शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

म्हाकवेतील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेतच...!

By admin | Updated: April 27, 2015 00:17 IST

अधिकाऱ्यांची उडवाउडवी : गोड बोलून शेतकऱ्यांची बोळवण; अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

म्हाकवे : काळम्मावाडी धरणाच्या निढोरी शाखेच्या उजव्या कालव्यातून म्हाकवे (ता. कागल) पर्यंत पाणी सोडले जाते; परंतु म्हाकवेतील २५ कि.मी. अंतराच्या पुढील शेतकऱ्यांना बऱ्याचवेळा पाणीच मिळत नाही. यासाठी येथील शेतकरी वारंवार निढोरी पाटबंधारे कार्यालयाकडे धाव घेतात. मात्र, या कार्यालयातील अधिकारी तुमच्यापर्यंत पाणी येत नाही हा विषय आमच्याकडे नाही. केवळ आम्ही पाणीपट्टी वसुली करतो, तर काही अधिकारी आमच्याकडे धरणातून ठरल्याप्रमाणे अमुक दिवस अमुक क्युसेस पाणी सोडण्याचे काम आहे आणि काही अधिकारी आम्ही मेंटनन्स करतो, तुम्ही कोल्हापुरातील कार्यालयातील आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जावा, असे डोस पाजून शेतकऱ्यांची केवळ बोळवण करण्याचेच काम करीत आहेत; परंतु येथील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्याच्यादृष्टीने एकाही अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर दिले जात नाही.म्हाकवेपर्यंतच्या कालव्याला ठिकठिकाणी मोठमोठी गळती आहेत. तसेच अनेक ठिकाणी असणाऱ्या पोटकालव्यांना दरवाजेच नाहीत. त्यामुळे लाखो लिटर पाणी ओढ्या-नाल्यातून वाहून जाते, तर ज्या कालव्याला अस्तरीकरण केलेले नाही, तो कालवा फुटू नये यासाठी कमी क्षमतेने पाणी सोडले जाते. परिणामी या कालव्यातील पाणी म्हाकवे आणि त्यापुढील सीमाभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. दरम्यान, या कार्यालयाकडे अपुरे कर्मचारी आहेत. तसेच अधिकारीही प्रत्यक्ष कालव्यावर येऊन पाणी कुठेपर्यंत आले आहे, पाण्याला काही अडचणी आहेत का? पोटकालव्याची दारे नीट आहेत का? याची पाहणी करीत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन सर्वच शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)कालव्यातून पाणी न आल्याची तक्रार घेऊन गेल्यास या कार्यालयातील अधिकारी पाणीपट्टी दिली आहे का? अशी विचारणा करतात. त्यानंतर तुमच्यापर्यंत पाणी आले की नाही हे पाहण्याचे काम आमचे नाही, असे सांगून या अधिकाऱ्याकडे-त्या अधिकाऱ्याकडे जाण्याचे सल्ले देतात. त्यामुळे सर्वच शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. - विजय डाफळे, शेतकरी, म्हाकवे पाण्याचा बुडबुडा अन् वसुलीचा रेटाया कालव्यातून म्हाकवेपर्यंत आणि त्यापुढे कर्नाटकात पाणी सोडले जाते. त्यामुळे म्हाकवेतील सर्वच क्षेत्र लाभक्षेत्रात गृहीत धरून पाणीपट्टी वसुली केली जाते. आता तर जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या वसुलीची धडक मोहीम हाती घेऊन थकीत पाणीपट्टी संबंधित शेतकऱ्यांच्या सात-बारावर नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, म्हाकवेतील बहुतांशी शेतकऱ्यांना पाण्याचा बुडबुडाच दाखवून पाणीपट्टीची वसुली ही अन्यायकारक असल्याचे जाणकारांचे मत आहे.