शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

निपाणीत केंद्र सरकारविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:22 IST

निपाणी : नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा ...

निपाणी : नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी निपाणी भागातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत शनिवारी चक्का जाम आंदोलन केले. धर्मवीर संभाजीराजे चौकात मानवी साखळी करून याचा निषेध करण्यात आला.

यावेळी बेळगाव जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राघवेंद्र नाईक म्हणाले, जाचक कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. या जाचक कृषी कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे.

राजू पोवार म्हणाले की, आंदोलक शेतकऱ्यांना सरकारकडून अशी वागणूक मिळणे ही बाब दुर्दैवी आहे. यावरूनच केंद्र सरकार हे शेतकरी विरोधीच आहे हे स्पष्ट होते.

यावेळी प्रसन्नकुमार गुजर, रमेश पाटील, सुखदेव मगदूम यांनीही केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

चक्का जाम आंदोलनामुळे धर्मवीर संभाजी चौकात वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी वाहतूक सुरळीत केली.

यावेळी आय. एन. बेग, एन. आय. खोत, कॉम्रेड दिलीप वारके, जरार खान पठाण, फारूक नागरजी, सुधाकर माने, झाकीर कादरी, सर्जेराव हेगडे, हाफिज मोसिन यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

०६ निपाणी आंदोलन

फोटो

निपाणी : नवीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून निपाणी येथे शेतकरी संघटनांनी आंदोलन केले.