शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवरील अत्याचाराचे चोवीस तासांत दोषारोपपत्र

By admin | Updated: January 13, 2016 00:35 IST

केंद्राच्या कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी : सीपीआरमधील डॉक्टर फणीकुमार कोटा याच्यावर अशाप्रकारे कारवाई

एकनाथ पाटील -- कोल्हापूर महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांचा तपास आता त्वरित करून २४ तासांच्या आत आरोपींसोबतच दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम २०१३ अमलात आणला आहे. त्यानुसार सीपीआरमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर फणीकुमार किरण कोटा (वय ३१, रा. गंगारेड्डी, तेलंगणा) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर करतानाच त्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. पहिल्यांदाच असे दोषारोपपत्र २४ तासांत दाखल झाले. महिला अत्याचारांमध्ये सर्वसाधारणपणे भा.दं.वि.स.कलम ३५४ म्हणजेच विनयभंग या गुन्ह्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे गांभीर्य वाढत जाऊन परिणामी बलात्कार, खुनाचा प्रयत्न, अ‍ॅसिड हल्ले, बलात्कारासह खून, अशा प्रकारच्या अधिक गंभीर गुन्ह्याची शक्यता वाढत आहे. अशा गुन्ह्यांना आवर किंवा प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम २०१३ अमलात आणला आहे. या कायद्यानुसार महिलांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची त्वरीत दखल घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना जस-जसा वेळ जावा, तस-तसे फिर्यादी हे न्यायालयाकडे येण्याची टाळाटाळ करतात, तक्रार परत मागे घेण्याचे दडपण, आरोपीचा चुकीचा पत्ता, साक्षीदार जबाब बदलणे किंवा गैरहजर राहणे या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन आरोपीविरुद्ध दोष सिद्ध होत नाही. त्यामुळे गंभीर कृत्य करूनही आरोपी निर्दोष सुटतो. त्यामुळे अशा गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी तक्रार प्राप्त होताच ती खरी आहे की खोटी याची पडताळणी करून खरी असल्यास तत्काळ तक्रार दाखल करावी. त्याचबरोबर साक्षीदारांचे जाब-जबाब घ्यावेत. आरोपीबाबत पुरेसे पुरावे उपलब्ध असल्यास २४ तासांच्या आत दोषारोपपत्रासोबत आरोपीला न्यायालयात सादर करण्यात यावे. ज्यामुळे आरोपी गुन्ह्याची कबुली देईलच त्याशिवाय फिर्यादी व साक्षीदार न्यायालयात हजर राहिल्यामुळे दोषसिद्धीमध्ये वाढ होऊन अशा कृत्य करणाऱ्यांना चाप बसणार आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची फिर्याद तत्काळ दाखल करून संशयित आरोपीला अटक करून २४ तासांच्या आत त्याच्यासह दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. प्रदीप देशपांडे, पोलीस अधीक्षक महिलांना न्याय मिळेल...महिलांवर अत्याचार झाल्यास त्या बदनामीला घाबरून तक्रार देण्यास पुढे येत नव्हत्या. एखाद्या महिलेने धाडसाने तक्रार दिली तर पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यास तीन महिने लावले जातात. त्यानंतर न्यायालयाकडून या खटल्याची सुनावणी तीन ते चार वर्षांनी सुरू होते. या मुदतीत फिर्यादी महिलेवर आरोपीकडून दबाब टाकण्याचा प्रयत्न केला जातो. प्रसंगी साक्षीदारही फितूर केले जात होते; परंतु गुन्हा दाखल होताच चोवीस तासांत आरोपीसह दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्यास शिक्षेचे प्रमाण वाढेल. त्याचबरोबर महिलांना न्याय दिल्याने त्यांचा कायद्यावर विश्वास बसेल. - वर्षा संकपाळ, वडणगे (ता. करवीर)