शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

फार्मर ट्रेडर हा महाराष्ट्राचा नवा स्लोगन हवा : यशवंत थोरात यांची भूमिका; कोरडवाहूमध्येच आता हरित क्रांतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतीत पैसा आहे; परंतु शेतकऱ्याकडे नाही. ही स्थिती बदलायची असेल तर शेतकऱ्याला कृषी मार्केटिंगचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शेतीत पैसा आहे; परंतु शेतकऱ्याकडे नाही. ही स्थिती बदलायची असेल तर शेतकऱ्याला कृषी मार्केटिंगचे तंत्र अवगत व्हायला हवे. म्हणून यापुढे फार्मर ट्रेडर हा महाराष्ट्राचा स्लोगन असला पाहिजे, अशी अपेक्षा नाबार्डचे माजी अध्यक्ष व कोरडवाहू शेती अभ्यास गटाचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. कोरडवाहू शेतजमिनीचा देश व राज्य पातळीवर गांभीर्याने विचार केल्यास पुढील हरित क्रांती कोरडवाहू शेतीत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रश्न : कृषी शिक्षणाची दिशा काय असावी?

थोरात : मला असे वाटते की, शेती कॉलेजचा अभ्यासक्रम हा मुलांना कृषी पिकांचे मार्केटिंग कसे करावे, यावर भर देणारा हवा. त्याला अडत्याचे काम आले पाहिजे. मार्केट कमिटीमध्ये जाऊन दराची घासाघीस कशी होते, याचे ज्ञान त्याला असले पाहिजे. शेतकऱ्याला आपण बिझनेसमन बनविले पाहिजे. कृषी महाविद्यालयांत शेतीचे शिक्षण घ्यायला जाते ते विद्यार्थी चांगली शेती करण्यासाठी नव्हे तर स्पर्धा परीक्षेला जायचे म्हणून या शिक्षणाकडे मुले ‌‌वळतात. त्यातून कृषी शिक्षणाचा आपला फोकसच चुकला आहे. माझा विश्वास आहे की, जेव्हा किंमत ठरविणे शेतकऱ्याच्या हातात येईल त्याचदिवशी तो सबल होईल. यासाठी शेतकरी हा ट्रेडर झाला पाहिजे.

प्रश्न : राज्यातील कोरडवाहू शेतीचे भवितव्य काय?

थोरात : देशात सिंचनाची जेवढी क्षमता आहे, तेवढी सगळी प्रत्यक्ष अस्तित्वात आणि वापरात आली, तरी ५० टक्केही जमीन सिंचनाखाली येऊ शकत नाही. याचा अर्थ किमान ५० ते ५५ टक्के जमीन कायमस्वरूपी कोरडवाहू राहणार, हे वास्तव आहे. ते स्वीकारूनच या शेतीचा विचार आपण केला पाहिजे. जेव्हा पहिली हरित क्रांती झाली तेव्हा पाण्याची उपलब्धता, सुधारित बियाणे, रासायनिक खते आणि विस्तार कार्य ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये होती. महाराष्ट्रात अहमदनगर, बीड, लातूर, परभणी, लातूर, अकोला अशा जिल्ह्यांत जिथे कोरडवाहूचे क्षेत्र जास्त आहे तिथे कृषी विद्यापीठे किंवा महाविद्यालये आहेत. त्यातील किमान ५ महाविद्यालये निवडा व त्यांच्याकडे कोरडवाहू शेती विकासाची जबाबदारी द्या. त्यामध्ये नवीन वाण, योग्य विस्तार व खत नियोजन याबाबतचे पायाभूत संशोधन विद्यापीठाने करावे आणि विस्तारासाठी कृषी विज्ञान केंद्रांची मदत घ्यावी.

प्रश्न : कोरडवाहू शेती विकासात कृषी विद्यापीठे कसे योगदान देऊ शकतील?

थोरात : महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांना राज्य शासनाने हजारो एकर जमिनी दिल्या आहेत. त्या जमिनी नुसत्या इमारती बांधण्यासाठी नव्हे तर उत्तम शेती करण्यासाठी दिल्या असून प्रत्यक्षात अशी शेती सध्या होत नाही. राहुरी कृषी विद्यापीठाला ५ हजार एकर जमीन आहे. त्यातून या शेतीतून स्रोत निर्माण करून त्यातून संशोधनाचा खर्च केला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने आग्रह धरायला हवा. विद्यापीठाने व्यावसायिक शेतीचे उत्तम मॉडेल तयार करून लोकांना दिले पाहिजे, असे केल्याशिवाय आपण ३० ते ४० लाख टन कडधान्ये आयात करतो ती बंद होणार नाहीत; पण विद्यापीठे पारंपरिक शिक्षणाशिवाय अन्य फारसे काही करत नाहीत. तीन वर्षांसाठी नियुक्ती झालेले कुलगुरूंना त्यामध्ये रस नाही. त्यामुळे सरकारने या यंत्रणेला उत्तरदायी ठरविले पाहिजे.

इथेनॉल फॅक्टरी...

महाराष्ट्राचे लग्न उसाशी झाले असल्याने जास्त पाणी पिते म्हणून ऊस नको, अशी भूमिका घेता येणार नाही. त्यासाठी पर्याय शोधले पाहिजेत. यापुढील काळात साखर कारखानदारीनेही कूस बदलली पाहिजे आणि इथेनॉल ॲन्ड पॉ‌‌वर जनरेशन फॅक्टरी असे तिचे स्वरूप हवे. साखर हे उपपदार्थ म्हणूनच आपण पुढे गेलो तरच या उद्योगाला भवितव्य आहे, अन्यथा कर्जबाजारीपणा संपणार नाही.

निवृत्तीनंतरही उपयोग...

केम्ब्रिज, हॉवर्ड विद्यापीठात प्राध्यापक निवृत्तीचे वय ७५ वर्षे आहे. आपल्याकडे ५८ आहे. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग होत नाही. या लोकांना निवृत्तीनंतरही कृषी विकासाच्या कामात जोडून घेतले पाहिजे.