. गेली दोन महिने हा प्रकार सुरू असून कोथळी (ता. करवीर) येथील महावितरणच्या कार्यालयात तक्रार देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने येत्या दोन दिवसांत या कृषिपंपांना उच्च दाबाने वीजपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कृषिपंपधारकांनी केला आहे.

प्रतिक्रिया

कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असून यामुळे माझा कृषिपंप जळाला आहे. वारंवार महावितरण कार्यालयात तक्रार देऊनसुद्धा याकडे महावितरण दुर्लक्ष का करत आहे. या प्रकारामुळे ‘पाणी उशाला, कोरड घशाला’, अशी या परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. तत्काळ उच्चक्षमतेने विद्युत पुरवठा करावा अन्यथा आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.

जयदीप शेळके

शेळकेवाडी शेतकरी

प्रतिक्रिया 2

या परिसरात सहकारी संस्थांचे मोठ्या प्रमाणात जाळे असून सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या जिवावरच अनेक शेतकरी अवलंबून असून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने वारंवार वीज खंडित होत आहे. केवळ चार तासच वीजपुरवठा होत असल्याने पिके वाळू लागली आहेत, तर कृषिपंप जळण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

रणजित पाटील

सचिव महालक्ष्मी सह. पाणीपुरवठा कळंबा, ता. करवीर.