शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ‘शेतकरी भवन’ खुल

By admin | Updated: January 8, 2015 00:01 IST

बाजार समिती : नाममात्र दरात शेतकऱ्यांना राहण्याची सोये

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे अनेक वर्षे रखडलेले ‘शेतकरी भवन’ आज, बुधवारी खुले झाले. माफक दरात शेतकऱ्यांना राहण्यास मिळणार असून साडेदहा लाख रुपये खर्चून ‘शेतकरी भवन’सह मल्टिपर्पज हॉलही तयार करण्यात आला आहे. बाजार समितीत सोलापूर, नाशिक, अहमदनगर, सातारा, पुणे, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतून शेतकरी शेतीमाल घेऊन येतात. दोनशे-तीनशे किलोमीटरवरून प्रवास करून आल्यानंतर त्यांना रात्रभर उघड्यावर झोपावे लागते. यासाठी समितीचे ‘जुने शेतकरी भवन’ अद्यावत केले. त्यामध्ये चार स्पेशल खोल्या, आठ बेडचा कॉमन हॉल तयार केला असून, प्रति बेड ५० रुपये नाममात्र शुल्क आकारला जाणार आहे. लग्नकार्य, इतर कार्यक्रमांसाठी २५० खुर्च्यांची क्षमता असलेला अद्यावत हॉल तयार केला आहे. यासाठी सुमारे साडेदहा लाख रुपये खर्च करण्यात आले. त्याचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्या हस्ते झाले. शिरापूरकर म्हणाले, ‘शेतकरी भवन’ समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हक्काचा निवारा आहे अजूनही समितीमध्ये अनेक सुविधा अपेक्षित आहेत. त्याच्या पूर्ततेसाठी प्रशासकांनी प्रयत्न करावेत. ‘शेतकरी भवन’ कामाचा आढावा घेत समितीचे प्रशासक रंजन लाखे म्हणाले, एकाचवेळी हॉलसह खोलीत सव्वाशे शेतकरी राहू शकतात, असे प्रशस्त व्यवस्था केली आहे. आगामी काळात समितीच्या आवारातील प्राथमिक सुविधा पूर्ण करण्यास प्राधान्य देणार आहे. कागल येथे पाच हजार टन क्षमतेची तीन गोडावून बांधली जाणार असून समितीचे उत्पन्नवाढीसाठी पेट्रोल पंपाची परवानगी ही पणन संचालकांकडे मागितली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, रस्ते आदी बाबींच्या पूर्णत्वासाठी विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही लाखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)केवळ शेतकऱ्यांनाच प्रवेश!तुलनात्मकदृष्ट्या येथे राहण्याची सोय फारच कमी दरात आहे. ‘शेतकरी भवन’चा गैरवापर होऊ नये, यासाठी शेतीमाल आवक पावती किंवा अडते-व्यापारी यांचे पत्र आवश्यक राहील. सात-आठ महिन्यांपूर्वी तत्कालीन प्रशासक डॉ. महेश कदम यांनी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन ‘शेतकरी भवन’चे काम सुरू केले होते. त्यांच्या कालावधीत ९० टक्के काम पूर्ण झाले, पण आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांचा विसर पडल्याचे दिसले. याबाबत प्रशासकांकडे विचारणा केली असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे त्यांनी सांगितले.